शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

हिंमत असेल तर शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करून दाखवा; राजू शेट्टी यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:41 IST

ज्या कोणाचे हा महामार्ग करण्याचे ड्रीम आहे, ते ड्रीम शेतकऱ्यांचे वाटोळे करून पूर्ण होऊ दिले जाणार नाही: राजू शेट्टी

लातूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गाला नवीन शक्तिपीठ महामार्ग करण्याची अधिसूचना सरकारने काढली आहे. पण या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी जमिनी अधिग्रहण करून दाखवाव्यात, असे आव्हान शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले.

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांची राज्यस्तरीय परिषद मंगळवारी गिरवलकर सभागृहात झाली. मंचावर प्रा. एच. एम. देसरडा, माजी आमदार त्रिंबक भिसे, प्रकाश पाटील, ॲड. उदय गवारे, ॲड. गजेंद्र येळकर, सम्राट मोरे, प्रकाश पाटील, विजय पाटील, अजय बोराडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, राजकीय नेत्यांना शक्ती देण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग आहे. वास्तविक पाहता या महामार्गामुळे कुठला विकास होणार नाही. २७ ते २८ हजार कोटींमध्ये होणाऱ्या महामार्गाचा खर्चही ८६ हजार कोटींचा दाखविला आहे. यातून ५० हजार कोटी रुपये हडप करण्याचा डाव नेत्यांचा आहे, असा आरोपही त्यांनी केला. कसल्याही परिस्थितीत हा महामार्ग होणार नाही. बारा जिल्ह्यांतून हा महामार्ग जातो. त्यातील सर्व शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. नागपूर-रत्नगिरी महामार्गाला समांतर हा महामार्ग करण्याची अधिसूचना आहे. या महामार्गातून फक्त ७० ते ८० किमी अंतर कमी होऊ शकते. परंतु, त्यात हजारो हेक्टर जमीन जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा विरोध आहे. महामार्ग रद्द केल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत. सध्या मोजणीला विरोध आहे. माती परीक्षणाला विरोध आहे. कसल्याही परिस्थितीत शासनाचा हेतू साध्य होऊ दिला जाणार नाही. ज्या कोणाचे हा महामार्ग करण्याचे ड्रीम आहे, ते ड्रीम शेतकऱ्यांचे वाटोळे करून पूर्ण होऊ दिले जाणार नाही, असेही राजू शेट्टी म्हणाले.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव पारितयावेळी लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरीय परिषदेला उपस्थिती होती. शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या बॅनरखाली सर्व शेतकरी एकवटले आहेत. त्यांनी या परिषदेत कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ दिला जाणार नाही, असा ठराव पारित केला.

९० वर्षे टोल लागेल८६ हजार कोटींचा खर्च शक्तिपीठ महामार्गाला होईल, असे शासनाला अपेक्षित आहे. हा खर्च फेडण्यासाठी ९० वर्षे टोल द्यावा लागणार आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्ग असताना त्याला समांतर शक्तिपीठ महामार्ग करण्याचे कारण काय? गरज नसताना हा मार्ग कशासाठी, असा सवालही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

टॅग्स :laturलातूरRaju Shettyराजू शेट्टीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी