शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

विभागीय क्रीडासंकुल पूर्ण होणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:18 IST

कोल्हापूर : कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग , सांगली, सातारा अशा पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडासंकुल असावे, याकरिता २००९ साली तत्कालीन सरकारने संभाजीनगर येथे तुरुंग विभागाकडे असलेल्या जागेपैकी १७ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केली. तत्काळ कामास सुरुवातही झाली. मात्र, अद्यापही हे संकुल पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. यासाठी २३ कोटी रुपये ...

कोल्हापूर : कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा अशा पाच जिल्ह्यांसाठी परिपूर्ण विभागीय क्रीडासंकुल असावे, याकरिता २००९ साली तत्कालीन सरकारने संभाजीनगर येथे तुरुंग विभागाकडे असलेल्या जागेपैकी १७ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केली. तत्काळ कामास सुरुवातही झाली. मात्र, अद्यापही हे संकुल पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. यासाठी २३ कोटी रुपये निधी उपलब्ध केला होता. त्यात वाढ होत-होत आता ३६ कोटी रुपये झाले तरी हे संकुल काही केल्या पूर्ण होण्याचे नाव घेईना.संभाजीनगर रेसकोर्स नाक्याजवळील कैद्यांची शेतीमधील १७ एकर जागा या संकुलासाठी देण्यात आली आहे. यात ४०० मीटर धावपट्टी, टेनिस कोर्ट, खो-खो, कबड्डी, फुटबॉल मैदान, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, शुटिंग रेंज, जलतरण तलाव, आदींचा समावेश होता. यातील गेल्या आठ वर्षांत जलतरण तलाव व शूटिंग रेंज वगळता सर्व मैदाने सर्वांसाठी खुली केली आहेत. जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हवा होता; म्हणून तज्ज्ञ वास्तुविशारदाकडून त्याचा आराखडा करण्यात आला. त्यात त्रुटी राहिल्याने त्या जलतरण तलावामध्ये संकुलाच्या संरक्षक भिंतींमागून जाणाºया छोट्या ओढ्याचे पाणी मुरू लागले. ही बाब संपूर्ण तलाव बांधून झाल्यानंतर लक्षात आली. त्यामुळे यावर काय करायचे याचा खल करण्यातच तीन वर्षे गेली. प्रत्येक वेळी क्रीडाप्रेमींनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागायची. ते म्हणायचे, लवकरच काम पूर्ण करून ते सर्वांसाठी खुले करू. या आश्वासनाशिवाय क्रीडाप्रेमींना काहीच मिळत नाही. २५ बाय ५० मीटरच्या या तलावासाठी पुन्हा आराखडा समितीची नेमणूक केली आहे. अजूनही या समितीचा अहवाल संकुल समितीला प्राप्त झालेला नाही. मुळातच या ठिकाणी तलावासाठी योग्य जागा नाही, हे तज्ज्ञांना का समजले नाही? त्यामुळे यावरील कोट्यवधीचा खर्च फुकट गेला असून त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे की जनतेचा पैसा असाच कोणीतरी लाटून नेणार आहे, ही भावना कोल्हापूरकरांच्या मनात निर्माण होत आहे२०१४ पासून क्रीडा उपसंचालक कार्यालयास पूर्ण वेळ उपसंचालक लाभलेला नाही. अनेकवेळा प्रभारी म्हणून नेमणूक केली. विशेष म्हणजे या संकुलाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार विभागीय क्रीडा उपसंचालकांना आहे. त्यामुळे ते बसणार अन्यत्र; तेथून हा सर्व कारभार ते हाकतात. त्यामुळे या संकुलाचे काम काही केल्या पूर्ण होईनासे झाले आहे.आदेशानंतरही काम संथगेल्या चार वर्षांपासून जलतरण तलाव, शूटिंग रेंज याबाबत विभागीय आयुक्तांच्या अखत्यारित २० हून अधिक आढावा बैठका झाल्या आहेत; तर हे काम पूर्ण होता-होता दोन विभागीय आयुक्तांची बदली झाली; तर नव्याने त्या ठिकाणी चंद्रकांत दळवी यांनी पदभार घेतला. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनीही काम लवकर करण्याचे आदेश देत नाराजीही व्यक्त केली; पण अजूनही हे काम काही केल्या पूर्ण होईनासे झाले आहे.महिला व पुरुषस्वच्छतागृहांची वानवाइतके कोटी रुपये खर्चून क्रीडासंकुलाची उभारणी केली; पण त्यात खेळाडूंना लागणाºया प्राथमिक सुविधांचा विचारच केलेला नाही. पुरुष व महिलांकरिता स्वच्छतागृह व चेंजिंंग रूम नाहीत. यासह जलतरण तलावासाठी लागणाºया फिल्टरेशन प्लँटची सोय अद्यापही केलेली नाही.शूटिंग रेंज पूर्ण; पण खुली नाहीगेल्या काही वर्षांमध्ये शूटिंग रेंज पूर्ण व्हावी म्हणून नेमबाजांसह क्रीडाप्रेमी ओरड करीत होते. त्यानुसार १० मीटर, २५ मीटर व ५० मीटरच्या अंतर्बाह्य अशा दोन रेंज तयार झाल्या आहेत; पण त्या संकुल समितीकडे अद्यापही हस्तांतरित झालेल्या नाहीत, अशी ओरड समितीकडून होत आहे. विशेष म्हणजे यातील लागणारे शस्त्रसाहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे क्रीडा विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ही रेंज अजूनही काही दिवस नेमबाजांना उपलब्ध होईल की नाही हे सांगता येत नाही.कामाचा दर्जा कोण तपासणार?यापूर्वी झालेल्या कामाचा दर्जा त्रयस्थांमार्फत तपासण्यात यावा, अशी क्रीडाप्रेमींकडून मागणी होत आहे. काही कामांचे आताच तीनतेरा वाजले आहेत. फरशा उखडणे, आदी कामे नव्याने केली पाहिजेत. त्यातून दर्जात्मक काम किती झाले हे समजेल. तसेच जलतरण तलावाचा आराखडा करतेवेळी या सर्व बाबींचा विचार न करता काम करून ते पूर्ण होईपर्यंत तलावात अशुद्ध पाणी मुरते, ही बाब तज्ज्ञांच्या लक्षात कशी आली नाही? झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीस कोण जबाबदार? असाही सवाल क्रीडाप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. दोषींवर कारवाई करून नुकसानीचा खर्च वसूल करण्याचीही मागणी होत आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर