शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 7:11 PM

पेरणीसाठी म्हैस विकून खत आणि बियाणे आणले होते.

ठळक मुद्दे पाऊसच नसल्याने पेरणीही झाली नाही़

लातूर : तालुक्यातील रायवाडी येथे नापिकी व कर्जबाजारीणास कंटाळून एका शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, रायवाडी येथील शिवाजी ज्ञानोबा पवार (४५) यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. त्यांना लातूरच्या शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शिवाजी पवार यांना मयत घोषित केले. रूग्णालयातून आलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, नातेवाईक म्हणाले, शिवाजी पवार यांना रायवाडी शिवारात दोन एकर जमीन असून, यावर्षी पाऊस नसल्याने पेरणीही झाली नाही. सोसायटी व खाजगी बँकेचे त्यांच्यावर कर्ज आहे़ शिवाय, एक मुलगीही लग्नाला आली आहे. दोन मुले मजूरी करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पेरणीसाठी म्हैस विकून खत आणि बियाणे आणले होते. मात्र पाऊसच नसल्याने पेरणीही झाली नाही़ आर्थिक विवंचनेत येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :laturलातूरfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेती