शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

कोल्हापूर जिल्ह्यात पाणी संकट गहिरे, राधानगरी धरणात अवघे १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:56 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पाण्याचे संकट निर्माण होत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या दोन्ही काठावर उपसा बंदी लागू ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पाण्याचे संकट निर्माण होत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या दोन्ही काठावर उपसा बंदी लागू केली आहे. वळीव पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यात दमदार पावसाने अजूनही हजेरी लावली नसल्याने पाण्याचे संकट गहिरे होत चालले आहे. राधानगरी धरणातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्यामुळे धरणातीलपाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. राधानगरी धरणात गुरुवारी २७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तो अवघा १५ दिवस पुरण्याची शक्यता आहे.पावसाचे आगमन लांबल्यास जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांमध्येही जेमतेम पाणीसाठा आहे. नद्यांच्या पात्रांनीसुद्धा तळ गाठला असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अवघ्या १५ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाटबंधारे विभागाकडून उपसाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली.धरणांमधील पाण्याची स्थितीजिल्ह्यासाठी वरदान असलेल्या राधानगरी धरणात २२ जून रोजीच्या आकडेवारीनुसार केवळ १.५९ टीएमसी पाणी आहे. गतवर्षी २.२२ टीएमसी पाणी होते. दूधगंगा धरणामध्ये १.२० टीएमसी पाणी असून गतवर्षी ५.९६ टीएमसी पाणी होते. तुळशी धरणामध्ये .८५ टीएमसी इतकेच पाणी असून, गतवर्षी १.४३ टीएमसी पाणी होते. कासारी धरणामध्ये ०.४४ टीएमसी पाणी असून गतवर्षी ०.६३ टीएमसी पाणी होते. कुंभी धरणामध्ये ०.८१ टीएमसी पाणीसाठा असून गेल्या वर्षी १.०१ टीएमसी पाणीसाठा होता. पाटगाव धरणात ०.७८ टीएमसी पाणी असून गेल्या वर्षी ०.९६ टीएमसी होते. कडवी धरणात ०.७६ पाणी असून गेल्या वर्षी ०.७० टीएमसी होते. वारणा धरणात १०.७० टीएमसी पाणी असून, गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये १०.४७ टीएमसी होते.

विसर्गवर मर्यादाधरणातून पाण्याचा विसर्ग करण्यावर मर्यादा आल्याने नदीकाठच्या गावांसह जिल्ह्याचे पावसाकडे लक्ष आहे. राधानगरीतून ३५०, तुळशीतून २७०, वारणेतून १०३०, दूधगंगेतून ३००, कासारीतून २५०, कुंभीतून ३००, तर पाटगांवमधून २५० क्युसेक पाण्याचा गुरुवारी विसर्ग करण्यात आला आहे.

राधानगरीत ०.५९ टीएमसी मृतसाठाराधानगरी धरणात ०.५९ टीएमसी मृतसाठा आहे. या धरणातून शेतीसाठी पाणी सोडणे बंद असले तरी तुळशीतून भोगावतीत आणि तेथून पंचगंगेत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीDamधरणRainपाऊस