शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

लातूरात १२ दिवशीही आडत बंद; बाजार समितीच्या कारवाईकडे वेधले शेतकऱ्यांचे लक्ष

By हरी मोकाशे | Updated: July 12, 2024 19:41 IST

सातत्याने बैठका घेऊनही शेतमालाचा सौदा सुरु होत नसल्याने बाजार समितीने गुरुवारपासून खरेदीदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली.

लातूर : आडत बाजार पूर्ववत सुरु करावा म्हणून बाजार समितीने गुरुवारपासून खरेदीदारांना नोटिसा बजावत २४ तासांची मुदत दिली. ही मुदत संपत आल्याने आता खरेदीदार काय निर्णय घेतात आणि बाजार समिती कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, १२ व्या दिवशीही आडत बाजार बंद होता.

पणन कायद्यानुसार शेतमालाची खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी २४ तासांच्या आत आडत्यांना पैसे देणे अपेक्षित आहे. या कायद्याचे पालन करावे म्हणून बाजार समितीने पत्र काढले होते. तेव्हा खरेदीदारांनी पूर्वी बैठकीत ठरल्याप्रमाणे शेतमाल खरेदी केल्यानंतर नवव्या दिवशी धनादेश देण्यात येईल, असे सांगितले. त्यावरुन बाजार समितीचा आडत बाजार १ जुलैपासून बंद आहे. हा तिढा सोडविण्यासाठी बाजार समितीने आजपर्यंत आठ बैठका घेतल्या. त्याचबरोबर जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन अडचण दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सातत्याने बैठका घेऊनही शेतमालाचा सौदा सुरु होत नसल्याने बाजार समितीने गुरुवारपासून खरेदीदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली. जवळपास ६०० खरेदीदारांना नोटिसा बजावत २४ तासांत सौद्यात सहभागी होण्यासाठी मुदत दिली आहे. ही मुदत संपत आल्याने आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.

योग्य ती कारवाई करु...शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून सातत्याने आमचा पाठपुरावा सुरु आहे. आजपर्यंत आठवेळा बैठका घेऊन तोडगा काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. तद्नंतर नोटिसा बजावल्या आहेत. खरेदीदार सौद्यात सहभागी न झाल्यास आता योग्य ती कारवाई केली जाणार आहे.- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती

व्यवहार सुरु करावेत...बाजार समितीतील व्यवहार १ जुलैपासून बंद असल्यामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे शेतमालाचा सौदा पूर्ववत सुरु करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे शाखा अध्यक्ष बालाजी जाधव यांनी बाजार समितीस दिले आहे. व्यवहार पूर्वपदावर न आणल्यास संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्डAgriculture Sectorशेती क्षेत्र