शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

पेट्रोल पंप कामगारांची परवड थांबणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:55 IST

दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : किमान वेतन आणि आठ तास कामाचा कायदा असतानाही पेट्रोल पंप व गॅस एजन्सी कामगारांना तुटपुंजा पगार आणि २४ तास काम लावून मालकांकडून त्यांची गळचेपी होत आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक कामगार आपल्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचे साधन म्हणून हे काम करीत आहेत, तर जिल्ह्यात २५४ पेट्रोल ...

दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : किमान वेतन आणि आठ तास कामाचा कायदा असतानाही पेट्रोल पंप व गॅस एजन्सी कामगारांना तुटपुंजा पगार आणि २४ तास काम लावून मालकांकडून त्यांची गळचेपी होत आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक कामगार आपल्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचे साधन म्हणून हे काम करीत आहेत, तर जिल्ह्यात २५४ पेट्रोल पंप असून, यामध्ये साधारणत: तीन हजार कामगार कार्यरत आहेत. पंपमालकांच्या मनमानीमुळे या कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, सीटूच्या झेंड्याखाली एकसंध होत न्याय्य हक्कासाठी हे कामगार लढा उभा करण्याच्या तयारीत आहेत.२ आॅक्टोबर२०१७ ला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकांनी आदेश काढून सर्व पंपमालकांना किमान वेतनाच्या सूचना दिल्या होत्या. पंपमालकांची कमिशन वाढ करताना ही अट घातली होती. मात्र, याची तंतोतंत अंमलबजावणी होताना दिसत नाही.म्हणूनच किमान वेतनला खीळ : लाल बावटाविविध कंपन्यांचे सेल्स आॅफिसर व स्थानिक पंपमालकांमध्ये सेटलमेंट होत असते. त्यामुळेच कंपनीकडून कामगारांना किमान वेतन व आठ तास कामाबाबत विचारणा होत नाही;परंतु यामध्ये कामगार भरडला जात असून, त्यांच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसत असल्याचा आरोप संघटनेचे नेते भरमा कांबळे व कॉ.चंद्रकांत यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.अशी होते पिळवणूक..!थंडी,ऊन, वारा,पाऊस यांचा विचार न करता हे कामगार पंपावर काम करतात.कामगारांकडे वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल सोडण्याचे काम असले तरी वेतनाचा रिमोट कंट्रोल मालकांकडेच असतो. या कामगारांना किमान दरमहा१६हजार रुपयांपर्यंत वेतन देण्याचा कायदा आहे. मात्र,ग्रामीण भागात३ते४हजार व शहरी भागात५ते७हजारांपर्यंतच वेतन दिले जाते.त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात त्यांचे वेतन जमा करण्यात येऊ लागले; परंतु पगारात अल्पशी वाढ करून उर्वरित रक्कम बँक खात्यावरून कामगाराने काढून मालकांकडे सुपूर्द करण्याचा अलिखित नियम करून वेठीस धरले जात आहे.त्यामुळे कामगारांकडे अन्य वेतन मालकांकडे अशी स्थिती झाली आहे....अन् पहारेकऱ्यांचीही भूमिकाग्रामीण भागातील पंपांवर दोन किंवा तीनच कर्मचारी असतात.२४तास ड्यूटी असल्यामुळे रात्री-अपरात्रीही एकट्यालाच थांबावे लागते. वॉचमन नसल्यामुळे या कामगारांना पंपाचा पहारेकरी व्हावे लागते. तसेच विक्री झालेल्या पेट्रोल-डिझेलचे पैसे सकाळपर्यंत सांभाळून ठेवताना दमछाक होत असल्याचे कामगारांतून बोलले जात आहे.