शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

दिलासादायक ! अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात १२५ कोटी निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 15:59 IST

relief to farmers खरीप हंगामाच्या शेवटी लातूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, उदगीर आदी तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात १२९ कोटी रुपये प्राप्त झाले होते.शेतकऱ्यांना लवकरच निधी मिळणार आहे.निलंगा, अहमदपुरातील सर्वाधिक शेतकरी...

लातूर : गतवर्षी खरीप हंगामाच्या शेवटी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात १२९ कोटी रुपये प्राप्त झाले होते. सदरील मदत १ लाख ८८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा होती. राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यातील १२५ कोटी १५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच निधी मिळणार आहे.

खरीप हंगामाच्या शेवटी लातूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, उदगीर आदी तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. जवळपास अडीच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र पाण्याखाली गेले होते. त्यापैकी ३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी प्रशासनाने राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १२८ कोटी ४४ लाख रुपये प्राप्त झाले होते. या निधीचे १ लाख ८८ हजार ७१७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुकास्तरावर निधी वर्ग केला जाणार आहे. त्यानुसार गावनिहाय मदतीचे वाटप केले जाणार असल्याचे महसूल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

निलंगा, अहमदपुरातील सर्वाधिक शेतकरी...पहिल्या टप्प्यात अनुदान वितरीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये लातूर ५९४, औसा ३५ हजार ३११, रेणापूर ६११, निलंगा ४० हजार ७३१, शिरूर अनंतपाळ ११ हजार ९३२, देवणी १४ हजार ७०४, उदगीर २३ हजार ८१०, जळकोट १२ हजार १०५, अहमदपूर २७ हजार ३७३ तर चाकूर तालुक्यातील २१ हजार ५४६ अशा एकूण १ लाख ८८ हजार ७१७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये निलंगा आणि अहमदपूर तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी आहेत. जिल्ह्यात जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते. त्यामध्ये ३ लाख ८५ हजार शेतकरी असून, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसlaturलातूरfundsनिधी