शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

'खासदारांची संख्या दुप्पट करून महिलांना आरक्षण द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 20:37 IST

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची मागणी

लातूर : काँग्रेस महाआघाडीतील घटक पक्ष प्रामाणिकपणे लढले तर सत्ता स्थापन करता येईल, अशी संख्या महाआघाडीकडे असेल, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी मंगळवारी लातूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. महाआघाडीमुळे भाजपाला पुढील निवडणूक अवघड जाईल. सत्ता स्थापन करता येईल, इतक्या संख्येने महाआघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतात, असं चाकूरकर यांनी म्हटलं. खासदारांची संख्या दुप्पट करून महिलांनाआरक्षण देण्याची मागणी चाकूरकर यांनी केली.  देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकसभा, राज्यसभेचे जितके सभासद होते, तितकेच आजही आहेत. १८ लाख लोकांमागे लोकसभेचा एक मतदारसंघ आहे. तर ब्रिटनमध्ये ६० हजार लोकसंख्येमागे एक मतदारसंघ आहे. सबंध देशात लोकसभा, राज्यसभा व राज्यांची विधिमंडळे यांच्या सभासदांची एकूण सभासद संख्या ६ हजार आहे. एकंदर, लोकसभा व राज्यसभेच्या सभासदांची संख्या दुपटीने वाढवून महिलांनाआरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये लोकसभेचे कामकाज करावे. लोकसभेच्या दालनात राज्यसभेच्या सदस्यांसाठी जागा करता येईल. त्यामुळे संसदेच्या उपलब्ध जागेतच सर्वांची बैठक व्यवस्था होऊ शकते. आजची देशाची लोकसंख्या लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी वाढविण्याची गरज असल्याचेही चाकूरकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राफेलवरुन निर्माण झालेल्या वादंगावरदेखील भाष्य केलं. ५०० कोटींच्या राफेलची किंमत १६०० कोटी केली जात असेल तर संशयाला जागा आहे. त्याबद्दल करण्यात आलेल्या चौकशीच्या मागणीला सरकारने सामोरे गेले पाहिजे. काँग्रेसने ७० वर्षांत काय केले, हा प्रश्न विचारणाऱ्यांनी अन्नसुरक्षा, रोजगार हमी आणि सर्वच क्षेत्रातील प्रगतीकडे पाहावे. काँग्रेसने जमीनदारी नष्ट केली. कायद्याचे राज्य आणले. राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिले, असेही चाकूरकर यांनी सांगितले. पक्षाचा आदेश असेल तर लढेन... लातूर लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेस तर उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी, असे सध्याचे जागा वाटप आहे. परंतु, उस्मानाबादमध्ये काँग्रेसकडून शिवराज पाटील चाकूरकर यांनी लढावे, अशी मागणी तेथील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून होत आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चाकूरकर म्हणाले, पक्षाने मला न मागता भरपूर दिले आहे. मी काही मागणार नाही. उभे राहण्याचा आदेश दिला तर लढेन. मित्रांत भांडणे लावू नका...चाकूरकर कुटुंबियातून विधानसभेला कोण, या प्रश्नावर चाकूरकर यांनी प्रतिप्रश्न केला, आता मतदारसंघही तुम्हीच सांगा. शेवटी ते म्हणाले, चर्चा घडवू नका. मित्रांत भांडणे लावू नका. 

टॅग्स :ParliamentसंसदWomenमहिलाMember of parliamentखासदारcongressकाँग्रेसShivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरreservationआरक्षण