शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

३० वर्षांपासूनचा सारणी रस्त्याचा प्रश्न अखेर निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

किल्लारी : औसा तालुक्यातील जुनी सरणी (भाग २) ते माकणी, बेलकुंड, औसा रस्त्याला जोडण्यासाठी अवघे ...

किल्लारी : औसा तालुक्यातील जुनी सरणी (भाग २) ते माकणी, बेलकुंड, औसा रस्त्याला जोडण्यासाठी अवघे तीन किमीचे अंतर आहे. मात्र, पाटबंधारे विभागाचे नाहरकत मिळत नसल्यामुळे रस्ता तयार होत नव्हता. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न तीन दिवसांत सोडविला. त्यामुळे सारणी गावात आनंद व्यक्त होत आहे.

सारणी हे गाव औसा तालुक्यातील व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या गावानजीक माकणी हे गाव असून तिथे बाजारपेठ आहे. दवाखाना, कापड, किराणा व अन्य कामांसाठी गावातील नागरिकांना लातूर, उस्मानाबाद, सोलापूरला जाण्यासाठी मातोळा, लोहटामार्गे जवळपास २० किमीचे अधिकच्या अंतरावरून जावे लागते. सारणी गावाजवळून अवघ्या तीन किमीवर माकणी-बेलकुंड जाणारा रस्ता आहे. या रस्त्यास सारणी गावचा रस्ता जोडल्यास दळणवळणाचा प्रश्न संपुष्टात येणार होता.

रस्ता नसल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्याच्या रस्त्याने जावे लागते. हा रस्ता व्हावा म्हणून सारणी भाग- २ मधील नागरिक भूकंपापासून प्रयत्नशील होते. तत्कालीन आमदार, खासदारांकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्यांनीही प्रयत्न केला होता; पण यश आले नव्हते. कारण, रस्त्यासाठी आवश्यक असणारी जमीन ही उस्मानाबाद पाटबंधारे विभागाच्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादित होती.

अखेर शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी यांच्यामार्फत सारणीचे रतन तमशेट्टी, राजेंद्र बिराजदार, शहाजी नारायणकर, विजय बिराजदार यांच्या शिष्टमंडळाने खा. ओमराजे निंबाळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. तेव्हा खा. ओमराजे निंबाळकर यांनी शुक्रवारी पंचायत समिती सभागृहातील बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला. तिथेच पाटबंधारे विभागाकडून रस्त्यासाठी लेखी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले.

पाटबंधारे विभागाकडून नाहरकत...

पाटबंधारे विभागाने तेरणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या दक्षिण दिशेने संपादित केलेल्या जमिनीवरून तीन किमीचा रस्ता करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. ३० वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न अखेर सुटल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. औसा येथील बैठकीस शिवसेनेेचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी, मुन्ना शेख, शिवाजी माने, राजेंद्र बिराजदार, शहाजी नारायणकर, अनिल कदम, रतन तमशेट्टी, विजय बिराजदार, श्रीशैल्य पाटील, शिवाजी यशवंते उपस्थित होते.