शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यांतील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

जिल्ह्यातील हरंगुळ ७८.८, मुरुड ७९.८, तांदुळजा ६६.०, भादा ६५.३ आणि निलंगा या महसूल मंडळात ६८.८ मिमी पाऊस होऊन ...

जिल्ह्यातील हरंगुळ ७८.८, मुरुड ७९.८, तांदुळजा ६६.०, भादा ६५.३ आणि निलंगा या महसूल मंडळात ६८.८ मिमी पाऊस होऊन अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात तसेच गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश साठवण तलाव भरले आहेत. नदीनाल्यांना पाणी असून मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे. शिवाय मांजरा धरण ते साई नागझरी पर्यंतचे सर्व बॅरेजेस ओरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प असून त्यापैकी रेणा, व्हटी, साकोळ,घरणी, मसलगा, तिरू, देवर्जन हे सात मध्यम प्रकल्प भरले आहेत. तावरजा मध्यम प्रकल्प मात्र अद्याप भरलेला नाही. रेणा मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडून दुसऱ्यांदा विसर्ग करण्यात आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस....

जिल्ह्यात आतापर्यंत ८०५.४ मिमी पाऊस झाला आहे. जो की वार्षिक सरासरी पेक्षा अधिक आहे. वार्षिक सरासरी ७८९.५५ मिमी असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८०५.३ मिमी. पाऊस झाला आहे. लातूर तालुक्यात आतापर्यंत ७९६, औसा ७४०, अहमदपूर ९३५, निलंगा ६८२, उदगीर ८८८, चाकूर ८२२ रेणापूर, ८९२, देवणी ७४४, शिरूर आनंतपाळ ७२९ आणि जळकोट तालुक्यात ९२७ मिमी पाऊस झाला आहे.

गेल्या चोवीस तासांतील पाऊस...

गेल्या चोवीस तासांमध्ये लातूर जिल्ह्यात २५.४ मिमी पाऊस झाला आहे. त्यात लातूर तालुक्यात ५०.६०, औसा ३०.४, अहमदपूर २५.७, निलंगा ४०.५, उदगीर १.९, चाकूर २०.९ रेणापूर १०.५, देवणी १७.९६, आणि जळकोट तालुक्यात १.५ मिमी पाऊस झाला आहे. कोण जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 25.4 मिमी पाऊस झाला असून त्यात तांदुळजा,मुरुड, हरंगुळ, भादा आणि निलंगा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

अधून-मधून पावसाच्या सरी सुरूच....

जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरूच असून शुक्रवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होत्या. गुरुवारी रात्री लातूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने शेत शिवारामध्ये पाणी झाले आहे. शिवाय, सोयाबीन काढणीला आले, परंतु शेतात पाणी असल्याने ते काढता येत नाही, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अतिपावसामुळे खरिपाच्या पिकाचे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी विविध पक्ष संघटनांकडून होत आहे.