शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जात-धर्म नव्हे तर शेतकरी-कष्टकरी धाेक्यात - बच्चू कडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 13:33 IST

'निवडणुका आल्यावर जातीचे राजकारण मनात पेरले जाते'

शिराळा : आतंकवाद हा काेणत्या जाती-धर्मात नव्हे तर राजकीय पक्षाच्या राजकारणात वाढत आहे. देशात सर्वच राजकीय पक्ष, धर्म, जात धोक्यात आहे, असे सांगत आहेत. मात्र आज खऱ्या अर्थाने शेतकरी, मजूर, कष्टकरी वर्ग धोक्यात आहे, असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी केले.शिराळा येथे शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बच्चू कडू बोलत होते. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जालिंदर पाटील, सौरभ शेट्टी, ‘प्रहार’चे तालुकाध्यक्ष बंटी नांगरे-पाटील, युवक क्रांतीचे निमंत्रक कैलास देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.बच्चू कडू म्हणाले, जात-धर्म यावर निवडणूक जिंकता येत नाही. आजकालचा राजकीय आतंकवाद शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे. राजकीय नेते गुलाम आहेत. त्यांची उमेदवारी दिल्लीत ठरते. मात्र शेट्टी यांची उमेदवारी लोकांमधून आहे. राममंदिर झाले, ही चांगली गोष्ट आहे. मात्र रामभक्त शेतकरी घरात पाय घासून मरत आहेत. राहुल गांधी युवक, महिलांना एक लाख रुपये देणार म्हणताहेत. पण ते देणार कोठून? देशाचा अर्थसंकल्प ४५ लाख कोटींचा आहे. त्यात देशातील ६० कोटी शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी, तर २० लाख नोकरांसाठी २० लाख कोटींची तरतूद अशी दुरवस्था आहे. निवडणुका आल्यावर जातीचे राजकारण मनात पेरले जाते. मात्र शेतकऱ्यांसाठी लढणारे कोणी नाही.राजू शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांच्या कर्जास सरकार हमी देते. तेच सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जास का हमी देत नाही. थकीत ऊस बिले मिळण्यासाठी मी मैदानात आहे. कारखानदाराच्या उरावर बसून पैसे मिळवून देणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Bacchu Kaduबच्चू कडूRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी