शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

Drought In Marathwada : खरीप गेल्याने रबीचा पेरा झालाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 12:43 IST

दुष्काळवाडा : औसा तालुक्यातील शिवली या गावचा शिवार काही भागात मुरमाड, तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या जमिनीचा आहे.

- महेबूब बक्षी, शिवली, ता. औसा, जि. लातूर

औसा तालुक्यातील शिवली या गावचा शिवार काही भागात मुरमाड, तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या जमिनीचा आहे. तालुक्याला दुष्काळ नवा नाही. यावर्षीही खरिपातून खर्च निघाला नाही. त्यामुळे रबीची पेरणी झालीच नाही. पावसाने हुलकावणी दिल्याने काही ठिकाणच्या फळबागाही वाळून गेल्या आहेत. एकुणच दुष्काळ या तालुक्याची पाठ सोडायला तयार नाही. 

यावर्षी खरिपाचे केवळ १० टक्के उत्पादन झाले. उडीद, सोयाबीन, मूग या पिकांनी दगा दिला. पाण्याचे फारसे स्रोत नसल्याने रबीची पेरणी झाली नाही. जे बागायतदार शेतकरी आहेत, त्यांनाही मजुरी करण्याची वेळ आली आहे. शिवलीची लोकसंख्या ४ हजार ११४ आहे. २ हजार ४०० हेक्टरचा शिवार असून, पेरणीयोग्य क्षेत्र हे २ हजार २०२ हेक्टर्स आहे. खरिपात प्रामुख्याने ६९० हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीचा खर्चही निघाला नाही. 

पाऊस नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी रबीचा पेराही केला नाही. दरवर्षी या भागात शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागतात. केलेला खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पारंपरिक पिकांना बगल देत काही शेतकऱ्यांनी डाळिंब, पपई, आंबा, बोर, लिंबूच्या बागा लावल्या. मात्र, माळरानावर पाण्याअभावी फळबागा वाळत आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने शेतातील उत्पादन घटले. परिणामी, अनेक शेतकरी मोलमजुरी करीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. 

सर्व पिके नष्ट झाली तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे़ पीक कापणीच्या तुलनेत खरिपातील पिकांचा उतारा ३० टक्क्यांनी घटला आहे़ पाण्याची स्थिती चिंताजनक आहे़ शिवली परिसरातील जमीन ही हलकी असल्याने येथील सर्व पिके नष्ट झाली आहेत़ त्याचबरोबर फळबागांचेही नुकसान झाले आहे़-एम़आऱ मोरे, तालुका कृषी अधिकारी

बळीराजा काय म्हणतो?मला २० एकर जमीन आहे. पाऊस चांगला असता तर जवळपास ६ लाखांचे उत्पादन होते. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जमीन पडीक पडली. शेतात सहा बोअर, दोन विहिरी असून त्या कोरड्याठाक आहेत. जनावरांना दुसऱ्याच्या शेतातून पाणी आणतो. सोयाबीनच्या एका बॅगला दोन क्विंटलचे उत्पादन निघाले. खर्च १५ हजार, तर उत्पन्न ६ हजार झाल्याने रबीच्या पेरणीचा विषय आला नाही. -गुरुवीर महावीर क्षीरसागर

शेतीत काय निघाले, हे विचारल्यास काय सांगावे हेच कळत नाही. अगोदरच जमिनी हलक्या. पाऊस चांगला झाला तर खरीप हाताला येते. यावर्षी कोरडवाहू जमिनीचे जणू वाळवंटच झाले आहे. सोयाबीन काढताना काड हलके निघाले. बियाणेच भरले नसल्याने वाऱ्याचा त्रासही झाला. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. -सोमनाथ जयदेव क्षीरसागर

दरवर्षी भादा महसूल मंडळात सर्वात कमी पाऊस पडतो. यावर्षी तर शेतातील खड्डेही भरले नाहीत. रिमझिम पावसाने पिके कशी तरी जगली. नंतर उघडीप दिल्याने हातचे पीक वाया गेले. पाऊसच नसल्यामुळे रबीची पेरणी अद्याप तरी झाली नाही. -किशोर इरपे

गावात ७० टक्के लोक शेती करतात. यावर्षी पाणीच नसल्याने जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही. शिवनी साठवण तलावाच्या पायथ्याशी माझी दहा एकर जमीन आहे. उत्पादन निघाले नसल्यामुळे आम्हा तिघा भावंडांनाही मोलमजुरी करावी लागत आहे. -असिफ शेख

काही आकडेवाडी : - लोकसंख्या : ४११४- मतदार : ३४००- हेक्टर्स गावचे भौगोलिक क्षेत्र : २४००- हेक्टर्स खरीप पेरणीयोग्य क्षेत्र : २२०२ - हेक्टर सोयाबीन : ७००- हेक्टर हायब्रीड : २२५- हेक्टर कापूस : ३५- हेक्टर तूर : ३१२- हेक्टर मूग : १५०- हेक्टर उडीद : ४०- हेक्टर फळबागा : १५८- औसा तालुक्यात यावर्षी झालेला पाऊस : ४४२.२२ मि.मी. 

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस