शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

३० वर्षांपासूनचा सारणी रस्त्याचा प्रश्न अखेर निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

किल्लारी : औसा तालुक्यातील जुनी सरणी (भाग २) ते माकणी, बेलकुंड, औसा रस्त्याला जोडण्यासाठी अवघे ...

किल्लारी : औसा तालुक्यातील जुनी सरणी (भाग २) ते माकणी, बेलकुंड, औसा रस्त्याला जोडण्यासाठी अवघे तीन किमीचे अंतर आहे. मात्र, पाटबंधारे विभागाचे नाहरकत मिळत नसल्यामुळे रस्ता तयार होत नव्हता. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न तीन दिवसांत सोडविला. त्यामुळे सारणी गावात आनंद व्यक्त होत आहे.

सारणी हे गाव औसा तालुक्यातील व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या गावानजीक माकणी हे गाव असून तिथे बाजारपेठ आहे. दवाखाना, कापड, किराणा व अन्य कामांसाठी गावातील नागरिकांना लातूर, उस्मानाबाद, सोलापूरला जाण्यासाठी मातोळा, लोहटामार्गे जवळपास २० किमीचे अधिकच्या अंतरावरून जावे लागते. सारणी गावाजवळून अवघ्या तीन किमीवर माकणी-बेलकुंड जाणारा रस्ता आहे. या रस्त्यास सारणी गावचा रस्ता जोडल्यास दळणवळणाचा प्रश्न संपुष्टात येणार होता.

रस्ता नसल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्याच्या रस्त्याने जावे लागते. हा रस्ता व्हावा म्हणून सारणी भाग- २ मधील नागरिक भूकंपापासून प्रयत्नशील होते. तत्कालीन आमदार, खासदारांकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्यांनीही प्रयत्न केला होता; पण यश आले नव्हते. कारण, रस्त्यासाठी आवश्यक असणारी जमीन ही उस्मानाबाद पाटबंधारे विभागाच्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादित होती.

अखेर शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी यांच्यामार्फत सारणीचे रतन तमशेट्टी, राजेंद्र बिराजदार, शहाजी नारायणकर, विजय बिराजदार यांच्या शिष्टमंडळाने खा. ओमराजे निंबाळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. तेव्हा खा. ओमराजे निंबाळकर यांनी शुक्रवारी पंचायत समिती सभागृहातील बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला. तिथेच पाटबंधारे विभागाकडून रस्त्यासाठी लेखी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले.

पाटबंधारे विभागाकडून नाहरकत...

पाटबंधारे विभागाने तेरणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या दक्षिण दिशेने संपादित केलेल्या जमिनीवरून तीन किमीचा रस्ता करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. ३० वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न अखेर सुटल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. औसा येथील बैठकीस शिवसेनेेचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी, मुन्ना शेख, शिवाजी माने, राजेंद्र बिराजदार, शहाजी नारायणकर, अनिल कदम, रतन तमशेट्टी, विजय बिराजदार, श्रीशैल्य पाटील, शिवाजी यशवंते उपस्थित होते.