शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जळकोटातील न्यायालय सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST

जळकोट : जळकोट तालुक्याची निर्मिती होऊन २२ वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु, येथे अद्यापही तालुका न्यायालय स्थापन झाले नाही. ...

जळकोट : जळकोट तालुक्याची निर्मिती होऊन २२ वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु, येथे अद्यापही तालुका न्यायालय स्थापन झाले नाही. त्यामुळे येथे तालुका न्यायालय सुरू करण्यात यावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

लातूर जिल्ह्याच्या सीमेवर जळकोट तालुका आहे. येथील नागरिकांच्या सोयीसाठी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. तालुका निर्मिती होऊन २२ वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, येथे अद्यापही तालुका न्यायालय निर्माण करण्यात आले नाही. जिल्ह्यातील इतर नवीन तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय स्थापन झाले आहेत. परंतु, येथे न्यायालय स्थापन करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.

जळकोटात तालुका न्यायालय निर्माण करण्यात यावे, अशी नागरिकांची सततची मागणी आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे पाटील व अन्य मंडळींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन साकडे घातले होते. तेव्हा हालचाली सुुरू झाल्या आणि येथे तालुका न्यायालय मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येऊन काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला होता. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु, अद्यापही येथे तालुका न्यायालय सुरू झाले नाही.

नागरिकांची अडचण दूर करावी...

जळकोटातील तालुका न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या इमारतीसाठी शहरातील विविध ठिकाणच्या इमारतींची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यातील एक इमारत निश्चित करण्यात आली. त्यामुळे तालुका न्यायालय लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे. येथे न्यायालय नसल्याने अन्य तालुक्याच्या ठिकाणी खटले दाखल असलेल्यांना सतत हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी येथील तालुका न्यायालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.