शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक ! अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात १२५ कोटी निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 15:59 IST

relief to farmers खरीप हंगामाच्या शेवटी लातूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, उदगीर आदी तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात १२९ कोटी रुपये प्राप्त झाले होते.शेतकऱ्यांना लवकरच निधी मिळणार आहे.निलंगा, अहमदपुरातील सर्वाधिक शेतकरी...

लातूर : गतवर्षी खरीप हंगामाच्या शेवटी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात १२९ कोटी रुपये प्राप्त झाले होते. सदरील मदत १ लाख ८८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा होती. राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यातील १२५ कोटी १५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच निधी मिळणार आहे.

खरीप हंगामाच्या शेवटी लातूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, उदगीर आदी तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. जवळपास अडीच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र पाण्याखाली गेले होते. त्यापैकी ३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी प्रशासनाने राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १२८ कोटी ४४ लाख रुपये प्राप्त झाले होते. या निधीचे १ लाख ८८ हजार ७१७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुकास्तरावर निधी वर्ग केला जाणार आहे. त्यानुसार गावनिहाय मदतीचे वाटप केले जाणार असल्याचे महसूल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

निलंगा, अहमदपुरातील सर्वाधिक शेतकरी...पहिल्या टप्प्यात अनुदान वितरीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये लातूर ५९४, औसा ३५ हजार ३११, रेणापूर ६११, निलंगा ४० हजार ७३१, शिरूर अनंतपाळ ११ हजार ९३२, देवणी १४ हजार ७०४, उदगीर २३ हजार ८१०, जळकोट १२ हजार १०५, अहमदपूर २७ हजार ३७३ तर चाकूर तालुक्यातील २१ हजार ५४६ अशा एकूण १ लाख ८८ हजार ७१७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये निलंगा आणि अहमदपूर तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी आहेत. जिल्ह्यात जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते. त्यामध्ये ३ लाख ८५ हजार शेतकरी असून, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसlaturलातूरfundsनिधी