शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अलमट्टी धरणाच्या उंचीप्रश्नी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊ - देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:35 IST

महापुराचा धोका निर्माण होणार नाही

जयसिंगपूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत मांडण्यात आलेल्या प्रश्नावर आम्ही संपूर्ण लक्ष ठेवून आहोत. महापुरासाठी स्वतंत्र समितीची स्थापना केली आहे. त्या समितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सगळा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आपण करून ठेवली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगली-कोल्हापूर भागात महापुराचा धोका निर्माण होणार नाही याकरिता जे काही करावे लागेल ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणे असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नांदणी (ता. शिरोळ) येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामहोत्सव महामस्तकाभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी महापुरासोबतच पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने ३५० कोटी रुपयांचा निधी आपण दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांत पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न मिटणार आहे. तर कोल्हापूर-सांगली जिल्हादेखील पूरमुक्त होणार आहे. अशातच अलमट्टीची उंची वाढविली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांना सांगितले. हा धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला भेडसावणाऱ्या महापुरापासून मुक्ती मिळावी यासाठी समिती काम करीत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण होणार नाही, यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न असणार आहेत.महापूरप्रश्नी सर्व अभ्यास करून आवश्यकता असेल तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी ठेवली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंचीप्रश्नी मांडण्यात आलेल्या प्रश्नावर आम्ही संपूर्ण लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जैन महामंडळ आणखी मजबूत करणारजयसिंगपूर : जगा आणि जगू द्या, ही शिकवण देणारा हजारो वर्षांचा इतिहास सांगणारा प्राचीन धर्म म्हणजे जैन धर्म. जैन समाजाने अहिंसा व अपरिग्रह सांगितले आहे. जगात सर्वाधिक पुण्यकार्य, दानकार्य व समाजकार्य करणारा समाज म्हणून जैन धर्माची ओळख आहे. सरकारने जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ तयार केले आहे. मजबूत पिढी उभी करण्याचे काम या महामंडळाच्या माध्यमातून कसे करता येईल, हा प्रयत्न असणार आहेत. हे महामंडळ आणखी बळकट करू त्याला आर्थिक पाठबळ देऊ, तसेच नांदणी येथील मठाला अ वर्ग दर्जा निश्चित देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरKarnatakकर्नाटकDamधरण