शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

सदाभाऊ झोपलेत काय?

By admin | Updated: March 7, 2017 18:14 IST

‘अडती’च्या प्रश्नात शिवसेनेची उडी : संजय पवार-काटे यांच्यात खडाजंगी

सदाभाऊ झोपलेत काय?‘अडती’च्या प्रश्नात शिवसेनेची उडी : संजय पवार-काटे यांच्यात खडाजंगीकोल्हापूर : गेली आठ दिवस बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गोंधळ सुरू असताना पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत काहीच भूमिका घेत नाहीत, ते झोपलेत काय? असा सवाल करत शिवसेनेने मंगळवारी अडतीच्या प्रश्नात उडी घेतली. सरकारच्या बघ्याच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सदाभाऊंवर निशाणा साधल्यानंतर ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे व पवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ‘अडत देणार नाही,’ अशी भूमिका भाजीपाला व्यापाऱ्यांनी घेतल्याने गेले आठ दिवस बाजार समितीमध्ये पेच निर्माण झाला आहे. ‘अडत व्यापाऱ्यांकडूनच घ्यावी,’ असा कायदा सांगत असल्याने समिती व अडते या मुद्द्यावर ठाम आहेत; पण व्यापारीही आम्हाला परवडत नाही, म्हणून कोणत्याही परिस्थितीत अडत देणार नाही. यावर ठाम असल्याने हा गुंता निर्माण झाला आहे. याबाबत अनेक बैठका झाल्या, पण सरकारच्या पातळीवरून ज्या आक्रमकपणे हालचाली होणे अपेक्षित होते, त्या दिसत नाहीत. आठ दिवस मार्केट बंद असताना सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करता, अशी विचारणा करण्यासाठी मंगळवारी सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांची भेट घेतली. मार्केट सुरळीत करण्याचा आग्रह शिष्टमंडळाने धरला, सर्वच घटक आपले आहेत. अनेकांचे पोट या व्यवसायावर असल्याने सरकार म्हणून तुम्ही सामंजस्य तोडगा काढणे अपेक्षित होते. शेतकरी, खरेदीदारांना पोलीस संरक्षण देऊन सौदे पूर्ववत करण्याची मागणी विजय देवणे यांनी केली. त्यावर जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी तसे पत्र समितीला दिले. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बाजार समिती गाठली. तिथे सभापती सर्जेराव पाटील व संचालकांशी चर्चा करत असताना संजय पवार, रवी चौगुले यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. आठ दिवस बंद असताना समिती म्हणून काय भूमिका घेतली, शेतकऱ्यांचे नेते म्हणून मंत्रिमंडळात बसलेले सदाभाऊ खोत कुठे आहेत? असा सवाल रवी चौगुले यांनी केला. यावर सदाभाऊंनी चर्चा केलेली आहे, मार्ग निघेल, असे भगवान काटे यांनी सांगितले. कोणाशी चर्चा केली, सर्व घटकांची कोंडी झाली असताना आठ दिवस चर्चा कसली करता, अशा शब्दांत संजय पवार व विजय देवणे यांनी सुनावले. आठवडी बाजार तळिरामांचे अड्डे!शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट ग्राहकांच्या पिशवीत शेतीमाल देण्यासाठी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शहरात आठ-दहा ठिकाणी संत सावता माळी आठवडी बाजार सुरू करण्याची घोषणा केली. ही घोषणा हवेत विरली, एका ठिकाणी सुरू झाला, त्याची अवस्था काय आहे, तळिरामांचे अड्डे बनल्याची टीका संजय पवार यांनी केली.