शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जात घरात ठेवा, भारताचे नागरिक म्हणून बाहेर पडा : नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 19:30 IST

स्वत:ची जात घरात ठेऊन भारताचा नागरिक म्हणून रस्त्यावर उतरा...

ठळक मुद्देतुमचं नाणं खणखणीत असलं की काम मागावं लागत नाही : नाना पाटेकरखुमासदार शैलीने केआयटी मंत्रमुग्ध

कोल्हापूर : पाय ठेवायलाही जागा नसावी इतकं खचाखच भरलेलं केआयटीचं ओपन एअर थिएटर, तब्बल 2 हजार विद्यार्थी, व्यासपीठावरती नाना पाटेकर, इरावती हर्षे, सतीश राजवाडे, निखील साने ही दिग्गज कलाकार मंडळी या सगळया वातावरणाने आज केआयटी फुलून गेले. नाना : आपला मानूस हा गप्पांचा कार्यक्रम केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर च्या वतीने आयोजित करण्यात आला होता.अतिशय विनोदी आणि खुमासदार शैलीत तरुणांसोबत संवाद साधणारे नाना हे कुणी मोठी आसामी भासत नसून सबंध केआयटीच्या तरुणाईला त्यांचे मित्र म्हणून गप्पा मारत होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना देशसेवा, नातीगोती, आई-वडिलांच्या कष्टाची परतफेड, संयम या मुद्यांना स्पर्श करत विद्याथ्र्यांना भावुक साद घातली. सुरुवातीलाच त्यांनी हे स्पष्ट केले कि मी इथे चित्रपट प्रमोशनला आलेलो नाही तर विद्याथ्र्यांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे.त्यांनी तरुणाईला सर्वात महत्वाचा संदेश दिला म्हणजे राजकारण्यांच्या धुर्त खेळीला बळी पडू नका. स्वत:ची जात घरात ठेऊन भारताचा नागरिक म्हणून रस्त्यावर उतरा. राजकारण्यांची मुले परदेशात शिकतात आणि दंगलीच्यावेळी गोरगरीबांची पोरं तुरुंगात जातात त्यामुळे स्वत:चा वापर कुणाला स्वार्थासाठी करु देऊ नका. स्वत:चा मेंदू, स्वत:चा विचार याचाच उपयोग करुन आयुष्य सुंदर बनवा.यावेळी विद्याथ्र्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन काही संवाद त्यांनी सादर केले. यामध्ये त्यांनी नटसम्राट, यशवंत, रुमानी अशा प्रसिध्द स्वगतांनी विद्याथ्र्यांना तल्लीन केले व टाळया, शिटया आणि दंगा याने केआयटीचे वातावरण नानामय झाले.नानांनी त्यांच्या पन्नास वर्षाच्या नाटय व चित्रपट क्षेत्रातील अनुभवांना उजाळा देत त्यांचा जीवनप्रवास उलगडला. जुन्या कलाकारांचे किस्से, नाटकांच्या तालमी याबद्दलची माहिती ऐकुन केआयटीच्या विद्याथ्र्यांच्या ज्ञानात भर पडली. अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणा-या तरुणाईला त्यांनी प्रचंड कष्ट आणि अनुभव गाठीशी बांधण्याचा सल्ला दिला.यावेळी इरावती हर्षे, सतीश राजवाडे, निखील साने यांनीही विद्याथ्र्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन आगामी आपला मानूस या चित्रपटाची माहिती दिली व कार्यक्रमाला अधिकच रंगत आणली. यावेळी केआयटीचे चेअरमन सचिन मेनन, सचिव साजिद हुदली, विश्वस्त सुनिल कुलकर्णी व संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ. एम.एम.मुजुमदार यांनी या सर्व मान्यवरांना कोल्हापुरी गुळ, रोप व केआयटीचे स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. प्रा. प्रमोद पाटील सूत्रसंचालन तर प्रा. अमर टिकोळे, सुनिल माने, अमोल वाघमारे यांनी संयोजन केले. 

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरkolhapurकोल्हापूर