शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा पाझर तलावांचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 3:03 PM

समीर देशपांडे कोल्हापूर : भूसंपादनाअभावी जिल्ह्यातील सहा पाझर तलावांचे काम रखडले असून, यामध्ये आठ-नऊ वर्षांपूर्वीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्हा ...

ठळक मुद्देभूसंपादन न झाल्याचा परिणाम, विरोधामुळे चार तलावांचे काम रद्द

समीर देशपांडेकोल्हापूर : भूसंपादनाअभावी जिल्ह्यातील सहा पाझर तलावांचे काम रखडले असून, यामध्ये आठ-नऊ वर्षांपूर्वीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो आणि जलसंधारण विभागाच्या वतीने हे पाझर तलावांचे काम केले जाते. भूसंपादनाच्या विरोधामुळे चार तलावांचे प्रस्तावही रद्द करण्यात आले आहेत.

चंदगड तालुक्यातील कडलगे (बु.) येथे २0१२/१३ ला ७४ लाख रुपये खर्चाचा पाझर तलाव मंजूर करण्यात आला होता. ३0 हेक्टर क्षेत्रासाठी या पाण्याचा उपयोग होणार असून, यावर मार्च १९ अखेर ३३ लाख रुपये खर्च झाले आहेत; मात्र एका शेतकऱ्याने तीव्र विरोध केल्याने येथील काम बंद ठेवण्यात आले आहे. ही जागा अन्य व्यक्तीला विकली गेल्याने हे काम निम्म्या खर्चानंतर थांबले आहे.याच तालुक्यातील होसुर येथे २0१३/१४ साली १ कोटी ८४ लाख रुपये खर्चून पाझर तलावाचे काम मंजूर करण्यात आले. यातून ३0 हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ होणार आहे. येथील जलरोधकाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु येथेही एका शेतकºयाच्या विरोधामुळे न्यायालयात केस सुरू आहे. चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे २0१४/१५ साली मंजूर झालेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या या पाझर तलावासाठी भूसंपादन प्रगतीमध्ये असून, सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

कागल तालुक्यातील अवचितवाडी येथे २0१४/१५ साली पाझर तलाव मंजूर करण्यात आला; त्यासाठी ७९ लाख रुपये मंजूरही करण्यात आले होते; परंतु स्थानिकांचा विरोध असल्याने हे काम रद्द करण्याचा निर्णय जलसंधारण विभागाने घेतला आहे.आजरा तालुक्यातील मोरेवाडी येथील पाझर तलावाचे काम तर सन २0१0/११ मध्ये मंजूर झाले होते. एक कोटी ८२ लाखांचे हे काम असून, याचा फायदा ३१ हेक्टर क्षेत्राला होणार आहे. पावणेचार हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन यासाठी आवश्यक असून, सुधारित अंदाजपत्रकही सादर करण्यात आले आहे.कागल तालुक्यातील तमनाकवाडा येथील पाझर तलाव २00५/0६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. ५७ हेक्टरला या तलावाच्या माध्यमातून मिळणार असून, तीन कोटी ५३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पाझर तलावाचे ७0 टक्के काम झाले असून, अजून ते पूर्ण झालेले नाही.रद्द झालेले तलावकागल तालुक्यातील दौलतवाडी येथे २00७/0८ साली ४७ हेक्टरला पाणीपुरवठा होईल, असा ६१ लाख रुपये खर्चाचा पाझर तलाव मंजूर करण्यात आला होता. याच तालुक्यातील बोळावी येथे ४८ हेक्टरसाठीचा ४0 लाखांचा पाझर तलाव २00६/0७ साली मंजूर करण्यात आला होता. पन्हाळा तालुक्यातील आवळी आणि राधानगरी तालुक्यातील ठिकपूर्ली येथेही अनुक्रमे ५२ आणि ७४ लाख रुपये खर्चाचे तलाव मंजूर करण्यात आले होते; मात्र भूसंपादनाला स्थानिकांचा विरोध असल्याने या चारही तलावांचे काम रद्द करण्यात आले आहे.

१८९४ सालच्या मूळ भूसंपादन कायद्यामध्ये १९८४ मध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर त्यातील त्रुटी दूर करून २0१३ साली केंद्र शासनाचा नवा भूसंपादन कायदा आला. त्याची मार्गदर्शक तत्वे नंतर आल्याने २0१७ पासून नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. भूसंपादनाला स्थानिकांचा विरोध यामुळे काही प्रकल्प रद्द करावे लागले असून, उर्वरित प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.यशवंत थोरातजिल्हा जलसंधारण अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater shortageपाणीकपात