शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

पेट्रोल पंप कामगारांची परवड थांबणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:55 IST

दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : किमान वेतन आणि आठ तास कामाचा कायदा असतानाही पेट्रोल पंप व गॅस एजन्सी कामगारांना तुटपुंजा पगार आणि २४ तास काम लावून मालकांकडून त्यांची गळचेपी होत आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक कामगार आपल्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचे साधन म्हणून हे काम करीत आहेत, तर जिल्ह्यात २५४ पेट्रोल ...

दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : किमान वेतन आणि आठ तास कामाचा कायदा असतानाही पेट्रोल पंप व गॅस एजन्सी कामगारांना तुटपुंजा पगार आणि २४ तास काम लावून मालकांकडून त्यांची गळचेपी होत आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक कामगार आपल्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचे साधन म्हणून हे काम करीत आहेत, तर जिल्ह्यात २५४ पेट्रोल पंप असून, यामध्ये साधारणत: तीन हजार कामगार कार्यरत आहेत. पंपमालकांच्या मनमानीमुळे या कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, सीटूच्या झेंड्याखाली एकसंध होत न्याय्य हक्कासाठी हे कामगार लढा उभा करण्याच्या तयारीत आहेत.२ आॅक्टोबर२०१७ ला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकांनी आदेश काढून सर्व पंपमालकांना किमान वेतनाच्या सूचना दिल्या होत्या. पंपमालकांची कमिशन वाढ करताना ही अट घातली होती. मात्र, याची तंतोतंत अंमलबजावणी होताना दिसत नाही.म्हणूनच किमान वेतनला खीळ : लाल बावटाविविध कंपन्यांचे सेल्स आॅफिसर व स्थानिक पंपमालकांमध्ये सेटलमेंट होत असते. त्यामुळेच कंपनीकडून कामगारांना किमान वेतन व आठ तास कामाबाबत विचारणा होत नाही;परंतु यामध्ये कामगार भरडला जात असून, त्यांच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसत असल्याचा आरोप संघटनेचे नेते भरमा कांबळे व कॉ.चंद्रकांत यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.अशी होते पिळवणूक..!थंडी,ऊन, वारा,पाऊस यांचा विचार न करता हे कामगार पंपावर काम करतात.कामगारांकडे वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल सोडण्याचे काम असले तरी वेतनाचा रिमोट कंट्रोल मालकांकडेच असतो. या कामगारांना किमान दरमहा१६हजार रुपयांपर्यंत वेतन देण्याचा कायदा आहे. मात्र,ग्रामीण भागात३ते४हजार व शहरी भागात५ते७हजारांपर्यंतच वेतन दिले जाते.त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात त्यांचे वेतन जमा करण्यात येऊ लागले; परंतु पगारात अल्पशी वाढ करून उर्वरित रक्कम बँक खात्यावरून कामगाराने काढून मालकांकडे सुपूर्द करण्याचा अलिखित नियम करून वेठीस धरले जात आहे.त्यामुळे कामगारांकडे अन्य वेतन मालकांकडे अशी स्थिती झाली आहे....अन् पहारेकऱ्यांचीही भूमिकाग्रामीण भागातील पंपांवर दोन किंवा तीनच कर्मचारी असतात.२४तास ड्यूटी असल्यामुळे रात्री-अपरात्रीही एकट्यालाच थांबावे लागते. वॉचमन नसल्यामुळे या कामगारांना पंपाचा पहारेकरी व्हावे लागते. तसेच विक्री झालेल्या पेट्रोल-डिझेलचे पैसे सकाळपर्यंत सांभाळून ठेवताना दमछाक होत असल्याचे कामगारांतून बोलले जात आहे.