शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

जात-धर्म नव्हे तर शेतकरी-कष्टकरी धाेक्यात - बच्चू कडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 13:33 IST

'निवडणुका आल्यावर जातीचे राजकारण मनात पेरले जाते'

शिराळा : आतंकवाद हा काेणत्या जाती-धर्मात नव्हे तर राजकीय पक्षाच्या राजकारणात वाढत आहे. देशात सर्वच राजकीय पक्ष, धर्म, जात धोक्यात आहे, असे सांगत आहेत. मात्र आज खऱ्या अर्थाने शेतकरी, मजूर, कष्टकरी वर्ग धोक्यात आहे, असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी केले.शिराळा येथे शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बच्चू कडू बोलत होते. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जालिंदर पाटील, सौरभ शेट्टी, ‘प्रहार’चे तालुकाध्यक्ष बंटी नांगरे-पाटील, युवक क्रांतीचे निमंत्रक कैलास देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.बच्चू कडू म्हणाले, जात-धर्म यावर निवडणूक जिंकता येत नाही. आजकालचा राजकीय आतंकवाद शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे. राजकीय नेते गुलाम आहेत. त्यांची उमेदवारी दिल्लीत ठरते. मात्र शेट्टी यांची उमेदवारी लोकांमधून आहे. राममंदिर झाले, ही चांगली गोष्ट आहे. मात्र रामभक्त शेतकरी घरात पाय घासून मरत आहेत. राहुल गांधी युवक, महिलांना एक लाख रुपये देणार म्हणताहेत. पण ते देणार कोठून? देशाचा अर्थसंकल्प ४५ लाख कोटींचा आहे. त्यात देशातील ६० कोटी शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी, तर २० लाख नोकरांसाठी २० लाख कोटींची तरतूद अशी दुरवस्था आहे. निवडणुका आल्यावर जातीचे राजकारण मनात पेरले जाते. मात्र शेतकऱ्यांसाठी लढणारे कोणी नाही.राजू शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांच्या कर्जास सरकार हमी देते. तेच सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जास का हमी देत नाही. थकीत ऊस बिले मिळण्यासाठी मी मैदानात आहे. कारखानदाराच्या उरावर बसून पैसे मिळवून देणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Bacchu Kaduबच्चू कडूRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी