शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होणार; पाशा पटेल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 16:21 IST

सोयाबीनच्या दरात १२० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ होऊन हे दर हमीभावाच्या जवळपास पोहोचतील़ ही दरवाढ दोन दिवसांतच दिसून येईल, अशी माहिती राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने खाद्यतेलावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क वाढविल्याने आता खुल्या बाजारपेठेत विक्री होणा-या सोयाबीनच्या दरात १२० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ होईल आता क्रुड पामतेल, रिफाईन पामतेल, रिफाईन सूर्यफुल तेल, रिफाईन सोयाबीन तेल आणि रिफाईन मोहरी तेलाच्या आयात शुल्कात प्रत्येकी १५ टक्के वाढ होणार आहे़

लातूर : केंद्र सरकारने खाद्यतेलावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क वाढविल्याने आता खुल्या बाजारपेठेत विक्री होणा-या सोयाबीनच्या दरात १२० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ होऊन हे दर हमीभावाच्या जवळपास पोहोचतील़ ही दरवाढ दोन दिवसांतच दिसून येईल, अशी माहिती राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली़

पाशा पटेल म्हणाले, देशातील तेलबियांचा दर हा हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते़ त्यामुळे मध्यप्रदेश सरकारने भावांतर योजना तर राजस्थान सरकारने स्वत: सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला़ त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने एक लाख टन सोयाबीन करण्यात येणार असल्याचे सांगितले़ दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री राधामोहनसिंह, रामविलास पासवान, पंतप्रधानांचे सचिव यांची बैठक झाली़ त्या बैठकीत आम्ही खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविण्याची शिफारस केली़ १२ वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच तूर, मुग, उडीद अशा प्रत्येक शेतीमालाच्या नावावर चर्चा झाली़ केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पुढाकारामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी आयात शुल्क वाढविण्याची अधिसूचना काढली आहे़ 

सोयाबीनच्या दरात वाढ होणार आता क्रुड पामतेल, रिफाईन पामतेल, रिफाईन सूर्यफुल तेल, रिफाईन सोयाबीन तेल आणि रिफाईन मोहरी तेलाच्या आयात शुल्कात प्रत्येकी १५ टक्के वाढ होणार आहे़ त्यामुळे क्रुड पामतेलावर ३० टक्के, रिफाईन पामतेलावर ४० टक्के, क्रुड सूर्यफुल तेलावर २५ टक्के, रिफाईन सूर्यफुल तेलावर ३५ टक्के, क्रुड सोयाबीन तेलावर ३० टक्के, रिफाईन सोयाबीन तेलावर ३५ टक्के, कु्रड मोहरीवर २५ टक्के तर रिफाईन मोहरी तेलावर ३५ टक्के आयात शुल्क लागणार आहे़ परिमामी, सोयाबीनच्या दरात वाढ होणार आहे़ तसेच या निर्णयामुळे यंदा सोयाबीनच्या पेंडेची निर्यात वाढणार आहे. देशात यंदा १४ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा कमी झाला असतानाही शेतकरी, तेल उद्योजक चिंतेत होते़ कारण देशातील ६५० पैकी ३०० तेल निर्मिती व्यवसाय बंद असून उर्वरित ३५० निम्म्या क्षमतेने सुरुआहेत़ या निर्णयामुळे सर्वांना लाभ होणार आहे, असेही पाशा पटेल यांनी सांगितले़

शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही़पाशा पटेल म्हणाले, जगाच्या तुलनेत भारतात पामतेलाची मोठ्या प्रमाणात आवक होते़ शेतक-यांच्या हितासाठी आपण मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे़ त्यामुळेच चार महिन्यांत सात निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत़ हे सरकार शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले़

टॅग्स :Farmerशेतकरी