शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'पशुधन विकू नका; छावणीत आणून सोडा'; 'त्यांनी' शेती विकून पशुधनासाठी उभारली चारा छावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 17:58 IST

राज्यात दुष्काळाने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

लातूर : शासनाच्या मदतीशिवाय स्वत:ची काही जमीन विकून पशुधन वाचविण्यासाठी कवठा येथील शेतकरी विनायकराव पाटील यांनी मराठवाडास्तरीय जनावरांच्या चारा छावणीचा प्रकल्प हाती घेतला आहे. २० मार्चपासून छावणी सुरू करण्यात येणार असून, पशुधन विकू नका, छावणीत आणून सोडा, मी त्यांचा सांभाळ करतो, असे आवाहन पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

राज्यात दुष्काळानेशेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. खरिपाची पिके गेली रबीची पेरणी झाली नाही. घरात माल नाही आणि खिशात पैसा नाही, जनावरांना चारा नाही. तरुण मुलांच्या हाती रोजगार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावे कसे? असा सवाल उपस्थित करीत उमरगा तालुक्यातील कवठा येथील शेतकरी विनायकराव पाटील यांनी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठवाडास्तरीय चारा छावणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी जनावरे न विकता या छावणीत आणून सोडावीत. असे आवाहन त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केले आहे. चारा छावणीमध्ये दररोज पोटभर चारा व एक किलो पशुखाद्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या गायी-म्हशींचे दूध स्थानिक डेअरीत देऊन त्याचे बिल पशु मालकांच्या नावावर काढण्यात येईल.  दूर अंतरावरील शेतकरी किंवा सालगड्याची निवास-भोजनाची सोय करण्यात येणार आहे.

यापूर्वीही घर विकून चालविली चारा छावणीविनायक पाटील हे अखंडपणे समाजसेवा करीत असतात. स्वत: शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या दुखाची जाणीव आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे म्हणून ते नुसत्या समाजसेवेच्या गप्पा मारीत नाहीत किंवा कोणाच्याही दारासमोर मदतीसाठी जात नाहीत. आतापर्यंत त्यांनी समाजकार्याची सुरुवात स्वत:पासून केली आहे. करतात.मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पशुधन कसायाच्या दावणीला जाऊ नये याकरिता त्यांनी यापूर्वीही आपले स्वत:चे घर विकून २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये पशुधनासाठी चारा छावणी चालविली होती. २०१६ मध्येही स्वखर्चाने राज्यभरातील १ हजार शेतकऱ्यांना बियाणे व खताचे वाटप केले होते. आता त्यांनी मराठवाडास्तरीय चारा छावणीचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाlaturलातूरFarmerशेतकरी