शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘उजेडाचा वारस’ आदर्श, प्रेरणादायी जीवनप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST

लातूर : निलंगा तालुक्यातील सावरी येथील महात्मा गांधी ग्रामविकास सेवा केंद्र या संस्थेतून शिक्षक म्हणून यू़ डी. गायकवाड ...

लातूर : निलंगा तालुक्यातील सावरी येथील महात्मा गांधी ग्रामविकास सेवा केंद्र या संस्थेतून शिक्षक म्हणून यू़ डी. गायकवाड हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा ‘उजेडाचा वारस’ हा गाैरवग्रंथ आदर्श, प्रेरणादायी शिक्षकाचा जीवनप्रवास आहे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी येथे केले.

‘उजेडाचा वारस’ या गाैरवग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन, लातूर आणि संयोजन समितीच्यावतीने आयाेजित कार्यक्रमात लातूर येथे झाले. यावेळी आमदार विक्रम काळे बाेलत हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत व प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, के. एस. अतकरे, जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई हालसे, रत्नराज जवळगेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, महात्मा गांधी ग्राम विकास सेवा केंद्राचे कार्याध्यक्ष संजय सावरीकर, संचालक एस. व्ही. जाधव, बी. आर. काळे, अभय साळुंखे, प्रा. सुधीर अनवले, डी. एस. नरसिंगे, कालिदास माने, बसवंतप्पा उबाळे, प्रा. बापू गायकवाड, माणिकराव वाघमारे, बालाजी कांबळे, बापूसाहेब गायकवाड, जी. टी. होसूरकर उपस्थित हाेते. आमदार विक्रम काळे म्हणाले, यू़ डी. गायकवाड हे तळमळीचे, आदर्श हाडाचे शिक्षक आहेत. फुले, शाहू, आंबेडकरी विचार आत्मसात करून त्यांनी ताे विचार जनमानसात पेरत पेरतच स्वतः उजेडाचा वारस झाले आहेत. तर ऋषिकेश कांबळे म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार यू. डी. गायकवाड यांच्या कर्तृत्वाच्या मुळाशी आहे. या महापुरुषांच्या विचारांमुळेच समाजाचे अस्तित्व अभेद्य राहणार आहे. यावर यू. डी. गायकवाड यांची श्रद्धा आहे. ज्यांचा ध्येयासक्तीचा पाया मजबूत असतो त्यांची वाटचाल कधीही डगमगत नाहीत. प्रारंभी प्रतिज्ञा गायकवाड, सुनीता गायकवाड यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाला दिलीप जाधव, नागसेन कांबळे, विभागीय अध्यक्ष होसुरकर, किशोर गायकवाड, बाबुराव बनसोडे, रमेश मांदळे, फुलचंद मांदळे, शरद हणमंते, अशोक देडे, शेषेराव वाघमारे, गोविंद कुंभार, गुरुनाथ सूर्यवंशी, सुरेश सोनकांबळे, उत्तम कांबळे, पंडित कांबळे, नांदेड येथील जिल्हाध्यक्ष वने यांची उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन प्रा. सतीश हानेगावे यांनी केले.