शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

एक रुपयाच्या पीकविम्याची कमाल; पेरा ३ लाख हेक्टरवर, विमा ४ लाख २९ हजार हेक्टरचा

By हरी मोकाशे | Updated: December 25, 2023 13:12 IST

यंदापासून शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम केवळ एक रुपया केल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्याकडे कल वाढला आहे.

लातूर : पीकविम्याच्या रकमेचा शेतकऱ्यांवर अधिक भार पडू नये म्हणून शासनाने केवळ एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. चालू रब्बी हंगामात ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरा झाला असला तरी प्रत्यक्षात पीकविमा ४ लाख २९ हजार ९९ हेक्टरचा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे एक रुपयाच्या पीकविम्याची कमाल अन् रब्बी हंगामाच्या क्षेत्रवाढीची धमाल झाली आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीइतका पाऊस झाला नाही. परिणामी, नदी-नाले वाहिले नाहीत. ओढेही खळाळले नाहीत. मध्यम प्रकल्पासह तलाव, विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात पेरा कमी होईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, त्यापेक्षा अधिक प्रमाणात पेरा झाला आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८० हजार हेक्टर आहे. आतापर्यंत ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला असून, तो २ लाख ७१ हजार ४६२ हेक्टर झाला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. यंदापासून शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम केवळ एक रुपया केल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्याकडे कल वाढला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचापीक - पेरा (हेक्टरमध्ये)ज्वारी - ३२५५७गहू - ८९६२मका - १५८१हरभरा - २७१४६२करडई - १६०८३जवस - ९९सूर्यफूल - ४५एकूण - ३३१६३०

५ लाख ३६ हजार १३८ शेतकऱ्यांनी भरला विमाजिल्ह्यातील ५ लाख ३६ हजार १३८ शेतकऱ्यांनी रब्बीतील हरभरा, ज्वारी अणि गहू या तीन पिकांचा हप्ता भरला आहे. विमा रकमेपोटी ५ लाख ३६ हजार १३६ रुपयांचा भरणा करीत ४ लाख २९ हजार ९९ हेक्टर क्षेत्राचे संरक्षण केले आहे. शेतकऱ्यांच्या हिश्श्यापोटी राज्य शासन ९२ कोटी ९१ लाख ११ हजार ९५३ रुपयांचा भरणा करणार आहे. तसेच केंद्र शासनाला ७० कोटी २ लाख ८ हजार ९०७ रुपयांचा भरणा करावा लागणार आहे.

एक लाख हेक्टरची तफावतजिल्ह्यात रब्बीतील सात पिकांची एकूण ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरणी झाली असली तरी केवळ तीन पिकांचा विमा ४ लाख २९ हजार ९९ हेक्टरचा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे १ लाख १६ हजार ११८ हेक्टर क्षेत्राची तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागासही धक्काच बसला आहे. दरम्यान, अंतिम पेरणी अहवालानंतर नेमके पेरणी क्षेत्र समजेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

कृषी विभागही गोंधळातजिल्ह्यात पेरणीच्या तुलनेत १ लाख १६ हजार हेक्टरवर अधिक पीकविमा उतरविण्यात आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयही गोंधळात पडले आहे. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे म्हणत कानावर हात ठेवले.

अवकाळी पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढलेअल्प पर्जन्यमानामुळे जमिनीत ओलावा नव्हता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करण्याचे टाळले होते. दरम्यान, अवकाळी पाऊस झाल्याने पेरणी केली. तसेच ऊस कारखान्यास गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस मोडून रब्बीचा पेरा केला. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र