शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे होणार निर्जंतुकीकरण

By हरी मोकाशे | Updated: July 14, 2023 17:57 IST

जलजन्य आजार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेची मोहीम

लातूर : पावसाळा सुरु झाला की जलसाठ्यात वाढ होते. त्यामुळे जलसाठ्याबरोबर जलस्त्रोताचे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. त्यातून जलजन्य आजार उद्भवू शकतात. कुठल्याही जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व पंचायत वतीने जिल्ह्यात जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात ५ हजार स्त्रोतांचे क्लोरिनवॉश करण्यात येणार आहे.

पावसाळा सुरु झाला की भूगर्भातील पाणीसाठा वाढतो. त्यामुळे हातपंप, विद्युतपंप, आड- विहिरींचे पाणी दूषित होण्याची सर्वाधिक शक्यता असते. ग्रामीण भागातील काही ठिकाणचे नागरिक या जलस्त्रोतांचे, जलसाठ्यांचे पाणी पितात. परिणामी, जलजन्य आजार उद्भवतात. तसेच जलजन्य आजारांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. शिवाय, पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीस गळती, जलस्त्रोताच्या सभोवतालचा परिसर अस्वच्छ असणे, पाणी निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसणे, उपलब्ध असल्यास त्याचा नियमित वापर न करणे, पाणीपुरवठा करणारा कर्मचारी, जलसुरक्षक प्रशिक्षित नसणे, हातपंप, विद्युत पंपांचे क्लोरिनवॉश न करणे, आड-विहिरींच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण न करणे अशा कारणांमुळे दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे जलजन्य आजार होतात. त्याच्या प्रतिबंधासाठी विद्युतपंप, हातपंपांचे क्लोरिनवॉश करणे तसेच आड- विहिरींच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम १६ जे ३० जुलै दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणार आहे.

उदगीरात पाण्याचे सर्वाधिक जलस्त्रोत...अहमदपूर - ५५६औसा - ५८८चाकूर - ५५२देवणी - २९६जळकोट - ३१३लातूर - ६४७निलंगा - ६४३रेणापूर - ५१०शिरुर अनं. - ३०६उदगीर - ७१६

दूषित पाण्याने हे होतात आजार...दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, काविळ, विषमज्वर असे जलजन्य आजार उद्भवू शकतात. बहुतांश नागरिकांना पाण्यातून आजार होतात याची माहिती नसल्याने ते सहजरीत्या बोअर, आड, विहिरीचे पाणी पितात. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊन विविध आजारांची लागण होण्याची भीती असते.

मोहिमेमुळे आजारास प्रतिबंध...पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य आजारांची भीती असते. त्यामुळे आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीने ही मोहीम राबवत आहोत. त्यातून जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण होते. त्याचबरोबर गावातील नागरिकांनाही पाण्यातून होणाऱ्या आजारांबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात येते. या मोहिमेमुळे मागील वर्षात जिल्ह्यात कुठेही जलजन्य आजाराचा उद्रेक झाला नाही.- अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी.

जलजन्य आजार रोखण्यास मदत...पाऊस झाला की जमिनीवरील घाण ही पाण्याबरोबर उताराच्या दिशेने वाहून जलसाठे अथवा जलस्त्रोताच्या ठिकाणी मुरते. त्यामुळे विहिरी, आडाचे, हातपंप, विद्युत पंपाचे पाणी दूषित होते. ते पाणी पिल्याने गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, कावीळ असे आजार होतात. असे आजार उद्भवू नयेत म्हणून ही आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जलजन्य आजार रोखण्यास मदत होते.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

विद्युत, हात पंपाचा सर्वाधिक वापर...नळ पाणीपुरवठा विहीर - ७६२हातपंप, विद्युतपंप - ३४३७सार्वजनिक विहिरी - ९२८

टॅग्स :laturलातूरRainपाऊस