शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : खरीप गेल्याने रबीचा पेरा झालाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 12:43 IST

दुष्काळवाडा : औसा तालुक्यातील शिवली या गावचा शिवार काही भागात मुरमाड, तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या जमिनीचा आहे.

- महेबूब बक्षी, शिवली, ता. औसा, जि. लातूर

औसा तालुक्यातील शिवली या गावचा शिवार काही भागात मुरमाड, तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या जमिनीचा आहे. तालुक्याला दुष्काळ नवा नाही. यावर्षीही खरिपातून खर्च निघाला नाही. त्यामुळे रबीची पेरणी झालीच नाही. पावसाने हुलकावणी दिल्याने काही ठिकाणच्या फळबागाही वाळून गेल्या आहेत. एकुणच दुष्काळ या तालुक्याची पाठ सोडायला तयार नाही. 

यावर्षी खरिपाचे केवळ १० टक्के उत्पादन झाले. उडीद, सोयाबीन, मूग या पिकांनी दगा दिला. पाण्याचे फारसे स्रोत नसल्याने रबीची पेरणी झाली नाही. जे बागायतदार शेतकरी आहेत, त्यांनाही मजुरी करण्याची वेळ आली आहे. शिवलीची लोकसंख्या ४ हजार ११४ आहे. २ हजार ४०० हेक्टरचा शिवार असून, पेरणीयोग्य क्षेत्र हे २ हजार २०२ हेक्टर्स आहे. खरिपात प्रामुख्याने ६९० हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीचा खर्चही निघाला नाही. 

पाऊस नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी रबीचा पेराही केला नाही. दरवर्षी या भागात शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागतात. केलेला खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पारंपरिक पिकांना बगल देत काही शेतकऱ्यांनी डाळिंब, पपई, आंबा, बोर, लिंबूच्या बागा लावल्या. मात्र, माळरानावर पाण्याअभावी फळबागा वाळत आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने शेतातील उत्पादन घटले. परिणामी, अनेक शेतकरी मोलमजुरी करीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. 

सर्व पिके नष्ट झाली तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे़ पीक कापणीच्या तुलनेत खरिपातील पिकांचा उतारा ३० टक्क्यांनी घटला आहे़ पाण्याची स्थिती चिंताजनक आहे़ शिवली परिसरातील जमीन ही हलकी असल्याने येथील सर्व पिके नष्ट झाली आहेत़ त्याचबरोबर फळबागांचेही नुकसान झाले आहे़-एम़आऱ मोरे, तालुका कृषी अधिकारी

बळीराजा काय म्हणतो?मला २० एकर जमीन आहे. पाऊस चांगला असता तर जवळपास ६ लाखांचे उत्पादन होते. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जमीन पडीक पडली. शेतात सहा बोअर, दोन विहिरी असून त्या कोरड्याठाक आहेत. जनावरांना दुसऱ्याच्या शेतातून पाणी आणतो. सोयाबीनच्या एका बॅगला दोन क्विंटलचे उत्पादन निघाले. खर्च १५ हजार, तर उत्पन्न ६ हजार झाल्याने रबीच्या पेरणीचा विषय आला नाही. -गुरुवीर महावीर क्षीरसागर

शेतीत काय निघाले, हे विचारल्यास काय सांगावे हेच कळत नाही. अगोदरच जमिनी हलक्या. पाऊस चांगला झाला तर खरीप हाताला येते. यावर्षी कोरडवाहू जमिनीचे जणू वाळवंटच झाले आहे. सोयाबीन काढताना काड हलके निघाले. बियाणेच भरले नसल्याने वाऱ्याचा त्रासही झाला. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. -सोमनाथ जयदेव क्षीरसागर

दरवर्षी भादा महसूल मंडळात सर्वात कमी पाऊस पडतो. यावर्षी तर शेतातील खड्डेही भरले नाहीत. रिमझिम पावसाने पिके कशी तरी जगली. नंतर उघडीप दिल्याने हातचे पीक वाया गेले. पाऊसच नसल्यामुळे रबीची पेरणी अद्याप तरी झाली नाही. -किशोर इरपे

गावात ७० टक्के लोक शेती करतात. यावर्षी पाणीच नसल्याने जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही. शिवनी साठवण तलावाच्या पायथ्याशी माझी दहा एकर जमीन आहे. उत्पादन निघाले नसल्यामुळे आम्हा तिघा भावंडांनाही मोलमजुरी करावी लागत आहे. -असिफ शेख

काही आकडेवाडी : - लोकसंख्या : ४११४- मतदार : ३४००- हेक्टर्स गावचे भौगोलिक क्षेत्र : २४००- हेक्टर्स खरीप पेरणीयोग्य क्षेत्र : २२०२ - हेक्टर सोयाबीन : ७००- हेक्टर हायब्रीड : २२५- हेक्टर कापूस : ३५- हेक्टर तूर : ३१२- हेक्टर मूग : १५०- हेक्टर उडीद : ४०- हेक्टर फळबागा : १५८- औसा तालुक्यात यावर्षी झालेला पाऊस : ४४२.२२ मि.मी. 

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस