शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

कोल्हापूर जिल्ह्यात पाणी संकट गहिरे, राधानगरी धरणात अवघे १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:56 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पाण्याचे संकट निर्माण होत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या दोन्ही काठावर उपसा बंदी लागू ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पाण्याचे संकट निर्माण होत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या दोन्ही काठावर उपसा बंदी लागू केली आहे. वळीव पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यात दमदार पावसाने अजूनही हजेरी लावली नसल्याने पाण्याचे संकट गहिरे होत चालले आहे. राधानगरी धरणातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्यामुळे धरणातीलपाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. राधानगरी धरणात गुरुवारी २७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तो अवघा १५ दिवस पुरण्याची शक्यता आहे.पावसाचे आगमन लांबल्यास जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांमध्येही जेमतेम पाणीसाठा आहे. नद्यांच्या पात्रांनीसुद्धा तळ गाठला असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अवघ्या १५ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाटबंधारे विभागाकडून उपसाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली.धरणांमधील पाण्याची स्थितीजिल्ह्यासाठी वरदान असलेल्या राधानगरी धरणात २२ जून रोजीच्या आकडेवारीनुसार केवळ १.५९ टीएमसी पाणी आहे. गतवर्षी २.२२ टीएमसी पाणी होते. दूधगंगा धरणामध्ये १.२० टीएमसी पाणी असून गतवर्षी ५.९६ टीएमसी पाणी होते. तुळशी धरणामध्ये .८५ टीएमसी इतकेच पाणी असून, गतवर्षी १.४३ टीएमसी पाणी होते. कासारी धरणामध्ये ०.४४ टीएमसी पाणी असून गतवर्षी ०.६३ टीएमसी पाणी होते. कुंभी धरणामध्ये ०.८१ टीएमसी पाणीसाठा असून गेल्या वर्षी १.०१ टीएमसी पाणीसाठा होता. पाटगाव धरणात ०.७८ टीएमसी पाणी असून गेल्या वर्षी ०.९६ टीएमसी होते. कडवी धरणात ०.७६ पाणी असून गेल्या वर्षी ०.७० टीएमसी होते. वारणा धरणात १०.७० टीएमसी पाणी असून, गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये १०.४७ टीएमसी होते.

विसर्गवर मर्यादाधरणातून पाण्याचा विसर्ग करण्यावर मर्यादा आल्याने नदीकाठच्या गावांसह जिल्ह्याचे पावसाकडे लक्ष आहे. राधानगरीतून ३५०, तुळशीतून २७०, वारणेतून १०३०, दूधगंगेतून ३००, कासारीतून २५०, कुंभीतून ३००, तर पाटगांवमधून २५० क्युसेक पाण्याचा गुरुवारी विसर्ग करण्यात आला आहे.

राधानगरीत ०.५९ टीएमसी मृतसाठाराधानगरी धरणात ०.५९ टीएमसी मृतसाठा आहे. या धरणातून शेतीसाठी पाणी सोडणे बंद असले तरी तुळशीतून भोगावतीत आणि तेथून पंचगंगेत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीDamधरणRainपाऊस