शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

दहा रुपयांत चप्पल मिळते का हो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:49 IST

कोल्हापूर : शासकीय यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या कोतवालांना वर्षानुवर्षे केवळ १० रुपये चप्पल भत्ता दिला ...

कोल्हापूर : शासकीय यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या कोतवालांना वर्षानुवर्षे केवळ १० रुपये चप्पल भत्ता दिला जातो. छोटा बिस्कीटचा पुडा पैशात येतो ती रक्कम चप्पल भत्ता म्हणून देत शासनाने कोतवालांची कुचेष्टाच केली आहे. भरमसाठ काम, तुटपुंजे मानधन आणि बढतीची प्रतीक्षाच अशी त्यांची स्थिती आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये असलेल्या सज्जांच्या प्रमाणात कोतवालांची नियुक्ती केली जाते. शासकीय कागदपत्रांनी ने-आण, तालुक्यात आलेल्या अधिकाऱ्यांना माहिती देणे, शासनाकडून आलेल्या शासनाच्या विविध आदेशांची माहिती नागरिकांपर्यंत पाेहोचवणे, तलाठी, तहसीलदार यांना कामात मदत करणे ही कोतवालांना नेमून दिलेले काम आहे. पण त्या व्यतिरिक्त जिथे कमी तिथे कोतवाल अशा पद्धतीने त्यांना कामे करावी लागतात. पूर्वी शासकीय टपाल ने-आण करण्यासाठी कोतवालांना फिरावे लागते म्हणून कोतवालांना १० रुपये चप्पल भत्ता मंजूर करण्यात आला होता. याबाबत १९७० पासूनची माहिती आहे. तेव्हा महागाई कमी होती, त्यावेळच्या पैशांच्या मूल्यानुसार ही रक्कम ठरवण्यात आली. पण आता ५० वर्षांनंतरदेखील या रकमेत वाढ झालेली नाही. अगदी साधी चप्पल घ्यायची म्हटली तरी ५० ते १०० रुपये लागतात. आम्हाला माणूस म्हणून जगण्याच्या लायकी एवढा तरी भत्ता द्या नाही, तर देऊ नका असे त्यांचे म्हणणे आहे.

----

तालुका : मंजूर पदे : भरलेली पदे : रिक्त पदे

राधानगरी : ३८ : ३३ : ५

भुदरगड : ३३ : २६ : ७

आजरा : २४ : २१ : ३

चंदगड : ३७ : २५ : १२

करवीर : ६२ : ४९ : १३

शाहूवाडी : ४१ : ३५ : ६

पन्हाळा : ४० : ३३ : ७

कागल : ४२ : ३७ : ५

गडहिंग्लज : ४३ : ३३ : १०

हातकणंगले : ४४ : ३७ : ७

शिरोळ : ३९ : २९ : १०

गगनबावडा : ९ : ९ : ०

एकूण : ४५२ : ३६७ : ८५

--

२०१४ पासून पदोन्नती नाही

कोतवालांना तलाठी, लिपिक, कारकून, अव्वल कारकून अगदी नायब तहसीलदार पदापर्यंत बढती मिळते; पण जिल्ह्यात २०१४ पासून कोतवालांची पदोन्नतीच झालेली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये या मागण्या सकारात्मकतेने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

----

अपुऱ्या मानधनात कसे भागणार?

कोतवालांना २०१९ पर्यंत ५ हजार ५०० रुपये मानधन दिले जायचे. त्यावेळी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनानंतर त्यात वाढ करून ४० वर्षांपर्यंतच्या लोकांना ७ हजार ७०० रुपये व ५० वर्षांवरील कोतवालांना १५ हजार रुपये अशी वेगवेगळी रक्कम देऊ केली. त्यानंतर महापूर, कोरोनासारखी आपत्ती आणि महागाई वाढली. पण त्या तुलनेत मिळणारे मानधन अत्यल्प आहे. आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील याप्रमाणे समान काम समान मानधन द्या, अशी मागणी आहे.

---

तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कोतवालांवरच शासनाने गेली ५० वर्षे अन्याय केला आहे. १० रुपयांच्या चप्पल भत्त्यापोटी आमचे ३७० रुपये कर कापला जातो. भाजप सरकारने ४० वर्षांखालील व ५० वर्षांनंतरच्या कोतवालांना वेगवेगळे मानधन देऊन संघटनेत फूट पाडली. आता आम्ही महाविकास आघाडी सरकारकडे सरसकट १५ हजार रुपये मानधन व चतुर्थश्रेणी कामगार म्हणून वेतनावर घ्या, अशी मागणी केली आहे.

-दयानंद कांबळे, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटना

----