शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST

नागरसोगा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. दरम्यान, या भागातील छोट्या-मोठ्या व्यवसायांना खीळ ...

नागरसोगा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. दरम्यान, या भागातील छोट्या-मोठ्या व्यवसायांना खीळ बसली आहे. आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांपुढे भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण संकटात सापडले आहे.

गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरू झाले आहे. मध्यंतरीच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मात्र, आता गत महिन्यापासून पुन्हा संसर्ग वाढू लागला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. सध्या हॉटेल, पानटपरी चालकांना व्यवसाय करणाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत. नागरसोगा, दापेगाव, हारेगाव, जवळगा, तुंगी, गाढवेवाडी, गुबाळ, औसा, चिंचोली परिसरातील छोटे- मोठे व्यावसायिक, शेतकरी, भाजीपाला उत्पादक हे आठवडी बाजारात भाजीपाल्याची तसेच अन्य साहित्याची खरेदी-विक्री करीत असतात. मात्र, आठवडी बाजार बंद पडल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

औसा तालुक्यातील नागरसोगा व परिसरातील दापेगाव, जवळगा, गाढवेवाडी येथील असंघटित क्षेत्रातील कुशल कामगार औसा, लातूर अशा शहरात जाऊन बांधकामावर मजुरी करतात. त्यावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह असतो. मात्र, आता हाताला काम नसल्याने मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे शेतकऱ्यांसह मजूरही संकटात सापडले असल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाने योग्य नियोजन करावे...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन नियम अधिक कडक करून अंमलबजावणी करीत आहे. मात्र, त्याचा छोट्या व्यावसायिकांना फटका बसत आहे. आम्ही खरेदी केलेला कच्चा माल घरातच पडून आहे. त्यामुळे भांडवलही गुंतले आहे. परिणामी, आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी येथील व्यापारी परमेश्वर कोळी यांनी केली.

डिझेलचा खर्चही निघेना...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रवासी वाहतुकीला मर्यादा घालण्यात आली आहे. त्यातून डिझेलचा खर्चही निघत नाही. बँकेचा हप्ता वेळेवर भरता येत नाही. कुठे मजुरी करावी म्हटले तर हाताला काम मिळत नाही. प्रशासनाने यातून मार्ग काढावा, अशी मागणी वाहन चालक मुक्तार शेख यांनी केली.