शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात आणखी ५३१ कोरोना बाधितांची भर; ५३४ जण कोरोनामुक्त, २९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 20:58 IST

कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, शुक्रवारी आणखी ५३१ बाधितांची भर पडली असून, ५३४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. तर २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, शुक्रवारी आणखी ५३१ बाधितांची भर पडली असून, ५३४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. तर २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता बाधितांचा आलेख ८६ हजार ९८५ वर पोहोचला असून, यातील ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत ४ हजार ५९६ रुग्ण गृहविलगीकरण व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी १३०७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १७७ रुग्ण बाधित आढळले. तर २७३५ व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात ३५४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही चाचण्या मिळून ५३१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सध्या रुग्णालयात ४ हजार ५९६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी २७३७ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर १ हजार ८५९ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर व दवाखान्यात दाखल आहेत. उपचार घेत असलेल्या ४ हजार ५९६ रुग्णांपैकी ५७२ रुग्ण आयसीयूमध्ये, ३० रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर तर २५६ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. ८३१ रुग्ण मध्यम परंतु, ऑक्सिजनवर असून, ३१० रुग्ण मध्यम परंतु विनाऑक्सिजनवर आहेत. तर ३ हजार १६९ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख यांनी दिली.

५३४ रुग्णांना मिळाली सुटी...एकूण ८६ हजार ९८५ रुग्णांपैकी ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी ५३४ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ३७६, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १९, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ७, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील २२, औसा ग्रामीण रुग्णालयातील २, कासारशिरसी येथील १, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ४३, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ३, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील ८, निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील २, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील ७, सामाजिक न्याय भवन लामजना येथील ३, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन येथील २६ अशा एकूण ५३४ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्के...आतापर्यंत ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण १.८ टक्के असून, रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधी २४ दिवसांवर गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस