शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

लातूर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; फळबागांना सर्वाधिक फटका

By संदीप शिंदे | Updated: May 5, 2023 20:28 IST

प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

लातूर : शेतकऱ्यांच्या पाठीमागील संकटाची मालिका पाठलाग सोडायला तयार नसल्याची स्थिती आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी व रोगराईने सोयाबीनसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांगले उत्पादन हाती लागेल, अशी आशा होती. मात्र, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याची मदत मिळते ना मिळते तोच एप्रिल महिन्यातही अवकाळीने दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत.

खरीप हंगामात अतिवृष्टी, गोगलगाय, यलोमोझॅकने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले. खरिपातील अन्य पिकांतूनही म्हणावे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प, तलाव ओसंडून वाहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. रब्बी हंगामातील पिकांतून चांगले उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडेल, अशी आशा होती. पिकेही जोरदार आली. मात्र, गहू, ज्वारी, हरभरा काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट कोसळले. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळीने गहू, ज्वारी, हरभरा, करडई, टरबूज, खरबूज, पपई, द्राक्ष, आंबे यासह भाजीपाल्यांचे नुकसान झाले. राज्य शासनाकडून नुकसानभरपाईपोटी १० कोटी रुपये मिळाले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडते ना पडते तोच एप्रिल महिन्यातही अवकाळीने हजेरी लावली. यात जिल्ह्यातील ३ हजार ४५ शेतकऱ्यांच्या शेतातील १ हजार ४७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

अवकाळीमुळे १९६ गावांत नुकसान...जिल्ह्यात १ ते ३० एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने १९६ गावांतील ३ हजार ४५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात जिरायती क्षेत्रावरील २९९ हेक्टर, बागायती ४२२ हेक्टर तर ७४८ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यात लातूर वगळता औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर व चाकूर तालुक्यातील गावांत नुकसान झाले आहे.

८७७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण...जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे गतीने करण्यात येत असून, आतापर्यंत १ हजार ९५२ बाधित शेतकऱ्यांच्या ८७७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात जिरायती २३७ हेक्टर, बागायती २७० तर फळपिकांवरील ३६९ हेक्टरवरील पंचनामे झाले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाल्यावर एकूण मदतीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. मार्चमधील नुकसानीचे पंचनामे करून तातडीने दहा कोटींची मदत मिळाली होती. त्याचप्रमाणे आताही पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तहसीलनिहाय बाधित क्षेत्र...तालुका             बाधित संख्या             बाधित क्षेत्रऔसा             ५६                         ४९ (हेक्टर)रेणापूर             १८७             ९७निलंगा             ७७०             २३५शि.अनंत             ४७८             २८३देवणी             १७४                        ५६उदगीर             २९८             १४९जळकोट             ६८४             २९४अहमदपूर             ३३१             २४५चाकूर             ७७             ६०एकूण             ३०४५             १४७०

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेतीlaturलातूर