शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बायोगॅस, सेंद्रिय खत निर्मितीवर शेतकऱ्यांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST

केंद्र शासनाच्यावतीने गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढावा तसेच ...

केंद्र शासनाच्यावतीने गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढावा तसेच शेतक-यांना चांगले सेंद्रिय खत मिळावे, तसेच पर्यावरणाचा होणारा -हास टाळावा म्हणून ही योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यास १२ हजार, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांस १३ हजार रुपये अनुदान देण्यात येते. याशिवाय, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून प्रत्येक लाभार्थ्यास ५ हजार अनुदान दिले जाते. तसेच जे लाभार्थी शौचालय जोडणी करतील, त्यांना १६०० रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्यात येते.

या योजनेमुळे कमी खर्चात शेतक-यांना चांगल्या पध्दतीचे सेंद्रिय खत उपलब्ध होते. त्याचबरोबर लाकूड, गोव-यांचा जळण म्हणून वापर कमी होत आहे. २०२१-२२ मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुधन असलेल्या शेतक-यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे.

तीन वर्षांत ३३६ जणांनी घेतला लाभ...

केंद्र शासनाच्या नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रमाचा जिल्ह्यातील एकूण ३३६ शेतक-यांनी लाभ घेतला आहे. त्यात २०१८-१९ मध्ये ११८, २०१९-२० मध्ये ९८, तर २०२०-२१ मध्ये १२० जणांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षासाठी १५० असे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी सांगितले.

योजनेचा लाभ घ्यावा...

ज्या शेतक-यांकडे पशुधन आहे, अशा इच्छुक शेतक-यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ उतारा, जनावरे असल्याचे स्वयंघोषणापत्र, आधारकार्ड, बँक पासबुक ही कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.