शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

कोल्हापूर जिल्ह्यात पाणी संकट गहिरे, राधानगरी धरणात अवघे १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:56 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पाण्याचे संकट निर्माण होत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या दोन्ही काठावर उपसा बंदी लागू ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पाण्याचे संकट निर्माण होत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या दोन्ही काठावर उपसा बंदी लागू केली आहे. वळीव पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यात दमदार पावसाने अजूनही हजेरी लावली नसल्याने पाण्याचे संकट गहिरे होत चालले आहे. राधानगरी धरणातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्यामुळे धरणातीलपाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. राधानगरी धरणात गुरुवारी २७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तो अवघा १५ दिवस पुरण्याची शक्यता आहे.पावसाचे आगमन लांबल्यास जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांमध्येही जेमतेम पाणीसाठा आहे. नद्यांच्या पात्रांनीसुद्धा तळ गाठला असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अवघ्या १५ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाटबंधारे विभागाकडून उपसाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली.धरणांमधील पाण्याची स्थितीजिल्ह्यासाठी वरदान असलेल्या राधानगरी धरणात २२ जून रोजीच्या आकडेवारीनुसार केवळ १.५९ टीएमसी पाणी आहे. गतवर्षी २.२२ टीएमसी पाणी होते. दूधगंगा धरणामध्ये १.२० टीएमसी पाणी असून गतवर्षी ५.९६ टीएमसी पाणी होते. तुळशी धरणामध्ये .८५ टीएमसी इतकेच पाणी असून, गतवर्षी १.४३ टीएमसी पाणी होते. कासारी धरणामध्ये ०.४४ टीएमसी पाणी असून गतवर्षी ०.६३ टीएमसी पाणी होते. कुंभी धरणामध्ये ०.८१ टीएमसी पाणीसाठा असून गेल्या वर्षी १.०१ टीएमसी पाणीसाठा होता. पाटगाव धरणात ०.७८ टीएमसी पाणी असून गेल्या वर्षी ०.९६ टीएमसी होते. कडवी धरणात ०.७६ पाणी असून गेल्या वर्षी ०.७० टीएमसी होते. वारणा धरणात १०.७० टीएमसी पाणी असून, गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये १०.४७ टीएमसी होते.

विसर्गवर मर्यादाधरणातून पाण्याचा विसर्ग करण्यावर मर्यादा आल्याने नदीकाठच्या गावांसह जिल्ह्याचे पावसाकडे लक्ष आहे. राधानगरीतून ३५०, तुळशीतून २७०, वारणेतून १०३०, दूधगंगेतून ३००, कासारीतून २५०, कुंभीतून ३००, तर पाटगांवमधून २५० क्युसेक पाण्याचा गुरुवारी विसर्ग करण्यात आला आहे.

राधानगरीत ०.५९ टीएमसी मृतसाठाराधानगरी धरणात ०.५९ टीएमसी मृतसाठा आहे. या धरणातून शेतीसाठी पाणी सोडणे बंद असले तरी तुळशीतून भोगावतीत आणि तेथून पंचगंगेत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीDamधरणRainपाऊस