शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : खरीप गेल्याने रबीचा पेरा झालाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 12:43 IST

दुष्काळवाडा : औसा तालुक्यातील शिवली या गावचा शिवार काही भागात मुरमाड, तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या जमिनीचा आहे.

- महेबूब बक्षी, शिवली, ता. औसा, जि. लातूर

औसा तालुक्यातील शिवली या गावचा शिवार काही भागात मुरमाड, तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या जमिनीचा आहे. तालुक्याला दुष्काळ नवा नाही. यावर्षीही खरिपातून खर्च निघाला नाही. त्यामुळे रबीची पेरणी झालीच नाही. पावसाने हुलकावणी दिल्याने काही ठिकाणच्या फळबागाही वाळून गेल्या आहेत. एकुणच दुष्काळ या तालुक्याची पाठ सोडायला तयार नाही. 

यावर्षी खरिपाचे केवळ १० टक्के उत्पादन झाले. उडीद, सोयाबीन, मूग या पिकांनी दगा दिला. पाण्याचे फारसे स्रोत नसल्याने रबीची पेरणी झाली नाही. जे बागायतदार शेतकरी आहेत, त्यांनाही मजुरी करण्याची वेळ आली आहे. शिवलीची लोकसंख्या ४ हजार ११४ आहे. २ हजार ४०० हेक्टरचा शिवार असून, पेरणीयोग्य क्षेत्र हे २ हजार २०२ हेक्टर्स आहे. खरिपात प्रामुख्याने ६९० हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीचा खर्चही निघाला नाही. 

पाऊस नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी रबीचा पेराही केला नाही. दरवर्षी या भागात शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागतात. केलेला खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पारंपरिक पिकांना बगल देत काही शेतकऱ्यांनी डाळिंब, पपई, आंबा, बोर, लिंबूच्या बागा लावल्या. मात्र, माळरानावर पाण्याअभावी फळबागा वाळत आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने शेतातील उत्पादन घटले. परिणामी, अनेक शेतकरी मोलमजुरी करीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. 

सर्व पिके नष्ट झाली तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे़ पीक कापणीच्या तुलनेत खरिपातील पिकांचा उतारा ३० टक्क्यांनी घटला आहे़ पाण्याची स्थिती चिंताजनक आहे़ शिवली परिसरातील जमीन ही हलकी असल्याने येथील सर्व पिके नष्ट झाली आहेत़ त्याचबरोबर फळबागांचेही नुकसान झाले आहे़-एम़आऱ मोरे, तालुका कृषी अधिकारी

बळीराजा काय म्हणतो?मला २० एकर जमीन आहे. पाऊस चांगला असता तर जवळपास ६ लाखांचे उत्पादन होते. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जमीन पडीक पडली. शेतात सहा बोअर, दोन विहिरी असून त्या कोरड्याठाक आहेत. जनावरांना दुसऱ्याच्या शेतातून पाणी आणतो. सोयाबीनच्या एका बॅगला दोन क्विंटलचे उत्पादन निघाले. खर्च १५ हजार, तर उत्पन्न ६ हजार झाल्याने रबीच्या पेरणीचा विषय आला नाही. -गुरुवीर महावीर क्षीरसागर

शेतीत काय निघाले, हे विचारल्यास काय सांगावे हेच कळत नाही. अगोदरच जमिनी हलक्या. पाऊस चांगला झाला तर खरीप हाताला येते. यावर्षी कोरडवाहू जमिनीचे जणू वाळवंटच झाले आहे. सोयाबीन काढताना काड हलके निघाले. बियाणेच भरले नसल्याने वाऱ्याचा त्रासही झाला. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. -सोमनाथ जयदेव क्षीरसागर

दरवर्षी भादा महसूल मंडळात सर्वात कमी पाऊस पडतो. यावर्षी तर शेतातील खड्डेही भरले नाहीत. रिमझिम पावसाने पिके कशी तरी जगली. नंतर उघडीप दिल्याने हातचे पीक वाया गेले. पाऊसच नसल्यामुळे रबीची पेरणी अद्याप तरी झाली नाही. -किशोर इरपे

गावात ७० टक्के लोक शेती करतात. यावर्षी पाणीच नसल्याने जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही. शिवनी साठवण तलावाच्या पायथ्याशी माझी दहा एकर जमीन आहे. उत्पादन निघाले नसल्यामुळे आम्हा तिघा भावंडांनाही मोलमजुरी करावी लागत आहे. -असिफ शेख

काही आकडेवाडी : - लोकसंख्या : ४११४- मतदार : ३४००- हेक्टर्स गावचे भौगोलिक क्षेत्र : २४००- हेक्टर्स खरीप पेरणीयोग्य क्षेत्र : २२०२ - हेक्टर सोयाबीन : ७००- हेक्टर हायब्रीड : २२५- हेक्टर कापूस : ३५- हेक्टर तूर : ३१२- हेक्टर मूग : १५०- हेक्टर उडीद : ४०- हेक्टर फळबागा : १५८- औसा तालुक्यात यावर्षी झालेला पाऊस : ४४२.२२ मि.मी. 

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस