शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मुंबईला ड्यूटी, नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : गतवर्षी लातूर जिल्ह्यातील चारशे वाहक-चालकांनी मुंबई बेस्टला सेवा दिली होती. आता परत शंभर चालक-वाहकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : गतवर्षी लातूर जिल्ह्यातील चारशे वाहक-चालकांनी मुंबई बेस्टला सेवा दिली होती. आता परत शंभर चालक-वाहकांची नियुक्ती मुंबईसाठी केली आहे. नकार असतानाही त्यांची ड्यूटी ‘बेस्ट’ला लावली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा या पाच आगारांतील प्रत्येकी दहा चालक व दहा वाहकांना मुंबईची ड्यूटी देण्यात आली आहे. यातील बहुतांश चालक, वाहकांनी मुंबईला जाण्याला नकार दिला आहे. परंतु, प्रशासनाचा आदेश असल्याने यांतील बरेचजण मुंबईला गेले आहेत. पुण्या-मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांत चिंता आहे. कुटुंबीयांनी आणि वाहक-चालकांनी नापसंती दर्शविली. परंतु, वरिष्ठांकडून लेखी सूचना आल्यामुळे या वाहक-चालकांना जावे लागले आहे.

लातूर डेपोतील दहापैकी सात वाहक-चालक ड्यूटीला गेले असल्याचे आगार कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर डेपोतीलही काही वाहक-चालक कर्तव्य म्हणून गेले आहेत. गतवर्षी जिल्ह्यातून दोनशे वाहक-चालक गेले होते. यंदा शंभर वाहक-चालकांची नियुक्ती केली आहे. त्यांतील कितीजण गेले, याबाबतचा आकडा अद्याप स्पष्ट नाही.

गतवर्षी २०० वाहक आणि २०० चालक अशा एकूण ४०० कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविण्यात आले होते. त्यांपैकी सुदैवाने कोणालाही त्रास अथवा कोरोनाची लागण झाली नाही. यंदा ५० वाहक आणि ५० चालकांना पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक डेपोतील १० वाहक आणि चालकांना पाठविण्याचे निश्चित केले आहे. त्यांतील काहीजणांना ऑर्डरही देण्यात आल्या आहेत.

गतवर्षी कोरोनाकाळात मुंबईला सेवा दिली. यंदाही पाठविण्यात येईल, असे निर्देश होते; परंतु, मुंबईला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता काही वर्षे सेवा राहिली आहे. कोरोनाकाळात बाहेरगावी दीर्घ कालावधीसाठी जाणे प्रकृतीसाठी चांगले नाही; म्हणून मी नकार दिलेला आहे.

- चालक