शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

लातूर जिल्ह्यात दर आठवड्यास होतेय एक दलघमी पाणी कमी

By हरी मोकाशे | Updated: April 6, 2024 17:24 IST

उन्हं अन् पाणी वापरामुळे मध्यम प्रकल्पातील साठ्यात घट

लातूर : वाढत्या उन्हामुळे पारा ४२ अं. से. वर पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. परिणामी, बाष्पीभवनाचाही वेग वाढला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा अधिक जाणवत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. वाढते उन्हं आणि पाणी वापरामुळे दर आठवड्यास एक दलघमी पाणी कमी होत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह अन्य नद्या, नाले वाहिले नाहीत. परतीचाही पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यास डिसेंबरपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. महिनाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जलसाठ्यातील बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. शिवाय, आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा वापर होत असल्याने दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. विशेष म्हणजे, मध्यम प्रकल्पातील साठ्यात दर आठवड्यास एक दलघमी पाणी कमी होत आहे.

सध्या केवळ ७.८८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक....प्रकल्प - साठा टक्केतावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - ७.८०तिरु - ००देवर्जन - ९.८२साकोळ - १४.१६घरणी - १०.२७मसलगा - २२.९५एकूण - ७.८८

गेल्या वर्षी ५० दलघमी जलसाठा...गेल्या वर्षी चांगले पर्जन्यमान झाले होते. शिवाय, परतीचा पाऊस झाला होता. त्यामुळे जलसाठे तुडुंब भरले होते. गेल्या वर्षीच्या एप्रिलमधील पहिल्या आठवड्यात ८ मध्यम प्रकल्पांत ५०.७७५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा केवळ ९.६३१ दलघमी पाणी उपलब्ध आहे. विशेषत: तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत.

तारीख - प्रत्यक्षात उपयुक्त साठा...२८ फेब्रुवारी - १४.०१४६ मार्च - १३.१३५१३ मार्च - १२.५०१२० मार्च - ११.४५९२७ मार्च - १०.५१७३ एप्रिल - ९.६३१

लघु प्रकल्पांत १० टक्के पाणी...जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत एकूण १३४ तलाव आहेत. त्यातील पाण्याचा उपयोग हा सर्वाधिक पशुधनासाठी होतो. सध्या या तलावांमध्ये उपयुक्त जलसाठा ३१.५२३ दलघमी आहे. त्याची १०.०३ अशी टक्केवारी आहे.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक पाणी...निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात प्रत्यक्षात उपयुक्त साठा सर्वाधिक असून तो ३.१३१ दलघमी आहे. रेणापूर प्रकल्पात १.६०४, देवर्जनमध्ये १.०४९, साकोळ- १.५५०, घरणी मध्यम प्रकल्पात २.३०७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी