शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर लातूर जिल्ह्यात वरुणराजाची हजेरी

By हरी मोकाशे | Updated: September 4, 2023 19:35 IST

जलसाठा वाढण्यासाठी दमदार पावसाची गरज

लातूर : तब्बल महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटेच्या सुमारास वरुणराजाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. पावसाने पिकांना तूर्तास जीवदान मिळाले आहे. मात्र, प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सर्वदूर व दमदार पावसाची गरज आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६.०१ मिमी पाऊस झाला आहे.

यंदा जिल्ह्यात पाऊस उशिरा सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्याही विलंबाने झाल्या. जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर पेरा झाला. दरम्यान, पिकांपुरता रिमझिम पाऊस झाल्याने सोयाबीनसह इतर पिके चांगली बहरली होती. मात्र, जुलैअखेरपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे फुलोऱ्याच्या अवस्थेतील सोयाबीनची फुलगळती झाली. शिवाय, वाढही खुंटली. दरम्यान, पावसाने ताण कायम ठेवल्याने हलक्या व मध्यम जमिनीवरील करपून गेली, तर चांगल्या जमिनीवरील पिकांना शेतकऱ्यांनी पाणी दिल्याने तग धरून राहिली. मात्र, सोयाबीनच्या अपेक्षित उत्पादनात जवळपास ६० ते ८० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

तब्बल महिनाभरानंतर जिल्ह्यातील सर्व भागात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आशा उंचावल्या आहेत. खरिपातील सोयाबीनला फटका बसला असला तरी किमान पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, अशी आशा आहे. त्यामुळे दमदार पावसाकडे लक्ष लागून आहे.

आतापर्यंत सरासरी ३५९.३ मिमी पाऊस...

तालुका - २४ तासांतील पाऊस - आतापर्यंतचा पाऊसलातूर - २०.४ - ३३५.३

औसा - १७.४ - २५१.२अहमदपूर - १३.५ - ३५१.०

निलंगा - १६.२ - ३४१.७उदगीर - ८.९ - ४८३.४

चाकूर - २२.० - ३१२.६रेणापूर - ११.७ - २८०.९

देवणी - १२.४ - ५२८.६शिरुर अनं.- २४.३ - ३८४.०

जळकोट - ९.९ - ४२४.४एकूण - १६.१ - ३५९.३

जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण...

दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत थंड गारवा जाणवत होता. जिल्ह्यातील येरोळ, देवणी, निटूर, खरोसासह काही भागात मध्यम व रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. मात्र, विहिरी, तलावातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची अद्यापही गरज आहे. त्यामुळे पावसाकडे नजरा लागून आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत २२१ मिमीची तूट...गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५८०.५ मिमी पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत सरासरी ३५९.३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास २२१.२ मिमी पावसाची तूट आहे. जुलैअखेरपासून पावसाने ताण दिल्याने उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. आता वातावरणात बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरRainपाऊस