शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

दहा रुपयांत चप्पल मिळते का हो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:49 IST

कोल्हापूर : शासकीय यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या कोतवालांना वर्षानुवर्षे केवळ १० रुपये चप्पल भत्ता दिला ...

कोल्हापूर : शासकीय यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या कोतवालांना वर्षानुवर्षे केवळ १० रुपये चप्पल भत्ता दिला जातो. छोटा बिस्कीटचा पुडा पैशात येतो ती रक्कम चप्पल भत्ता म्हणून देत शासनाने कोतवालांची कुचेष्टाच केली आहे. भरमसाठ काम, तुटपुंजे मानधन आणि बढतीची प्रतीक्षाच अशी त्यांची स्थिती आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये असलेल्या सज्जांच्या प्रमाणात कोतवालांची नियुक्ती केली जाते. शासकीय कागदपत्रांनी ने-आण, तालुक्यात आलेल्या अधिकाऱ्यांना माहिती देणे, शासनाकडून आलेल्या शासनाच्या विविध आदेशांची माहिती नागरिकांपर्यंत पाेहोचवणे, तलाठी, तहसीलदार यांना कामात मदत करणे ही कोतवालांना नेमून दिलेले काम आहे. पण त्या व्यतिरिक्त जिथे कमी तिथे कोतवाल अशा पद्धतीने त्यांना कामे करावी लागतात. पूर्वी शासकीय टपाल ने-आण करण्यासाठी कोतवालांना फिरावे लागते म्हणून कोतवालांना १० रुपये चप्पल भत्ता मंजूर करण्यात आला होता. याबाबत १९७० पासूनची माहिती आहे. तेव्हा महागाई कमी होती, त्यावेळच्या पैशांच्या मूल्यानुसार ही रक्कम ठरवण्यात आली. पण आता ५० वर्षांनंतरदेखील या रकमेत वाढ झालेली नाही. अगदी साधी चप्पल घ्यायची म्हटली तरी ५० ते १०० रुपये लागतात. आम्हाला माणूस म्हणून जगण्याच्या लायकी एवढा तरी भत्ता द्या नाही, तर देऊ नका असे त्यांचे म्हणणे आहे.

----

तालुका : मंजूर पदे : भरलेली पदे : रिक्त पदे

राधानगरी : ३८ : ३३ : ५

भुदरगड : ३३ : २६ : ७

आजरा : २४ : २१ : ३

चंदगड : ३७ : २५ : १२

करवीर : ६२ : ४९ : १३

शाहूवाडी : ४१ : ३५ : ६

पन्हाळा : ४० : ३३ : ७

कागल : ४२ : ३७ : ५

गडहिंग्लज : ४३ : ३३ : १०

हातकणंगले : ४४ : ३७ : ७

शिरोळ : ३९ : २९ : १०

गगनबावडा : ९ : ९ : ०

एकूण : ४५२ : ३६७ : ८५

--

२०१४ पासून पदोन्नती नाही

कोतवालांना तलाठी, लिपिक, कारकून, अव्वल कारकून अगदी नायब तहसीलदार पदापर्यंत बढती मिळते; पण जिल्ह्यात २०१४ पासून कोतवालांची पदोन्नतीच झालेली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये या मागण्या सकारात्मकतेने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

----

अपुऱ्या मानधनात कसे भागणार?

कोतवालांना २०१९ पर्यंत ५ हजार ५०० रुपये मानधन दिले जायचे. त्यावेळी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनानंतर त्यात वाढ करून ४० वर्षांपर्यंतच्या लोकांना ७ हजार ७०० रुपये व ५० वर्षांवरील कोतवालांना १५ हजार रुपये अशी वेगवेगळी रक्कम देऊ केली. त्यानंतर महापूर, कोरोनासारखी आपत्ती आणि महागाई वाढली. पण त्या तुलनेत मिळणारे मानधन अत्यल्प आहे. आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील याप्रमाणे समान काम समान मानधन द्या, अशी मागणी आहे.

---

तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कोतवालांवरच शासनाने गेली ५० वर्षे अन्याय केला आहे. १० रुपयांच्या चप्पल भत्त्यापोटी आमचे ३७० रुपये कर कापला जातो. भाजप सरकारने ४० वर्षांखालील व ५० वर्षांनंतरच्या कोतवालांना वेगवेगळे मानधन देऊन संघटनेत फूट पाडली. आता आम्ही महाविकास आघाडी सरकारकडे सरसकट १५ हजार रुपये मानधन व चतुर्थश्रेणी कामगार म्हणून वेतनावर घ्या, अशी मागणी केली आहे.

-दयानंद कांबळे, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटना

----