शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपयाच्या पीकविम्याची कमाल; पेरा ३ लाख हेक्टरवर, विमा ४ लाख २९ हजार हेक्टरचा

By हरी मोकाशे | Updated: December 25, 2023 13:12 IST

यंदापासून शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम केवळ एक रुपया केल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्याकडे कल वाढला आहे.

लातूर : पीकविम्याच्या रकमेचा शेतकऱ्यांवर अधिक भार पडू नये म्हणून शासनाने केवळ एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. चालू रब्बी हंगामात ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरा झाला असला तरी प्रत्यक्षात पीकविमा ४ लाख २९ हजार ९९ हेक्टरचा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे एक रुपयाच्या पीकविम्याची कमाल अन् रब्बी हंगामाच्या क्षेत्रवाढीची धमाल झाली आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीइतका पाऊस झाला नाही. परिणामी, नदी-नाले वाहिले नाहीत. ओढेही खळाळले नाहीत. मध्यम प्रकल्पासह तलाव, विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात पेरा कमी होईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, त्यापेक्षा अधिक प्रमाणात पेरा झाला आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८० हजार हेक्टर आहे. आतापर्यंत ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला असून, तो २ लाख ७१ हजार ४६२ हेक्टर झाला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. यंदापासून शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम केवळ एक रुपया केल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्याकडे कल वाढला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचापीक - पेरा (हेक्टरमध्ये)ज्वारी - ३२५५७गहू - ८९६२मका - १५८१हरभरा - २७१४६२करडई - १६०८३जवस - ९९सूर्यफूल - ४५एकूण - ३३१६३०

५ लाख ३६ हजार १३८ शेतकऱ्यांनी भरला विमाजिल्ह्यातील ५ लाख ३६ हजार १३८ शेतकऱ्यांनी रब्बीतील हरभरा, ज्वारी अणि गहू या तीन पिकांचा हप्ता भरला आहे. विमा रकमेपोटी ५ लाख ३६ हजार १३६ रुपयांचा भरणा करीत ४ लाख २९ हजार ९९ हेक्टर क्षेत्राचे संरक्षण केले आहे. शेतकऱ्यांच्या हिश्श्यापोटी राज्य शासन ९२ कोटी ९१ लाख ११ हजार ९५३ रुपयांचा भरणा करणार आहे. तसेच केंद्र शासनाला ७० कोटी २ लाख ८ हजार ९०७ रुपयांचा भरणा करावा लागणार आहे.

एक लाख हेक्टरची तफावतजिल्ह्यात रब्बीतील सात पिकांची एकूण ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरणी झाली असली तरी केवळ तीन पिकांचा विमा ४ लाख २९ हजार ९९ हेक्टरचा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे १ लाख १६ हजार ११८ हेक्टर क्षेत्राची तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागासही धक्काच बसला आहे. दरम्यान, अंतिम पेरणी अहवालानंतर नेमके पेरणी क्षेत्र समजेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

कृषी विभागही गोंधळातजिल्ह्यात पेरणीच्या तुलनेत १ लाख १६ हजार हेक्टरवर अधिक पीकविमा उतरविण्यात आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयही गोंधळात पडले आहे. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे म्हणत कानावर हात ठेवले.

अवकाळी पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढलेअल्प पर्जन्यमानामुळे जमिनीत ओलावा नव्हता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करण्याचे टाळले होते. दरम्यान, अवकाळी पाऊस झाल्याने पेरणी केली. तसेच ऊस कारखान्यास गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस मोडून रब्बीचा पेरा केला. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र