शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जळकोटात अतिवृष्टी; पिकांसह मातीही गेली वाहून; शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं

By हरी मोकाशे | Updated: July 21, 2023 19:17 IST

जळकोट तालुक्यात जवळपास पाच तास पाऊस होऊन अतिवृष्टी झाली.

लातूर/जळकोट : जळकोट तालुक्यात गुरुवारी रात्री अतिवृष्टीने पिकांसह शेतातील मातीही वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले. रावणकोळा, मरसांगवी, अतनूर येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. तिरू नदीला पूर आल्याने नजीकच्या गावांचा ८ ते १० तास संपर्क तुटला होता; तसेच रावजी तांडा-सुल्लाळी-मेघा तांडा रस्त्यावरील पूल वाहून गेला.

जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागांत गुरुवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. जळकोट तालुक्यात जवळपास पाच तास पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. तालुक्यातील रावणकोळा, हळद वाढवणा, माळहिप्परगा, अतनूर परिसरातील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत; तसेच रावणकोळा येथील बळीराम डोंगरगावे, व्यंकट बेळकोणे, पिराजी बेळकोणे, दाऊद पटेल यांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य भिजले. शकील शेख, काफिया शेख, पांडुरंग वाघमारे यांच्या शेतातील ३०० ट्रीप टाकलेली काळी माती वाहून गेली आहे. त्याचबरोबर शंकरराव पाटील यांच्या शेतातील माती वाहून गेली.

मरसांगवीचा संपर्क तुटला...तालुक्यातून वाहणाऱ्या तिरू नदीला पूर आल्याने मरसांगवी व परिसरातील गावांना जोडणाऱ्या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा ८ ते १० तास संपर्क तुटला होता. तसेच काही ठिकाणचे रस्तेही उखडून गेले आहेत. त्याचबरोबर पावसामुळे गावातील काही घरांची पडझड झाली. नदीकाठच्या दिलदार पटेल, मैनोद्दीन बिरादार, सरदार जमादार, सलीम शेख, जाफर शेख यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले; तसेच नदीकाठच्या अन्य जवळपास २०० शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.

तलावाचा बांध फुटल्याने दोन म्हशी दगावल्या...अतिवृष्टीमुळे अतनूर येथील पाझर तलाव क्र. १ च्या सांडव्याचा बांध फुटल्याने तलावाखालील शेतकरी विश्वनाथ सोमुसे यांच्या दोन म्हशी वाहून जाऊन दगावल्या. या म्हशींची किंमत जवळपास सव्वालाख आहे; तसेच परिसरातील शेतातील पिकांसह जमिनीची खरडण झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश...नुकसानीची माहिती मिळताच क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि ते शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, तहसीलदार सुरेखा स्वामी, मंडळ अधिकारी पन्हाळे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, ग्रामसेवक श्याम पाटील, तलाठी सूरज भिसे व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देऊन पाहणी केली.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी