शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे होणार निर्जंतुकीकरण

By हरी मोकाशे | Updated: July 14, 2023 17:57 IST

जलजन्य आजार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेची मोहीम

लातूर : पावसाळा सुरु झाला की जलसाठ्यात वाढ होते. त्यामुळे जलसाठ्याबरोबर जलस्त्रोताचे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. त्यातून जलजन्य आजार उद्भवू शकतात. कुठल्याही जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व पंचायत वतीने जिल्ह्यात जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात ५ हजार स्त्रोतांचे क्लोरिनवॉश करण्यात येणार आहे.

पावसाळा सुरु झाला की भूगर्भातील पाणीसाठा वाढतो. त्यामुळे हातपंप, विद्युतपंप, आड- विहिरींचे पाणी दूषित होण्याची सर्वाधिक शक्यता असते. ग्रामीण भागातील काही ठिकाणचे नागरिक या जलस्त्रोतांचे, जलसाठ्यांचे पाणी पितात. परिणामी, जलजन्य आजार उद्भवतात. तसेच जलजन्य आजारांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. शिवाय, पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीस गळती, जलस्त्रोताच्या सभोवतालचा परिसर अस्वच्छ असणे, पाणी निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसणे, उपलब्ध असल्यास त्याचा नियमित वापर न करणे, पाणीपुरवठा करणारा कर्मचारी, जलसुरक्षक प्रशिक्षित नसणे, हातपंप, विद्युत पंपांचे क्लोरिनवॉश न करणे, आड-विहिरींच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण न करणे अशा कारणांमुळे दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे जलजन्य आजार होतात. त्याच्या प्रतिबंधासाठी विद्युतपंप, हातपंपांचे क्लोरिनवॉश करणे तसेच आड- विहिरींच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम १६ जे ३० जुलै दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणार आहे.

उदगीरात पाण्याचे सर्वाधिक जलस्त्रोत...अहमदपूर - ५५६औसा - ५८८चाकूर - ५५२देवणी - २९६जळकोट - ३१३लातूर - ६४७निलंगा - ६४३रेणापूर - ५१०शिरुर अनं. - ३०६उदगीर - ७१६

दूषित पाण्याने हे होतात आजार...दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, काविळ, विषमज्वर असे जलजन्य आजार उद्भवू शकतात. बहुतांश नागरिकांना पाण्यातून आजार होतात याची माहिती नसल्याने ते सहजरीत्या बोअर, आड, विहिरीचे पाणी पितात. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊन विविध आजारांची लागण होण्याची भीती असते.

मोहिमेमुळे आजारास प्रतिबंध...पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य आजारांची भीती असते. त्यामुळे आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीने ही मोहीम राबवत आहोत. त्यातून जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण होते. त्याचबरोबर गावातील नागरिकांनाही पाण्यातून होणाऱ्या आजारांबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात येते. या मोहिमेमुळे मागील वर्षात जिल्ह्यात कुठेही जलजन्य आजाराचा उद्रेक झाला नाही.- अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी.

जलजन्य आजार रोखण्यास मदत...पाऊस झाला की जमिनीवरील घाण ही पाण्याबरोबर उताराच्या दिशेने वाहून जलसाठे अथवा जलस्त्रोताच्या ठिकाणी मुरते. त्यामुळे विहिरी, आडाचे, हातपंप, विद्युत पंपाचे पाणी दूषित होते. ते पाणी पिल्याने गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, कावीळ असे आजार होतात. असे आजार उद्भवू नयेत म्हणून ही आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जलजन्य आजार रोखण्यास मदत होते.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

विद्युत, हात पंपाचा सर्वाधिक वापर...नळ पाणीपुरवठा विहीर - ७६२हातपंप, विद्युतपंप - ३४३७सार्वजनिक विहिरी - ९२८

टॅग्स :laturलातूरRainपाऊस