शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

८ कोटींच्या निधीवरुन जिल्हा परिषद सदस्यांची घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठीचा निधी ठप्प झाला होता. तब्बल ८ महिन्यांनी १५ व्या वित्त आयोगातून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठीचा निधी ठप्प झाला होता. तब्बल ८ महिन्यांनी १५ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला ८ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांचे निधी वितरणाकडे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर विकासकामांसाठी केलेल्या शिफारशीनुसार यादी मंजूर कधी होणार, म्हणून सातत्याने चौकशी केली जात आहे.

कोरोनाच्या संकटामुळे शासनाने विकासकामांचा निधी आरोग्य सुविधेकडे वळवला होता. त्यामुळे ८ महिन्यांपासून जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी, निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देत गावा-गावातील जनता जिल्हा परिषद सदस्यांकडे सातत्याने विचारपूस करत आहे. दरम्यान, १५ व्या वित्त आयोगातून केंद्र शासनाकडून विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. यात ग्रामपंचायतींना ८० टक्के, जिल्हा परिषदेला १० टक्के तर पंचायत समित्यांना १० टक्के असा निधी आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेला ८ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत.

या निधीतून पाणी समस्या, मुलांचे लसीकरण, कुपोषण रोखणे, पादचारी रस्ते व बांधकाम दुरुस्ती, एलईडी, सौर प्रकाश दिवे बसवणे व दुरुस्ती, स्मशानभूमीचे बांधकाम, दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन अशी विविध कामे करावयाची आहेत. दरम्यान, बऱ्याच कालावधीनंतर निधी उपलब्ध झाल्याने प्रत्येक गटातील सदस्यांना समप्रमाणात कामांसाठी निधी मिळणार का? याकडे जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष लागून आहे.

शिफारशी घेतलेल्यांचा आटापिटा...

जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांकडून विकासकामांसाठी शिफारशी घेण्यात येऊन त्यानुसार यादी तयार करण्यात आली. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुका झाल्याने काही ठिकाणी दुसऱ्याच गटाची सत्ता आली तर काही ठिकाणच्या विकासकामांत बदल करण्यात येऊन पुन्हा नव्याने शिफारशी देण्यात आल्या. तत्पूर्वी यादी मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याने त्यात बदल करण्यात यावा म्हणून शिफारस घेतलेल्यांनी आटापिटा सुरु केला आहे.

परंपरेनुसार मिळणार विकासनिधी...

केंद्र शासनाकडून १५ व्या वित्त आयोगांतर्गत ८ कोटींचा अबंधित निधी उपलब्ध झाला आहे. प्रत्येक गटातील विकासकामांसाठी समान पध्दतीने आणि परंपरेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कुठल्याही सदस्याबाबत दुजाभाव केला जाणार नाही. लवकरच विकासकामांची यादी मंजूर होईल.

- राहुल केंद्रे, अध्यक्ष, जिल्हा परिषद.