शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
2
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
3
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
4
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
5
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
6
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
7
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
8
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
9
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
10
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
11
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
12
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
14
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
15
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
16
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
17
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
18
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
19
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
20
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

पाटबंधारेच्या कारवाईमुळे सील केलेला कृष्णा योजनेचा पाणीपुरवठा सुरू, २२ तास उपसा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 1:36 PM

इचलकरंजीचे प्रशासन खडबडून जागे 

इचलकरंजी : सांगलीच्या पाटबंधारे विभागाने इचलकरंजी महापालिकेचे मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील पाणी उपसा केंद्र १४ कोटी रुपयांच्या थकबाकीवरून सील केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे तातडीचे पत्र जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पाठविण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता सील काढण्यात आले व पाणीपुरवठा सुरू झाला.

शहराला कृष्णा नदीवरील मजरेवाडी उपसा केंद्रातून ४५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. या उपशापोटी १४ कोटी ६० लाख ५९ हजार ८३३ रुपयांची मागणी सांगली पाटबंधारे विभागाने महापालिकेला केली आहे. मात्र, अकरा कोटी इतकीच रक्कम देणे असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यापैकी ७ कोटी २५ लाख रुपये महापालिकेने पाटबंधारे विभागाला भरले आहेत. तसेच १ कोटी ४१ लाख रुपयांची बॅँक गॅरंटीही पाटबंधारेकडे आहे.

असे असताना कोणतीही नोटीस न देता गुरुवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाच वाजता नृसिंहवाडी विभागाचे शाखाधिकारी आर.सी. दानोळे यांनी मजरेवाडी येथील उपसा केंद्रातील पॅनल बोर्ड, विद्युत संच व मीटरला सील ठोकले. सील तोडल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा येऊन पाहणीही केली.पाटबंधारे खात्याचे उपअभियंता यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची २० मार्चला भेट घेतली होती. महापालिकेची घरफाळा वसुली सुरू असून, शेवटच्या आठवड्यात जास्तीत जास्त रक्कम भरण्यात येईल, असे सांगितले होते. तरीही पाटबंधारे विभागाने धडक कारवाई केल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यापोटी शुक्रवारी २८ लाख ३१ हजार ५५८ रुपयांचा धनादेश पाटबंधारे विभागाला पाठविण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू झाला. तब्बल २२ तास शहराचा पाणीपुरवठा बंद राहिला होता.

महापालिकेने भरली इतकी रक्कम

  • मार्च २०२२ - ७० लाख
  • नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ - १ कोटी
  • १ मार्च २०२३ - चार कोटी २४ लाख ५० हजार
  • मार्च २०२३ - सोळा लाख ४३ हजार ४९७
  • नोव्हेंबर २०२३ - ७५ लाख ४८ हजार व नऊ लाख ९८ हजार.
  • मार्च २०२४ - २८ लाख ३१ हजार ५५८.

कारवाई संयुक्तिक नाही : दिवटे

  • केवळ सुमारे तीन कोटींच्या दरम्यान सेस रक्कम भरणे शिल्लक असून, त्यापोटी शहराचे पाणी थेट बंद करण्याची पाटबंधारे विभागाची कृती संयुक्तिक नाही.
  • पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद आहे. सध्या कृष्णा नदीवरूनच पाणीपुरवठा सुरू आहे. पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठा खंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद आहे.
  • सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून, पाणीपुरवठा तत्काळ पूर्ववत न केल्यास नागरिकांकडून उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणी