शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; फळबागांना सर्वाधिक फटका

By संदीप शिंदे | Updated: May 5, 2023 20:28 IST

प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

लातूर : शेतकऱ्यांच्या पाठीमागील संकटाची मालिका पाठलाग सोडायला तयार नसल्याची स्थिती आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी व रोगराईने सोयाबीनसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांगले उत्पादन हाती लागेल, अशी आशा होती. मात्र, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याची मदत मिळते ना मिळते तोच एप्रिल महिन्यातही अवकाळीने दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत.

खरीप हंगामात अतिवृष्टी, गोगलगाय, यलोमोझॅकने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले. खरिपातील अन्य पिकांतूनही म्हणावे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प, तलाव ओसंडून वाहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. रब्बी हंगामातील पिकांतून चांगले उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडेल, अशी आशा होती. पिकेही जोरदार आली. मात्र, गहू, ज्वारी, हरभरा काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट कोसळले. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळीने गहू, ज्वारी, हरभरा, करडई, टरबूज, खरबूज, पपई, द्राक्ष, आंबे यासह भाजीपाल्यांचे नुकसान झाले. राज्य शासनाकडून नुकसानभरपाईपोटी १० कोटी रुपये मिळाले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडते ना पडते तोच एप्रिल महिन्यातही अवकाळीने हजेरी लावली. यात जिल्ह्यातील ३ हजार ४५ शेतकऱ्यांच्या शेतातील १ हजार ४७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

अवकाळीमुळे १९६ गावांत नुकसान...जिल्ह्यात १ ते ३० एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने १९६ गावांतील ३ हजार ४५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात जिरायती क्षेत्रावरील २९९ हेक्टर, बागायती ४२२ हेक्टर तर ७४८ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यात लातूर वगळता औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर व चाकूर तालुक्यातील गावांत नुकसान झाले आहे.

८७७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण...जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे गतीने करण्यात येत असून, आतापर्यंत १ हजार ९५२ बाधित शेतकऱ्यांच्या ८७७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात जिरायती २३७ हेक्टर, बागायती २७० तर फळपिकांवरील ३६९ हेक्टरवरील पंचनामे झाले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाल्यावर एकूण मदतीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. मार्चमधील नुकसानीचे पंचनामे करून तातडीने दहा कोटींची मदत मिळाली होती. त्याचप्रमाणे आताही पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तहसीलनिहाय बाधित क्षेत्र...तालुका             बाधित संख्या             बाधित क्षेत्रऔसा             ५६                         ४९ (हेक्टर)रेणापूर             १८७             ९७निलंगा             ७७०             २३५शि.अनंत             ४७८             २८३देवणी             १७४                        ५६उदगीर             २९८             १४९जळकोट             ६८४             २९४अहमदपूर             ३३१             २४५चाकूर             ७७             ६०एकूण             ३०४५             १४७०

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेतीlaturलातूर