शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विकासाच्या योजनांना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:28 IST

अल्पसंख्यांक हक्क दिन विशेष :  १३ कोटी २७ लाखांचा निधी धूळखात पडून आहे़

ठळक मुद्दे‘सबका साथ-सबका विकास’ची घोषणा हवेतच जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा मासिक आढावा़मंजुरी मिळून दोन वर्षे लोटली तरी अद्याप एकही काम सुरू झाले नाही़.

- आशपाक पठाण लातूर : अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सरकारी यंत्रणेची उदासिनता दिसून येत आहे़. दोन वर्षांपूर्वी लातूर, उदगीरसाठी मंजूर असलेला १३ कोटी २७ लाखांचा निधी धूळखात पडून आहे़ तर ग्रामीण भागातून अल्पसंख्यांक वसाहतीत करावयाच्या कामांचे प्रस्ताव पाठविले जात नाहीत, अशी ओरड आहे़ दरवर्षी अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या निमित्ताने १८ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून बैठक घेतली जाते़ मात्र, अंमलबजावणीची आकडेवारीच दिली जात नाही़.

पंतप्रधानांचे नवीन १५ कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना आणल्या आहेत़. एमएसडीपी योजनेंतर्गत दोन वर्षांपूर्वी लातूर शहरात मुलांचे वसतिगृह व शैक्षणिक संकुल बांधकाम करण्यासाठी ३ कोटी १० लाख व उदगीर शहरात मुलांचे वसतिगृह, मुलींची शाळा, आयटीआय इमारतीच्या कामसाठी १० कोटी १७ लाख मंजूर कण्यात आले आहेत़. दोन वर्षे लोटली तरी अद्याप एकही काम सुरू झाले नाही़. लातुरात मार्च २०१० मध्ये मंजुरी मिळालेल्या मुलींच्या वसतिगृहाचे काम २०१५ साली सुरू झाले़. तत्पूर्वी पाच वर्षे जागेसाठी आंदोलन झाले़ आता तीन वर्षे लोटले तरी अद्याप काम अपूर्णच आहे़ यावर्षीही काम पूर्ण होईल की नाही, असे चित्र दिसून येत आहे़ मार्च २०१९ पर्यंत सदरील इमारत प्रशासनाकडे वर्ग झाली तर जूनपासून प्रवेश होतील, अन्यथा पुन्हा वर्षभर वाट पहावी लागणार आहे़ कंत्राटदाराचे काम संथ  आहे़ मुलभूतसाठी लातूर, औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर पालिकेने प्रस्तावच दिला नसल्याने निधी मिळाला नाही़.

जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा मासिक आढावा़...लातूर जिल्ह्यात अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण, शहरी क्षेत्रात मुलभूत पायाभूत सोयी सुविधा योजनांवर  प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मासिक आढावा घेणे गरजेचे आहे़. शासनाने योजना दिल्या़ पण अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेची उदासिनता कधी दूर होणार असा सवाल  उपस्थित करून एमपीजेचे लातूर जिल्हा सचिव रजाउल्लाह खान म्हणाले, यासंदर्भात  न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे़ शासनाने अल्पसंख्यांक योजनांच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे़ केवळ जाहिरातबाजी करून दिशाभूल केली जात आहे़ .

औसा पालिकेचे कारभारी उदासिऩ़़...लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर हे शहर अल्पसंख्यांक बहुल आहेत़. याशिवाय, लोकसंख्येचा विचार करता औसा शहराचाही यात समावेश होऊ शकतो़. मात्र, पालिकेचे स्थानिक कारभारीच याबाबत उदासिन असल्याने गेल्या पाच वर्षांपासून मागणी होऊनही त्यांनी शासनाला प्रस्ताव दिला नाही़. ग्रामीण क्षेत्रात मुलभूत पायाभूत सुविधांसाठी शासनाने निधीची तरतूद केली असली तरी प्रस्ताव पाठविण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे़. लातूर तालुक्यातील दहापैकी काही गावांनी दोन वर्षांपूर्वी कामाचे प्रस्ताव दिले पण अजूनही त्यावर निर्णय झाला नाही.

टॅग्स :laturलातूरgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी