शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

सदाभाऊ झोपलेत काय?

By admin | Updated: March 7, 2017 18:14 IST

‘अडती’च्या प्रश्नात शिवसेनेची उडी : संजय पवार-काटे यांच्यात खडाजंगी

सदाभाऊ झोपलेत काय?‘अडती’च्या प्रश्नात शिवसेनेची उडी : संजय पवार-काटे यांच्यात खडाजंगीकोल्हापूर : गेली आठ दिवस बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गोंधळ सुरू असताना पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत काहीच भूमिका घेत नाहीत, ते झोपलेत काय? असा सवाल करत शिवसेनेने मंगळवारी अडतीच्या प्रश्नात उडी घेतली. सरकारच्या बघ्याच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सदाभाऊंवर निशाणा साधल्यानंतर ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे व पवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ‘अडत देणार नाही,’ अशी भूमिका भाजीपाला व्यापाऱ्यांनी घेतल्याने गेले आठ दिवस बाजार समितीमध्ये पेच निर्माण झाला आहे. ‘अडत व्यापाऱ्यांकडूनच घ्यावी,’ असा कायदा सांगत असल्याने समिती व अडते या मुद्द्यावर ठाम आहेत; पण व्यापारीही आम्हाला परवडत नाही, म्हणून कोणत्याही परिस्थितीत अडत देणार नाही. यावर ठाम असल्याने हा गुंता निर्माण झाला आहे. याबाबत अनेक बैठका झाल्या, पण सरकारच्या पातळीवरून ज्या आक्रमकपणे हालचाली होणे अपेक्षित होते, त्या दिसत नाहीत. आठ दिवस मार्केट बंद असताना सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करता, अशी विचारणा करण्यासाठी मंगळवारी सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांची भेट घेतली. मार्केट सुरळीत करण्याचा आग्रह शिष्टमंडळाने धरला, सर्वच घटक आपले आहेत. अनेकांचे पोट या व्यवसायावर असल्याने सरकार म्हणून तुम्ही सामंजस्य तोडगा काढणे अपेक्षित होते. शेतकरी, खरेदीदारांना पोलीस संरक्षण देऊन सौदे पूर्ववत करण्याची मागणी विजय देवणे यांनी केली. त्यावर जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी तसे पत्र समितीला दिले. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बाजार समिती गाठली. तिथे सभापती सर्जेराव पाटील व संचालकांशी चर्चा करत असताना संजय पवार, रवी चौगुले यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. आठ दिवस बंद असताना समिती म्हणून काय भूमिका घेतली, शेतकऱ्यांचे नेते म्हणून मंत्रिमंडळात बसलेले सदाभाऊ खोत कुठे आहेत? असा सवाल रवी चौगुले यांनी केला. यावर सदाभाऊंनी चर्चा केलेली आहे, मार्ग निघेल, असे भगवान काटे यांनी सांगितले. कोणाशी चर्चा केली, सर्व घटकांची कोंडी झाली असताना आठ दिवस चर्चा कसली करता, अशा शब्दांत संजय पवार व विजय देवणे यांनी सुनावले. आठवडी बाजार तळिरामांचे अड्डे!शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट ग्राहकांच्या पिशवीत शेतीमाल देण्यासाठी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शहरात आठ-दहा ठिकाणी संत सावता माळी आठवडी बाजार सुरू करण्याची घोषणा केली. ही घोषणा हवेत विरली, एका ठिकाणी सुरू झाला, त्याची अवस्था काय आहे, तळिरामांचे अड्डे बनल्याची टीका संजय पवार यांनी केली.