शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!

By राजकुमार जोंधळे | Updated: April 25, 2025 23:48 IST

लातुरातील तीन कुटुंब सुखरूप : पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...

राजकुमार जाेंधळे / लातूर : काश्मिरात आणखी एक दिवस मुक्काम करुन वैष्णवदेवीला जाण्याचा प्लॅन हाेता. मात्र, तिकीट न मिळाल्याने २१ एप्रिल राेजी आम्ही पहलगाम साेडले आणि परतीच्या प्रवासाला लागलाे. दुसऱ्या दिवशी २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यातून धडकल्या. त्यावेळी अंगावर काटा उभा ठाकला. अवघ्या काही तासांपूर्वीच आपण हा परिसर साेडला आणि अनर्थ टळला, अशीच भावना लातुरातील तीनही कुटुंबांनी व्यक्त केली.

१५ एप्रिल रोजी पहाटे पुणे येथून दिल्ली आणि दिल्ली विमानतळावरून श्रीनगर असा प्रवास करत लातुरातील गणेश गोले, गंगाधर करीमुंगी आणि रामेश्वरी कलशेट्टी हे मुलांना सुटी असल्याने परिवारासह एका खाजगी टुरिस्ट कंपनीच्या पॅकेजमधून सहा दिवसांसाठी काश्मीरला पोहोचले. त्यात श्रीनगर येथे दाेन दिवस, हाउस बोट येथे एक दिवस आणि पहलगाम येथे १९ ते २१ एप्रिल असे तीन दिवस हाेते. पहलगाम येथे निसर्गाचा आनंद घेत फाेटेही काढले. भाेजनाचा आनंद घेत डोंगर-दऱ्या पाहत होताे. शिवाय, २१ एप्रिल राेजी तारखेला ‘बेताब व्हॅली’ येथून घोड्यावरून पहाडी परिसरात भटकंती करायचं ठरलं हाेतं. मात्र, सगळ्यांचं मत जुळले नाही. त्यामुळे घोड्यावरून बेताब व्हॅली पाहण्याचा निर्णय रद्द झाला. जेथे हा भ्याड हल्ला झाला त्याच ठिकाणचा परिसर...त्यानंतर साइड सिनरी पाहत आम्ही २१ एप्रिलला पहलगाममधून श्रीनगरला परतलाे.

मध्यरात्रीचा प्रवास करून आम्ही पुणे येथे पोहोचलो. तेथे पोहोचल्यानंतर समजलं की, पहलगाम येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला. त्यावेळी वाटले की आपण तेथून अवघ्या काही तासांपूर्वी परतलाे. आणखी एक दिवसाचा मुक्काम पहलगाममध्ये करून वैष्णवीदेवीला जाण्याचा प्लॅन केला असता तर आपल्यावरही हा प्रसंग बेतला असता, असेच वाटू लागले. मात्र, वैष्णवदेवीचे तिकीट न मिळाल्याने २१ तारखेलाच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलाे आणि पुण्यात दाखल झालाे, अशी माहिती गणेश गाेले यांनी दिली.

पहलगाम प्रवासामध्ये हाेती सहा लहान मुले...२२ एप्रिल राेजी पहलगामध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचे वृत्त समजले. त्यानंतर तेथील परिस्थिती वृत्त वाहिन्यांवरून पाहत असताना अंगावर शहारा आला. या वृत्ताने पहिल्यांदा जबर धक्काच बसला. तीनही कुटुंबातील सदस्य बेचैन झाले. सहा लहान मुलांसह हे तीनही कुटुंब पुणे येथून लातुरात सुखरूप परतल्याने जीव भांड्यात पडला.

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला