शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आधीच दुष्काळ त्यात बाष्पीभवन वेगात; 'मांजरा'तील १९.१८ दलघमी पाण्याची आतापर्यंत वाफ!

By हणमंत गायकवाड | Updated: April 18, 2024 18:24 IST

उष्णता वाढल्याने दररोज ८.५० मिलिमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे

लातूर : उन्हाचा पारा दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने साठवण तलावातील पाण्याची वाफ (बाष्पीभवन) मोठ्या प्रमाणात होत आहे. मांजरा प्रकल्पातील दररोज ८.५० मिलिमीटर पाणी बाष्पीभवनामुळे घटत आहे. उष्णतेमुळे गेल्या चार-पाच महिन्यात १९.१८ दलघमी पाण्याची वाफ झाली आहे. म्हणजे बाष्पीभवन झाले आहे. सध्या मांजरा प्रकल्पावर पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी कोणतीच उपाय योजना नसल्यामुळे दररोज ८.५० मिलीमीटर पाण्याची वाफ होत आहे.

लातूर शहरासह लातूर एमआयडीसी,अंबाजोगाई, केज, कळंब धारूर या मोठ्या गावांसह अन्य छोट्या मोठ्या गावांना मांजरा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो.

बाष्पीभवन रोखण्याची उपायोजना खर्चिक उन्हाच्या तीव्रतेमुळे मांजरा प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. मात्र बाष्पीभवन रोखण्यासाठी उपाययोजना नाही. ज्या आहेत, त्या योजना खर्चिक आहेत. इथे ही योजना राबविली जात नाही. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात मांजरा प्रकल्पावर रसायनिक आच्छादन टाकून बाष्पीभवन रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही योजना दीर्घकाळ राबवली नाही. तथापि,सध्या कोणतीही योजना बाष्पीभवन रोखण्यासाठी नाही.

'मे' अखेरपर्यंत साठा पुरेल सध्या मांजरा प्रकल्पात ५.४० टक्के जिवंत पाणीसाठा आहे. म्हणजे नऊ दलघमी जिवंतपाणी प्रकल्पात आहे. यावर मे अखेरपर्यंत तहान भागू शकते. त्यानंतर मात्र मृतसाठ्याचा वापर करावा लागणार आहे. पावसाळा संपेपर्यंत हे पाणी पुरू शकते.आता उष्णतेच्या लाटेमुळे मांजरा प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रकल्पातील पाण्याची वाफ होऊन पाणी हवेत जिरत आहे. त्यावर काहीच उपायोजना नाही, हे सत्य. यातून जुलै २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत १९.१८ दलघमी पाणी बाष्पीभवनात विरले आहे.

मांजरातील पाण्याचे सहा महिन्यात असे झाले बाष्पीभवन....ऑक्टोबर : २.२१नोव्हेंबर : २.२९डिसेंबर : २.१२जानेवारी : २.२८फेब्रुवारी :  २.४४मार्च : ३.५० दलघमी

पाण्याचे बाष्पीभवन म्हणजे  काय ?उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. बाष्पीभवन हा जलचक्राचा एक भाग आहे.सूर्य (सौर ऊर्जा), समुद्र, तलाव, जमिनीतील ओलावा आणि पाण्याचे इतर स्त्रोतांमधून पाण्याचे बाष्पीभवन करतो.पाण्याचे बाष्पीभवन जेव्हा द्रवाची पृष्ठभाग उघडकीस येते तेव्हा रेणू बाहेर पडतात आणि पाण्याची वाफ तयार करतात;ही वाफ नंतर वर येऊन ढग तयार करू शकते.पुरेशी उर्जा असल्यास, द्रव वाफेत बदलते.

ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसांपासून बाष्पीभवन कमीउन्हामुळे मांजरा प्रकल्पातील पाण्याचे दररोज ८.५० मिलिमीटर बाष्पीभवन होत आहे. ढगाळ वातावरणामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची वाफ थोडी कमी झाले आहे.- सुरज निकम, शाखा अधिकारी मांजरा प्रकल्प, धनेगाव

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणWaterपाणीlaturलातूर