शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

विनामास्क आढळल्यास आता ५०० रुपयांचा लागणार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST

लातूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता जिल्हाधिकाऱ्यांनी कडक अंमलबजावणीला प्रारंभ केला आहे. रात्रीच्या संचारबंदीत विनाकारण रस्त्यांवर ...

लातूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता जिल्हाधिकाऱ्यांनी कडक अंमलबजावणीला प्रारंभ केला आहे. रात्रीच्या संचारबंदीत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना हजार रुपयांचा दंड, तर विनामास्क आढळल्यास ५०० रुपयांचा दंड लावला जाणार आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोविड-१९ व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा ७२ तासांच्या आत शोध घेणे व पुढील वैद्यकीय कार्यवाही करण्याचेही निर्देश आहेत.

वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळून अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींकडून एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास हजार रुपयांचा दंड, पूर्वनियोजित लग्न, त्याअनुषंगिक समारंभ ५० व्यक्तींच्या मर्यादेत व्हावेत. तेही स्वगृही व्हावेत, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सर्व खाजगी कार्यालये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. उद्योग क्षेत्रातील उत्पादने, कोविड नियमांचे पालन करून पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. मात्र, त्यासाठी मास्कचा वापर अनिवार्य आहे.

प्रवेशद्वारावर थर्मल गणद्वारे तपासणी करण्यात यावी. प्रवेशद्वारावर अन्य व्यवस्था असाव्यात. मास्क व शारीरिक अंतर नियमांचे पालन होणे आवश्यक आहे, असेही आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत.

होम आयसोलेशनसाठी असे आहेत निर्बंध...

होम आयसोलेशनची परवानगी घ्यायची झाल्यास संबंधित रुग्णाचा वैद्यकीय पाठपुरावा करणाऱ्या डाॅक्टरांची माहिती स्थानिक प्रशासनास दिल्यानंतरच परवानगी मिळेल.

होम आयसोलेशन झालेल्या घराच्या अग्रगण्य भागावर १४ दिवस होम क्वारंटाइन असे फलक स्थानिक स्वराज्य संस्थेने लावावेत. त्यावर होम आयसोलेशनचा कालावधी नमूद करणे आवश्यक.

होम आयसोलेशन झालेल्या पाॅझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसेच घराबाहेर फिरण्यास प्रतिबंध असेल.

हाेम आयसोलेशनसंदर्भातील प्रस्तुत निर्बंधाचे उल्लंघन झाल्यास संबंधित रुग्णास तात्काळ निर्धारित केलेल्या जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात येईल.