शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; फळबागांना सर्वाधिक फटका

By संदीप शिंदे | Updated: May 5, 2023 20:28 IST

प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

लातूर : शेतकऱ्यांच्या पाठीमागील संकटाची मालिका पाठलाग सोडायला तयार नसल्याची स्थिती आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी व रोगराईने सोयाबीनसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांगले उत्पादन हाती लागेल, अशी आशा होती. मात्र, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याची मदत मिळते ना मिळते तोच एप्रिल महिन्यातही अवकाळीने दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत.

खरीप हंगामात अतिवृष्टी, गोगलगाय, यलोमोझॅकने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले. खरिपातील अन्य पिकांतूनही म्हणावे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प, तलाव ओसंडून वाहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. रब्बी हंगामातील पिकांतून चांगले उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडेल, अशी आशा होती. पिकेही जोरदार आली. मात्र, गहू, ज्वारी, हरभरा काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट कोसळले. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळीने गहू, ज्वारी, हरभरा, करडई, टरबूज, खरबूज, पपई, द्राक्ष, आंबे यासह भाजीपाल्यांचे नुकसान झाले. राज्य शासनाकडून नुकसानभरपाईपोटी १० कोटी रुपये मिळाले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडते ना पडते तोच एप्रिल महिन्यातही अवकाळीने हजेरी लावली. यात जिल्ह्यातील ३ हजार ४५ शेतकऱ्यांच्या शेतातील १ हजार ४७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

अवकाळीमुळे १९६ गावांत नुकसान...जिल्ह्यात १ ते ३० एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने १९६ गावांतील ३ हजार ४५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात जिरायती क्षेत्रावरील २९९ हेक्टर, बागायती ४२२ हेक्टर तर ७४८ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यात लातूर वगळता औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर व चाकूर तालुक्यातील गावांत नुकसान झाले आहे.

८७७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण...जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे गतीने करण्यात येत असून, आतापर्यंत १ हजार ९५२ बाधित शेतकऱ्यांच्या ८७७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात जिरायती २३७ हेक्टर, बागायती २७० तर फळपिकांवरील ३६९ हेक्टरवरील पंचनामे झाले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाल्यावर एकूण मदतीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. मार्चमधील नुकसानीचे पंचनामे करून तातडीने दहा कोटींची मदत मिळाली होती. त्याचप्रमाणे आताही पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तहसीलनिहाय बाधित क्षेत्र...तालुका             बाधित संख्या             बाधित क्षेत्रऔसा             ५६                         ४९ (हेक्टर)रेणापूर             १८७             ९७निलंगा             ७७०             २३५शि.अनंत             ४७८             २८३देवणी             १७४                        ५६उदगीर             २९८             १४९जळकोट             ६८४             २९४अहमदपूर             ३३१             २४५चाकूर             ७७             ६०एकूण             ३०४५             १४७०

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेतीlaturलातूर