शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पेट्रोल पंप कामगारांची परवड थांबणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:55 IST

दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : किमान वेतन आणि आठ तास कामाचा कायदा असतानाही पेट्रोल पंप व गॅस एजन्सी कामगारांना तुटपुंजा पगार आणि २४ तास काम लावून मालकांकडून त्यांची गळचेपी होत आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक कामगार आपल्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचे साधन म्हणून हे काम करीत आहेत, तर जिल्ह्यात २५४ पेट्रोल ...

दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : किमान वेतन आणि आठ तास कामाचा कायदा असतानाही पेट्रोल पंप व गॅस एजन्सी कामगारांना तुटपुंजा पगार आणि २४ तास काम लावून मालकांकडून त्यांची गळचेपी होत आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक कामगार आपल्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचे साधन म्हणून हे काम करीत आहेत, तर जिल्ह्यात २५४ पेट्रोल पंप असून, यामध्ये साधारणत: तीन हजार कामगार कार्यरत आहेत. पंपमालकांच्या मनमानीमुळे या कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, सीटूच्या झेंड्याखाली एकसंध होत न्याय्य हक्कासाठी हे कामगार लढा उभा करण्याच्या तयारीत आहेत.२ आॅक्टोबर२०१७ ला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकांनी आदेश काढून सर्व पंपमालकांना किमान वेतनाच्या सूचना दिल्या होत्या. पंपमालकांची कमिशन वाढ करताना ही अट घातली होती. मात्र, याची तंतोतंत अंमलबजावणी होताना दिसत नाही.म्हणूनच किमान वेतनला खीळ : लाल बावटाविविध कंपन्यांचे सेल्स आॅफिसर व स्थानिक पंपमालकांमध्ये सेटलमेंट होत असते. त्यामुळेच कंपनीकडून कामगारांना किमान वेतन व आठ तास कामाबाबत विचारणा होत नाही;परंतु यामध्ये कामगार भरडला जात असून, त्यांच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसत असल्याचा आरोप संघटनेचे नेते भरमा कांबळे व कॉ.चंद्रकांत यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.अशी होते पिळवणूक..!थंडी,ऊन, वारा,पाऊस यांचा विचार न करता हे कामगार पंपावर काम करतात.कामगारांकडे वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल सोडण्याचे काम असले तरी वेतनाचा रिमोट कंट्रोल मालकांकडेच असतो. या कामगारांना किमान दरमहा१६हजार रुपयांपर्यंत वेतन देण्याचा कायदा आहे. मात्र,ग्रामीण भागात३ते४हजार व शहरी भागात५ते७हजारांपर्यंतच वेतन दिले जाते.त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात त्यांचे वेतन जमा करण्यात येऊ लागले; परंतु पगारात अल्पशी वाढ करून उर्वरित रक्कम बँक खात्यावरून कामगाराने काढून मालकांकडे सुपूर्द करण्याचा अलिखित नियम करून वेठीस धरले जात आहे.त्यामुळे कामगारांकडे अन्य वेतन मालकांकडे अशी स्थिती झाली आहे....अन् पहारेकऱ्यांचीही भूमिकाग्रामीण भागातील पंपांवर दोन किंवा तीनच कर्मचारी असतात.२४तास ड्यूटी असल्यामुळे रात्री-अपरात्रीही एकट्यालाच थांबावे लागते. वॉचमन नसल्यामुळे या कामगारांना पंपाचा पहारेकरी व्हावे लागते. तसेच विक्री झालेल्या पेट्रोल-डिझेलचे पैसे सकाळपर्यंत सांभाळून ठेवताना दमछाक होत असल्याचे कामगारांतून बोलले जात आहे.