शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

जळकोटात अतिवृष्टी; पिकांसह मातीही गेली वाहून; शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं

By हरी मोकाशे | Updated: July 21, 2023 19:17 IST

जळकोट तालुक्यात जवळपास पाच तास पाऊस होऊन अतिवृष्टी झाली.

लातूर/जळकोट : जळकोट तालुक्यात गुरुवारी रात्री अतिवृष्टीने पिकांसह शेतातील मातीही वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले. रावणकोळा, मरसांगवी, अतनूर येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. तिरू नदीला पूर आल्याने नजीकच्या गावांचा ८ ते १० तास संपर्क तुटला होता; तसेच रावजी तांडा-सुल्लाळी-मेघा तांडा रस्त्यावरील पूल वाहून गेला.

जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागांत गुरुवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. जळकोट तालुक्यात जवळपास पाच तास पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. तालुक्यातील रावणकोळा, हळद वाढवणा, माळहिप्परगा, अतनूर परिसरातील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत; तसेच रावणकोळा येथील बळीराम डोंगरगावे, व्यंकट बेळकोणे, पिराजी बेळकोणे, दाऊद पटेल यांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य भिजले. शकील शेख, काफिया शेख, पांडुरंग वाघमारे यांच्या शेतातील ३०० ट्रीप टाकलेली काळी माती वाहून गेली आहे. त्याचबरोबर शंकरराव पाटील यांच्या शेतातील माती वाहून गेली.

मरसांगवीचा संपर्क तुटला...तालुक्यातून वाहणाऱ्या तिरू नदीला पूर आल्याने मरसांगवी व परिसरातील गावांना जोडणाऱ्या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा ८ ते १० तास संपर्क तुटला होता. तसेच काही ठिकाणचे रस्तेही उखडून गेले आहेत. त्याचबरोबर पावसामुळे गावातील काही घरांची पडझड झाली. नदीकाठच्या दिलदार पटेल, मैनोद्दीन बिरादार, सरदार जमादार, सलीम शेख, जाफर शेख यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले; तसेच नदीकाठच्या अन्य जवळपास २०० शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.

तलावाचा बांध फुटल्याने दोन म्हशी दगावल्या...अतिवृष्टीमुळे अतनूर येथील पाझर तलाव क्र. १ च्या सांडव्याचा बांध फुटल्याने तलावाखालील शेतकरी विश्वनाथ सोमुसे यांच्या दोन म्हशी वाहून जाऊन दगावल्या. या म्हशींची किंमत जवळपास सव्वालाख आहे; तसेच परिसरातील शेतातील पिकांसह जमिनीची खरडण झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश...नुकसानीची माहिती मिळताच क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि ते शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, तहसीलदार सुरेखा स्वामी, मंडळ अधिकारी पन्हाळे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, ग्रामसेवक श्याम पाटील, तलाठी सूरज भिसे व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देऊन पाहणी केली.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी