शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांनी किल्लारी साखर कारखाना कर्जमुक्त, अवसायक मंडळाकडे ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST

किल्लारी : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा अशी सातत्याने शेतकऱ्यांतून मागणी होत होती. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा ...

किल्लारी : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा अशी सातत्याने शेतकऱ्यांतून मागणी होत होती. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नांदेडने एक कोटी १५ लाख रुपये भरून हा कारखाना कर्जमुक्त करून तो अवसायक मंडळाच्या ताब्यात दिला आहे.

औसा तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा कर्जामुळे बंद होता. तो सुरू करण्यात यावा अशी सातत्याने ऊस उत्पादकांतून मागणी होत होती. त्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री अमित देशमुख, खा. ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री बस्वराज पाटील, आ. बाबासाहेब पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, सुरेश दाजी बिराजदार यांनी प्रयत्न केले होते. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले होते.

किल्लारी कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची दोन कोटी ४० लाखांची थकबाकी होती. राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर कारखान्यावर अवसायक मंडळ स्थापन झाले होते. या मंडळाने पक्षश्रेष्ठींना भेटून एक कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज माफ करून घेतले होते. उर्वरित एक कोटी १५ लाख रुपये थकीत राहिले होते.

अखेर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नांदेडने एक कोटी १५ लाख रुपये भरून हा कारखाना कर्जमुक्त करून तो अवसायक मंडळ आणि जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांच्याकडे ताबा दिला आहे. त्यामुळे कारखाना सुरू होण्यास गती मिळाली आहे. सोमवारी कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे नांदेडचे प्राधिकृत अधिकारी विवेकानंद देशमुख यांनी अधिकृतपणे कारखाना ताब्यात दिल्याचे लेखी दिले आहे. यावेळी अवसायक मंडळाचे विजयकुमार सोनवणे, केशव ऊर्फ बाबा पाटील यांनी ताबा घेतला. यावेळी रमेश मेश हेळंबे, विनोद बाबळसुरे, विकास हराळकर, शिवाजी कदम, वामन पाटील, संजय पवार तसेच नानाराव भोसले, बंकट पाटील, रुक्मानंद पवार, दत्ता भोसले, प्रकाश पाटील, कारखान्याचे एमडी टी. एन. पवार, सुरक्षा अधिकारी शिवाजी मोरे उपस्थित होते.

पुढील वर्षी कारखाना सुरू होणार...

किल्लारी कारखाना कर्जमुक्त करण्यात आल्याने तो सुरू होण्यासाठी गती मिळाली आहे. यंदा कारखान्यातील मशिनरींची दुरुस्ती करून घेण्यात येईल. पुढील हंगामात कारखाना सुरू होणार असल्याचे अवसायक मंडळाचे विजयकुमार सोनवणे, केशव ऊर्फ बाबा पाटील यांनी सांगितले.

यापुढेही मदत...

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अधिकारी विवेकानंद देशमुख म्हणाले, हा कारखाना सुरू करण्यासाठी पुढेही मदत व सहकार्य केले जाईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील.