शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ग्रामपंचायत सदस्यांना आता लागले आरक्षणाचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST

काेराेनाच्या संकटामुळे सरकारने स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, सदस्यांना काही महिने ...

काेराेनाच्या संकटामुळे सरकारने स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, सदस्यांना काही महिने मुदतवाढ मिळाली. त्यानंतर सरकारने ग्रामपंचायती बरखास्त करत प्रशासकांची नियुक्ती केली. ऑक्टोबर महिन्यात काेराेनाचा प्रभाव काहीसा ओसरला. निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा व त्याचबरोबर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला हाेता. राज्य निवडणूक आयोगाने सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला हाेता. मात्र, तत्पूर्वी सरकारने थेट जनतेमधून ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडण्याचा निर्णय मागे घेऊन सदस्यामधूनच सरपंच निवडीचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांना सरपंच होण्याचे वेध लागले हाेते. परिणामी, निवडणुकीत चुरस निर्माण हाेऊन गावोगावी वातावरण तापले होते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या आहेत. या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. यातून अनेक ठिकाणी प्रस्थापितांना मोठे धक्के बसले आहेत, तर काही ठिकाणी तरुणांना संधी मिळाली आहे. या निवडणुकीनंतर गावातील राजकारणाचे चित्रच पालटले आहे. आता नवनिर्वाचित सदस्यांना कोण सरपंच होणार, याची उत्सुकता लागली आहे. शासनाकडून सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर कधी करणार, याकडेही गावकऱ्यांचे, नूतन ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष लागले आहे. शासन नियमानुसार ज्या प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर हाेईल, त्याचा आम्ही स्वीकार करू, असे ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख विष्णू कोळी म्हणले.

आदेशानंतर आरक्षण हाेणार जाहीर...

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरपंच सोडतीचा कार्यक्रम जाहीर हाेताच, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याच दिवशी साेडत काढली जाणार आहे. सध्याला सोडतीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे औसा-रेणापूर येथील उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे म्हणाले.