शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाने उघडीप दिल्याने बळीराजा धास्तावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रेणापूर : मृगाच्या प्रारंभी तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे खरिपाच्या आतापर्यंत एकूण ५७.९५ टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रेणापूर : मृगाच्या प्रारंभी तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे खरिपाच्या आतापर्यंत एकूण ५७.९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, आठवडाभरापासून पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या. पिके उगवली असून, पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहे.

रेणापूर तालुक्यात वरुणराजा मृगाच्या प्रारंभी बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पुढील काळातही पाऊस पडेल, या आशेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरण्यास सुरुवात केली. दरम्यान, हवामान खात्यानेही मान्सून सक्रिय झाला असून, तो सुरु होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली.

तालुक्यातील पाच महसूल मंडलांत खरिपासाठी एकूण ४८ हजार ६६० हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. आतापर्यंत तालुक्यात २८ हजार २०० हेक्‍टरवर म्हणजेच ५७.९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वात कमी पेरणी रेणापूर आणि पोहरेगाव महसूल मंडलांत झाली आहे. सर्वाधिक पेरा कारेपूर, पळशी व पानगाव यात तीन मंडलांमध्ये झाला आहे.

खरिपाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे उगवलेल्या पिकांना आता पाण्याची गरज आहे. तसेच आणखीन ४२ टक्के क्षेत्रावर पावसाअभावी पेरण्या राहिल्या आहेत. सध्या पेरणी केलेले आणि पेरणी न केलेले शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. लवकर पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती आहे.

सोयाबीनचा सर्वाधिक पेरा...

रेणापूर तालुक्यातील पाच महसूल मंडलांत ५७.९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यात रेणापूर मंडलात ३ हजार ९२९, पानगाव ६ हजार २६७, पळशी ६ हजार ४५१, कारेपूर मंडलात ७ हजार २९५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला असून, तो २५ हजार ६६३ हेक्टरवर झाला आहे. त्यापाठोपाठ तुरीचा १ हजार ९९८ हेक्टर, मूग २०९, उडीद ९७, ज्वारी १२५, मका ७० असा पेरा झाला आहे.

आतापर्यंत १९४ मिमी पाऊस...

रेणापूर तालुक्यात आतापर्यंत १९४.१ मिमी पाऊस झाला आहे. मृगाच्या प्रारंभी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. आता पावसाची गरज आहे. दरम्यान, शनिवारी रात्री काही प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिराम नागरगोजे यांनी केले.

पावसाची नितांत गरज...

मृगाच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने यापुढेही पाऊस होईल, या आशेवर पेरणी केली. सध्या पिके उगवली असून, पाण्याची गरज आहे. परंतु, आठवडाभरापासून पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे, असे शेतकरी भागवत माने यांनी सांगितले.