शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

World Population Day: कोल्हापूर ‘सेन्सस टाऊन’ शहर, लोकसंख्येत राज्यात नववा क्रमांक

By संदीप आडनाईक | Updated: July 11, 2025 12:38 IST

आयटीहबसाठीच्या पायाभूत सुविधा आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी हे शहर मागे पडले

संदीप आडनाईककोल्हापूर : वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. कोल्हापूर ही एक मोठी आणि कायमस्वरूपी मानवी वस्ती असलेले आणि ‘सेन्सस टाऊन’चे सर्व निकष पूर्ण करणारे शहर आहे. येथे अनेक मोठे गृहनिर्माण प्रकल्प, वाहतूक व्यवस्था आणि दळणवळणासाठी बांधलेली विस्तृत यंत्रणा आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांवर पोहोचली आहे.मुंबई आणि पुणे ही शहरे मेट्रोपोलिटीन झाली असली तरी कोल्हापूरने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. कुठल्याही राज्यातून येऊ दे, इथे आल्यावर मराठीत बोलावेच लागते, हे इथले वैशिष्ट्य. हे दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. मुंबई, पुण्यानंतर आता कोल्हापूरकडे लक्ष आहे. हवामान, दळणवळण, खाद्यसंस्कृती, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन, मेडिकल हब कोल्हापुरात आहे. आयटी कंपन्या आहेत, पण आयटीहबसाठीच्या पायाभूत सुविधा आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी हे शहर मागे पडले आहे.

दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटक अशी विस्तीर्ण भौगोलिक स्थिती, मुंबईला जाणे दूर पडते, शिवाय सोयीस्कर नाही, म्हणून उत्तर कर्नाटकातल्या आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातल्या लोकांसाठी कोल्हापूर हेच सर्वांत मोठे शहर आहे. कानडी लोकांसाठी तर कोल्हापूर म्हणजे मुंबईच आहे. कोल्हापूर, सांगली, मिरज आणि बेळगाव ही कधीही न तुटणारी युती आहे.कोल्हापूरचा क्रमांक नववा राज्यात लोकसंख्येच्या बाबतीत कोल्हापूरचा क्रमांक नववा आहे. १९५० मध्ये कोल्हापूरची लोकसंख्या १,३३,३६५ होती. गेल्या वर्षी कोल्हापूरमध्ये १२,४६० लोकसंख्या वाढली आहे, जी वार्षिक १.९ टक्के वाढ दाखवते. २०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३,८७६,००१ आहे. त्यापैकी १९,८०,६५८ पुरुष, तर १८,९५,३४३ महिला आहेत. २०११ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ८,४०,२४० कुटुंबे राहत होती. २०२५ मध्ये शहराची लोकसंख्या ६,६९,००८ इतकी आहे.

व्यक्तीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा येथे आहेत, नोकरीच्या संधीही उपलब्ध आहेत. त्यामुळे हे शहर ‘सेन्सस टाऊन’चे सर्व निकष पूर्ण करते. -के. पी. खोत, अध्यक्ष, क्रीडाई. पाटील