शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

करपा रोगाने बटाटा, हाळद पीक धाेक्यात, उत्पादनात हाेणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ परिसरात काही शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात बटाटा, आद्रक, हळदीचे उत्पादन घेण्यासाठी माेठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ परिसरात काही शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात बटाटा, आद्रक, हळदीचे उत्पादन घेण्यासाठी माेठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र, हळद आणि बटाट्यावर तांबेरा पिवळसर राेगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत आला आहे. परिणामी, यंदा बटाटा, हळद आणि आद्रकाचे उत्पादन घटणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली. त्याचबराेबर परतीच्या पावसानेही जिल्ह्याला झाेडपून काढले. यामुळे तालुक्यातील नदी-नाले, पाझर तलाव, विंधन विहिरी आणि मध्यम, लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली. याच पाण्यावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवनवे प्रयाेग करत उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. डिगाेळ शिवारातही यंदा बटाटा, आद्रक, हळदीची लागवड माेठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या पिकावर तांबेरा, बुरशी राेगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक धाेक्यात आले आहे. हे पीक कसे वाचवायचे, हीच चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे. पाने पिवळी पडून जाग्यावरच करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

लातूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. यातून आर्थिक परिस्थिती सुधारेल म्हणून शेतकऱ्यांनी उसाची लागवड माेठ्या प्रमाणावर केली आहे. बदलत्या तंत्राबरोबरच गेल्या काही वर्षांपासून रोगांचा प्रादुर्भाव कायम राहिला आहे. निलंगा तालुक्यात तांबेरा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात झाला आहे. उसावर तांबेरा हा कवकजन्य रोग बुरशीमुळे होत असल्याचे समाेर आले आहे. उसाच्या पानावर सुरुवातीला तांबडे, काळे ठिपके पडतात. त्यानंतर ठिपक्यांचा आकार वाढत जातो आणि उसाच्या पानांचा भुगा होताे. उसाची पाने तांबडी पडल्याने पानाच्या खालील बाजूस तांबूस पिटळी पडते. परिणामी, पीकच धाेक्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेत आहे. यातून उसाची वाढ खुंटत जाते अन् वजन कमी भरते. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खराब झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार...

डिगोळ येथील साेसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी एक एकरात बटाटा, एका एकरमध्ये आद्रक आणि एक एकरावर हळदीचे पीक घेतले आहे. डोंगरभागातील शेतीमध्ये बटाटा पिकाचे प्रमाण अधिक आहे. सतत रासायनिक खतांचा वापर, युरियाचा अधिक वापर यामुळे तांबेरा रोग पडला आहे. असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. यावर आता औषधांची फवारणी करण्याची गरज आहे. याबाबत आम्ही माहिती घेत असून, शेतकऱ्यांना फवारणीसाठी मार्गदर्शन करू, शिवाय वेळाेवेळी माहती देऊ, असे कृषी सहायक संभाजी सूर्यवंशी म्हणाले.