शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

संततधारेमुळे डोंगरशेळकीचा पाझर तलाव फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST

उदगीर/ डोंगरशेळकी : चार दिवसांपासून सतत होत असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील डोंगरशेळकी येथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. ...

उदगीर/ डोंगरशेळकी : चार दिवसांपासून सतत होत असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील डोंगरशेळकी येथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. दरम्यान, शनिवारी दुपारी हा तलाव फुटला. त्यामुळे तलावाखालील जमीन व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी महसूल कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

उदगीर तालुक्यात सतत संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे डोंगरशेळकी येथील पाझर तलाव भरला. दरम्यान, शनिवारी सकाळी या भागातील शेतकरी भारतसिंह ठाकूर यांनी पाझर तलावाला भगदाड पडल्याचे पाहून पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सरपंच नागरबाई कांबळे व पोलीस पाटील भालचंद्र शेळके यांना तत्काळ कळविले. उपसभापती मरलापल्ले यांनी हा पाझर तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे, महसूल व पाटबंधारे विभागाला कळविले.

ही माहिती मिळताच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तलावाला पडलेले भगदाड बुजविण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने कसोशीने प्रयत्न केला. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो अयशस्वी झाला. दुपारी १२.१५च्या सुमारास तलाव फुटला. त्याची माहिती तलाठी दत्तात्रय मोरे व पोलीस पाटील भालचंद्र शेळके यांनी ग्रामस्थांना दिली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तलाव फुटल्यामुळे तलावाखालील जवळपास ५० हेक्टर जमिनीचे व पिकांचे नुकसान झाले. तसेच पाच विहिरी बुजल्या असून, मोटारी, स्प्रिंकलर सेट व पाईपचे नुकसान झाल्याची माहिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांनी दिली.

तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंडल अधिकारी संतोष चव्हाण, पंडित जाधव, पाटबंधारे विभागाचे नाईक, सरपंच नागरबाई कांबळे, उपसरपंच गणपत पवार, माजी सरपंच ज्ञानोबा मुंडे, पोलीस राहुल पुंड, अभिषेक बरूरे, शेतकरी भरतसिंह ठाकूर, पोलीस पाटील भालचंद्र शेळके आदी उपस्थित होते.

पंचनामे करण्याच्या सूचना...

हा तलाव २००५ साली बांधण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेतून सन २०१५मध्ये तलावाची दुरूस्ती करण्यात आली होती, असे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. जमिनी व पीक नुकसानासह पाण्यात वाहून गेलेेेल्या साहित्याचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.