शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

जळकोटात अतिवृष्टी; पिकांसह मातीही गेली वाहून; शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं

By हरी मोकाशे | Updated: July 21, 2023 19:17 IST

जळकोट तालुक्यात जवळपास पाच तास पाऊस होऊन अतिवृष्टी झाली.

लातूर/जळकोट : जळकोट तालुक्यात गुरुवारी रात्री अतिवृष्टीने पिकांसह शेतातील मातीही वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले. रावणकोळा, मरसांगवी, अतनूर येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. तिरू नदीला पूर आल्याने नजीकच्या गावांचा ८ ते १० तास संपर्क तुटला होता; तसेच रावजी तांडा-सुल्लाळी-मेघा तांडा रस्त्यावरील पूल वाहून गेला.

जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागांत गुरुवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. जळकोट तालुक्यात जवळपास पाच तास पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. तालुक्यातील रावणकोळा, हळद वाढवणा, माळहिप्परगा, अतनूर परिसरातील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत; तसेच रावणकोळा येथील बळीराम डोंगरगावे, व्यंकट बेळकोणे, पिराजी बेळकोणे, दाऊद पटेल यांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य भिजले. शकील शेख, काफिया शेख, पांडुरंग वाघमारे यांच्या शेतातील ३०० ट्रीप टाकलेली काळी माती वाहून गेली आहे. त्याचबरोबर शंकरराव पाटील यांच्या शेतातील माती वाहून गेली.

मरसांगवीचा संपर्क तुटला...तालुक्यातून वाहणाऱ्या तिरू नदीला पूर आल्याने मरसांगवी व परिसरातील गावांना जोडणाऱ्या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा ८ ते १० तास संपर्क तुटला होता. तसेच काही ठिकाणचे रस्तेही उखडून गेले आहेत. त्याचबरोबर पावसामुळे गावातील काही घरांची पडझड झाली. नदीकाठच्या दिलदार पटेल, मैनोद्दीन बिरादार, सरदार जमादार, सलीम शेख, जाफर शेख यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले; तसेच नदीकाठच्या अन्य जवळपास २०० शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.

तलावाचा बांध फुटल्याने दोन म्हशी दगावल्या...अतिवृष्टीमुळे अतनूर येथील पाझर तलाव क्र. १ च्या सांडव्याचा बांध फुटल्याने तलावाखालील शेतकरी विश्वनाथ सोमुसे यांच्या दोन म्हशी वाहून जाऊन दगावल्या. या म्हशींची किंमत जवळपास सव्वालाख आहे; तसेच परिसरातील शेतातील पिकांसह जमिनीची खरडण झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश...नुकसानीची माहिती मिळताच क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि ते शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, तहसीलदार सुरेखा स्वामी, मंडळ अधिकारी पन्हाळे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, ग्रामसेवक श्याम पाटील, तलाठी सूरज भिसे व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देऊन पाहणी केली.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी