शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विवंचनेत असलेल्या नागरिकांनी मृत्यूला कवटाळले; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : मार्च २०२०पासून कोरोनाचे संकट अधिक गडद झाले. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे अनेकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : मार्च २०२०पासून कोरोनाचे संकट अधिक गडद झाले. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली. यातून आर्थिक विवंचना, मानसिक ताणतणाव आणि जगण्याचे प्रश्न गंभीर बनले. कोरोना कालावधीत तब्बल ५५२ नागरिकांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी पोलीस दप्तरी नोंद आहे. गेल्या पाच महिन्यांत १४५ जणांनी आत्महत्या केली आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली आहे. मार्च २०२०पासून जवळपास आठ महिने सर्वकाही ठप्प होते. छोटी-छोटी दुकाने, कारखाने आणि छोटी कामेही ठप्प झाल्याने अनेकांवर संकट ओढवले. अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्यांच्या दोनवेळच्या जेवणाची परिस्थिती गंभीर बनली. यामुळे अनेकांना उदरनिर्वाह कसा भागवावा, याचीच चिंता सतावत राहिली. अशा काळात अनेकांनी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या आत्महत्या टाळण्यासाठी वेळीच आर्थिक, सामाजिक आणि भावनिक आधार देण्याची गरज आहे.

हे दिवसही जातील

कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या. अनेकांचे व्यवसाय बुडाले. यातून चिंता मात्र वाढली आहे.

अनलॉकमुळे पुन्हा बाजारपेठ सुरू झाली असून, आर्थिक घडी बसेल, ही आशा अनेकांना आहे.

कोरोना नियमांचे पालन करत व्यवसाय करणे हा पर्याय आहे. आता हेही दिवस जातील, असे वाटते.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

घरातील कर्ता व्यक्ती ताणतणावाखाली असेल तर त्याला कुटुंबातील इतर सदस्यांनी मानसिक आधार देण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती कठीण असली तरी संयम आणि एकमेकांच्या आधाराने त्यावर मात करता येईल. आत्महत्या हा पर्याय नाही. येणारा दिवस सारखाच नसतो. संकटसमयीही प्रत्येक व्यक्तीने आशावादी आणि प्रयत्नशील असले पाहिजे. यासाठी कुटुंबाच्या आधाराची गरज आहे.

कोरोनाने अनेकांची झोप उडाली, ताणतणाव वाढला

पहिल्या लाटेत मानसिक तणावाखाली जगणाऱ्या रुग्णांची संख्या जेमतेम होती. मात्र, याचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले. कोरोनाने अनेकांची झोप उडाली आहे. ताणतणावही वाढला आहे. याला आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्न जबाबदार आहेत.

कोरोनाने अर्थचक्रच ठप्प झाल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून व्यसनांचे प्रमाणही वाढले आहे. काहीजण सुटका म्हणून व्यसनाचा आधार घेत आहेत. चिंतेमुळे झोप येत नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या लाटेनंतर नैराश्य येण्याचे प्रमाण मोठे आहे. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा आणि अभ्यासावरून तणाव आहे.