शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

लातूर जिल्ह्यात आणखी ५३१ कोरोना बाधितांची भर; ५३४ जण कोरोनामुक्त, २९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 20:58 IST

कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, शुक्रवारी आणखी ५३१ बाधितांची भर पडली असून, ५३४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. तर २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, शुक्रवारी आणखी ५३१ बाधितांची भर पडली असून, ५३४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. तर २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता बाधितांचा आलेख ८६ हजार ९८५ वर पोहोचला असून, यातील ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत ४ हजार ५९६ रुग्ण गृहविलगीकरण व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी १३०७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १७७ रुग्ण बाधित आढळले. तर २७३५ व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात ३५४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही चाचण्या मिळून ५३१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सध्या रुग्णालयात ४ हजार ५९६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी २७३७ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर १ हजार ८५९ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर व दवाखान्यात दाखल आहेत. उपचार घेत असलेल्या ४ हजार ५९६ रुग्णांपैकी ५७२ रुग्ण आयसीयूमध्ये, ३० रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर तर २५६ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. ८३१ रुग्ण मध्यम परंतु, ऑक्सिजनवर असून, ३१० रुग्ण मध्यम परंतु विनाऑक्सिजनवर आहेत. तर ३ हजार १६९ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख यांनी दिली.

५३४ रुग्णांना मिळाली सुटी...एकूण ८६ हजार ९८५ रुग्णांपैकी ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी ५३४ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ३७६, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १९, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ७, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील २२, औसा ग्रामीण रुग्णालयातील २, कासारशिरसी येथील १, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ४३, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ३, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील ८, निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील २, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील ७, सामाजिक न्याय भवन लामजना येथील ३, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन येथील २६ अशा एकूण ५३४ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्के...आतापर्यंत ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण १.८ टक्के असून, रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधी २४ दिवसांवर गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस