शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

यशवंत भालकर यांचा मनाला चटका लावणारा मृत्यू : जिंदादिल माणूस हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 5:38 PM

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून छातीत दुखत होते. बुधवारी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन ते तपासणी करून घेणार होते; परंतु तेवढाही धीर मृत्यूने धरला नाही. त्याआधीच नियतीने त्यांचे ‘पॅकअप’ केले. त्यांचा अचानक मृत्यू मनाला चटका लावून गेला. एक जिंदादिल माणूस हरपल्याची भावना समाजमनांतून व्यक्त झाली.

ठळक मुद्देयशवंत भालकर यांचा मनाला चटका लावणारा मृत्यू : जिंदादिल माणूस हरपलाडॉक्टरांच्या अ‍ॅपॉइंटमेंटआधीच मृत्यूने केले ‘पॅकअप’

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून छातीत दुखत होते. बुधवारी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन ते तपासणी करून घेणार होते; परंतु तेवढाही धीर मृत्यूने धरला नाही. त्याआधीच नियतीने त्यांचे ‘पॅकअप’ केले. त्यांचा अचानक मृत्यू मनाला चटका लावून गेला. एक जिंदादिल माणूस हरपल्याची भावना समाजमनांतून व्यक्त झाली.नेहमी हसत-खेळत असणारे, मंगळवारी (दि. १८) रात्री बारा वाजता सौंदत्ती यात्रेला निघालेल्या गल्लीतील भविकांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या भालकर यांना पहाटे मृत्यूने कवेत घेतले. त्यामुळे सकाळी जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी समजली, तेव्हा अनेकांना त्याचा मोठा धक्काच बसला.

भालकर हे ज्येष्ठ दिग्दर्शक होते. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान मोठे आणि मोलाचे असले तरी एक माणूस, सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख अधिक गडद होती; म्हणूनच त्यांच्या अंत्यसंस्कारांवेळी समाजाच्या सर्वच क्षेत्रांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणूस अचानक निघून जाणे म्हणजे काय असते, असेच काहीसे मरण भालकर यांना आले. त्यांची प्रकृती उत्तम होती. ते गेली अनेक वर्षे रोज सकाळी रंकाळ्यावर फिरायला जात असत. त्यांना यापूर्वी कधी हृदयविकाराचा त्रासही जाणवला नव्हता.

मात्र गेल्या चार दिवसांपूर्वी आजाराची व कदाचित मृत्यूचीही चाहूल त्यांना लागली होती. त्यांच्या एका निकटच्या स्नेह्याच्या मुलीचे लग्न ठरले होते. त्याची लग्नपत्रिका घेऊन ते भालकर यांना भेटले व लग्नाला यायचे आणि शेवटपर्यंत थांबायचे, असा आग्रह करून गेले; परंतु दुर्दैवाने त्यांचे दोन दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. भालकर यांच्या मनाला त्याचा चटका बसला. त्यामुळे गेले दोन दिवस ते रंकाळ्यावर त्यांच्यासोबत फिरणाऱ्यांना सर्वांशी ‘चांगले वागा, माझ्याकडून कुणी दुखावले असेल तर मला माफ करा,’ असे बोलत होते. त्यांना कदाचित मृत्यूची चाहूल लागली होती की काय, अशी शंका व्यक्त झाली.दिग्दर्शकाइतकाच त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता सजग व धडपडणारा होता. मंगळवार पेठेसारख्या जुन्या कोल्हापुरात त्यांची जडणघडण झाली. त्यामुळे सर्वांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती होती. अलीकडील काही वर्षांत त्यांचा रंकाळ्यावर फारच जीव जडला होता. तिथे काही चुकीचे झालेले त्यांना अजिबात आवडायचे नाही. रंकाळ्याची पर्यावरण समृद्धी जोपासण्याची त्यांची धडपड होती. स्वत: लावलेल्या झाडांच्या सान्निध्यातच त्यांनी परवा एकसष्टी साजरी केली होती. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर