शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन सरसकट पीकविमा लागू करावा, शेतकरी संघटनेचा रास्तारोको

By हरी मोकाशे | Updated: September 5, 2023 13:23 IST

शेतकरी संघटनेच्यावतीने दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

वलांडी : पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा लागू करावा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी देवणी तालुक्यातील वलांडी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

हे रास्तारोको आंदोलन येथील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, तालुकाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे यांच्या नेतृत्वाखाली उदगीर- निलंगा राज्यमार्गावर करण्यात आले. यावेळी माजी आ. धर्माजी सोनकवडे, व्यापारी कमिटीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, रामविलास बंग, विलास वाघमारे, मालबा घोणसे, ज्ञानेश्वर भोसले, विवेक पाटील यांची भाषणे झाली. शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण डपलवाड, देविदास किवंडे, लामतुरे यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

दोन तास आंदोलन...शेतकरी संघटनेच्यावतीने दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बँकांनी शेतकऱ्यांची सक्तीची वसुली थांबवावी. बारा तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. ई- पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करावी. शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी