शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर लातूर जिल्ह्यात वरुणराजाची हजेरी

By हरी मोकाशे | Updated: September 4, 2023 19:35 IST

जलसाठा वाढण्यासाठी दमदार पावसाची गरज

लातूर : तब्बल महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटेच्या सुमारास वरुणराजाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. पावसाने पिकांना तूर्तास जीवदान मिळाले आहे. मात्र, प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सर्वदूर व दमदार पावसाची गरज आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६.०१ मिमी पाऊस झाला आहे.

यंदा जिल्ह्यात पाऊस उशिरा सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्याही विलंबाने झाल्या. जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर पेरा झाला. दरम्यान, पिकांपुरता रिमझिम पाऊस झाल्याने सोयाबीनसह इतर पिके चांगली बहरली होती. मात्र, जुलैअखेरपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे फुलोऱ्याच्या अवस्थेतील सोयाबीनची फुलगळती झाली. शिवाय, वाढही खुंटली. दरम्यान, पावसाने ताण कायम ठेवल्याने हलक्या व मध्यम जमिनीवरील करपून गेली, तर चांगल्या जमिनीवरील पिकांना शेतकऱ्यांनी पाणी दिल्याने तग धरून राहिली. मात्र, सोयाबीनच्या अपेक्षित उत्पादनात जवळपास ६० ते ८० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

तब्बल महिनाभरानंतर जिल्ह्यातील सर्व भागात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आशा उंचावल्या आहेत. खरिपातील सोयाबीनला फटका बसला असला तरी किमान पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, अशी आशा आहे. त्यामुळे दमदार पावसाकडे लक्ष लागून आहे.

आतापर्यंत सरासरी ३५९.३ मिमी पाऊस...

तालुका - २४ तासांतील पाऊस - आतापर्यंतचा पाऊसलातूर - २०.४ - ३३५.३

औसा - १७.४ - २५१.२अहमदपूर - १३.५ - ३५१.०

निलंगा - १६.२ - ३४१.७उदगीर - ८.९ - ४८३.४

चाकूर - २२.० - ३१२.६रेणापूर - ११.७ - २८०.९

देवणी - १२.४ - ५२८.६शिरुर अनं.- २४.३ - ३८४.०

जळकोट - ९.९ - ४२४.४एकूण - १६.१ - ३५९.३

जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण...

दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत थंड गारवा जाणवत होता. जिल्ह्यातील येरोळ, देवणी, निटूर, खरोसासह काही भागात मध्यम व रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. मात्र, विहिरी, तलावातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची अद्यापही गरज आहे. त्यामुळे पावसाकडे नजरा लागून आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत २२१ मिमीची तूट...गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५८०.५ मिमी पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत सरासरी ३५९.३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास २२१.२ मिमी पावसाची तूट आहे. जुलैअखेरपासून पावसाने ताण दिल्याने उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. आता वातावरणात बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरRainपाऊस