शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

लातूर जिल्ह्यात दर आठवड्यास होतेय एक दलघमी पाणी कमी

By हरी मोकाशे | Updated: April 6, 2024 17:24 IST

उन्हं अन् पाणी वापरामुळे मध्यम प्रकल्पातील साठ्यात घट

लातूर : वाढत्या उन्हामुळे पारा ४२ अं. से. वर पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. परिणामी, बाष्पीभवनाचाही वेग वाढला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा अधिक जाणवत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. वाढते उन्हं आणि पाणी वापरामुळे दर आठवड्यास एक दलघमी पाणी कमी होत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह अन्य नद्या, नाले वाहिले नाहीत. परतीचाही पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यास डिसेंबरपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. महिनाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जलसाठ्यातील बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. शिवाय, आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा वापर होत असल्याने दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. विशेष म्हणजे, मध्यम प्रकल्पातील साठ्यात दर आठवड्यास एक दलघमी पाणी कमी होत आहे.

सध्या केवळ ७.८८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक....प्रकल्प - साठा टक्केतावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - ७.८०तिरु - ००देवर्जन - ९.८२साकोळ - १४.१६घरणी - १०.२७मसलगा - २२.९५एकूण - ७.८८

गेल्या वर्षी ५० दलघमी जलसाठा...गेल्या वर्षी चांगले पर्जन्यमान झाले होते. शिवाय, परतीचा पाऊस झाला होता. त्यामुळे जलसाठे तुडुंब भरले होते. गेल्या वर्षीच्या एप्रिलमधील पहिल्या आठवड्यात ८ मध्यम प्रकल्पांत ५०.७७५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा केवळ ९.६३१ दलघमी पाणी उपलब्ध आहे. विशेषत: तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत.

तारीख - प्रत्यक्षात उपयुक्त साठा...२८ फेब्रुवारी - १४.०१४६ मार्च - १३.१३५१३ मार्च - १२.५०१२० मार्च - ११.४५९२७ मार्च - १०.५१७३ एप्रिल - ९.६३१

लघु प्रकल्पांत १० टक्के पाणी...जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत एकूण १३४ तलाव आहेत. त्यातील पाण्याचा उपयोग हा सर्वाधिक पशुधनासाठी होतो. सध्या या तलावांमध्ये उपयुक्त जलसाठा ३१.५२३ दलघमी आहे. त्याची १०.०३ अशी टक्केवारी आहे.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक पाणी...निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात प्रत्यक्षात उपयुक्त साठा सर्वाधिक असून तो ३.१३१ दलघमी आहे. रेणापूर प्रकल्पात १.६०४, देवर्जनमध्ये १.०४९, साकोळ- १.५५०, घरणी मध्यम प्रकल्पात २.३०७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी