शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

Drought In Marathwada : खरीप गेल्याने रबीचा पेरा झालाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 12:43 IST

दुष्काळवाडा : औसा तालुक्यातील शिवली या गावचा शिवार काही भागात मुरमाड, तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या जमिनीचा आहे.

- महेबूब बक्षी, शिवली, ता. औसा, जि. लातूर

औसा तालुक्यातील शिवली या गावचा शिवार काही भागात मुरमाड, तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या जमिनीचा आहे. तालुक्याला दुष्काळ नवा नाही. यावर्षीही खरिपातून खर्च निघाला नाही. त्यामुळे रबीची पेरणी झालीच नाही. पावसाने हुलकावणी दिल्याने काही ठिकाणच्या फळबागाही वाळून गेल्या आहेत. एकुणच दुष्काळ या तालुक्याची पाठ सोडायला तयार नाही. 

यावर्षी खरिपाचे केवळ १० टक्के उत्पादन झाले. उडीद, सोयाबीन, मूग या पिकांनी दगा दिला. पाण्याचे फारसे स्रोत नसल्याने रबीची पेरणी झाली नाही. जे बागायतदार शेतकरी आहेत, त्यांनाही मजुरी करण्याची वेळ आली आहे. शिवलीची लोकसंख्या ४ हजार ११४ आहे. २ हजार ४०० हेक्टरचा शिवार असून, पेरणीयोग्य क्षेत्र हे २ हजार २०२ हेक्टर्स आहे. खरिपात प्रामुख्याने ६९० हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीचा खर्चही निघाला नाही. 

पाऊस नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी रबीचा पेराही केला नाही. दरवर्षी या भागात शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागतात. केलेला खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पारंपरिक पिकांना बगल देत काही शेतकऱ्यांनी डाळिंब, पपई, आंबा, बोर, लिंबूच्या बागा लावल्या. मात्र, माळरानावर पाण्याअभावी फळबागा वाळत आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने शेतातील उत्पादन घटले. परिणामी, अनेक शेतकरी मोलमजुरी करीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. 

सर्व पिके नष्ट झाली तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे़ पीक कापणीच्या तुलनेत खरिपातील पिकांचा उतारा ३० टक्क्यांनी घटला आहे़ पाण्याची स्थिती चिंताजनक आहे़ शिवली परिसरातील जमीन ही हलकी असल्याने येथील सर्व पिके नष्ट झाली आहेत़ त्याचबरोबर फळबागांचेही नुकसान झाले आहे़-एम़आऱ मोरे, तालुका कृषी अधिकारी

बळीराजा काय म्हणतो?मला २० एकर जमीन आहे. पाऊस चांगला असता तर जवळपास ६ लाखांचे उत्पादन होते. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जमीन पडीक पडली. शेतात सहा बोअर, दोन विहिरी असून त्या कोरड्याठाक आहेत. जनावरांना दुसऱ्याच्या शेतातून पाणी आणतो. सोयाबीनच्या एका बॅगला दोन क्विंटलचे उत्पादन निघाले. खर्च १५ हजार, तर उत्पन्न ६ हजार झाल्याने रबीच्या पेरणीचा विषय आला नाही. -गुरुवीर महावीर क्षीरसागर

शेतीत काय निघाले, हे विचारल्यास काय सांगावे हेच कळत नाही. अगोदरच जमिनी हलक्या. पाऊस चांगला झाला तर खरीप हाताला येते. यावर्षी कोरडवाहू जमिनीचे जणू वाळवंटच झाले आहे. सोयाबीन काढताना काड हलके निघाले. बियाणेच भरले नसल्याने वाऱ्याचा त्रासही झाला. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. -सोमनाथ जयदेव क्षीरसागर

दरवर्षी भादा महसूल मंडळात सर्वात कमी पाऊस पडतो. यावर्षी तर शेतातील खड्डेही भरले नाहीत. रिमझिम पावसाने पिके कशी तरी जगली. नंतर उघडीप दिल्याने हातचे पीक वाया गेले. पाऊसच नसल्यामुळे रबीची पेरणी अद्याप तरी झाली नाही. -किशोर इरपे

गावात ७० टक्के लोक शेती करतात. यावर्षी पाणीच नसल्याने जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही. शिवनी साठवण तलावाच्या पायथ्याशी माझी दहा एकर जमीन आहे. उत्पादन निघाले नसल्यामुळे आम्हा तिघा भावंडांनाही मोलमजुरी करावी लागत आहे. -असिफ शेख

काही आकडेवाडी : - लोकसंख्या : ४११४- मतदार : ३४००- हेक्टर्स गावचे भौगोलिक क्षेत्र : २४००- हेक्टर्स खरीप पेरणीयोग्य क्षेत्र : २२०२ - हेक्टर सोयाबीन : ७००- हेक्टर हायब्रीड : २२५- हेक्टर कापूस : ३५- हेक्टर तूर : ३१२- हेक्टर मूग : १५०- हेक्टर उडीद : ४०- हेक्टर फळबागा : १५८- औसा तालुक्यात यावर्षी झालेला पाऊस : ४४२.२२ मि.मी. 

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस