शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तरुण आमदार एकसंध राहून लढाई जिवंत ठेवू - सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 18:18 IST

महायुती जनतेला मान्यच नाही

कोल्हापूर : अशोकराव चव्हाण हे पक्षाचे ज्येष्ठ नेते होते, त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना धक्का आहे. मात्र, अशा प्रसंगाला सामोरे जात आमच्या सारखे तरुण आमदार एकसंध राहून कॉंग्रेसची ही लढाई जिवंत ठेवू, असा विश्वास कॉंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. अशोकराव चव्हाण यांचा हा व्यक्तिगत निर्णय असू शकतो, दिवसभरात कॉंग्रेस आमदारांशी आम्ही संपर्क केला असता, कॉंग्रेसची लढाई पुढे नेण्याची भावना त्यांनी व्यक्त केल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.आमदार पाटील म्हणाले, अशा प्रकारच्या घटनांमुळे पक्षात चिंतेचे वातावरण आहे, हे नाकारता येत नाही. आमची दुसरी पिढी कॉंग्रेसचे प्रामाणिकपणे काम करत आहे. नव्या पिढीला कॉंग्रेसला सक्षमपणे पुढे घेऊन जावे लागणार आहे. राज्यात कॉंग्रेससह महाविकास आघाडीला खूप चांगले वातावरण असल्याचे कॉंग्रेस आमदारांचे म्हणणे आहे. याउलट, भाजपमधील मूळच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. विधानपरिषदेच्या जागा भरल्या जात नाहीत, मंत्रिमंडळाचा विस्तारात संधी मिळत नाही, आता राज्यसभेत किती निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांना संधी मिळते हेही समजेल. यावेळी ‘गोकुळ’ चे संचालक बाबासाहेब चौगले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत आदी उपस्थित होते.महायुती जनतेला मान्यच नाहीजनमाणसात गेल्यानंतर मतप्रवाह लक्षात येतो. महायुती जनतेलाच मान्य नाही. देशात एक-दोन राज्यात काही वेगळे वातावरण असेल पण महाराष्ट्रातील जनतेचा मूड वेगळा आहे, ते आगामी लोकसभा निवडणुकीत दिसेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केले.भाजपने वातावरण बिघडवलेफोडाफोडी करुन ही महाराष्ट्रातील लोकसभेचा सर्व्हे आपल्या बाजूने येत नसल्याचे भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम सुरु असल्याची शंका येत असल्याची टीका आमदार पाटील यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस