शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

पुरती शोभाच झाली म्हणायची की!

By admin | Updated: August 11, 2016 00:22 IST

नेमकं वर्ष आता आठवत नाही. पण बरीच वर्षे झाली हे नक्की. एका इंग्रजी दैनिकात एक चांगलं तीन कॉलमी व्यंगचित्र छापून आलं होतं.

नेमकं वर्ष आता आठवत नाही. पण बरीच वर्षे झाली हे नक्की. एका इंग्रजी दैनिकात एक चांगलं तीन कॉलमी व्यंगचित्र छापून आलं होतं. त्यात मुंबईचा तेव्हांचा विमानतळ दाखविला होता. आॅलिम्पिक स्पर्धेसाठी विदेशात गेलेला भारतीय चमू मायदेशी परतणार होता. कोणताही खेळाडू किंवा खेळाडूंचा संघ मायदेशी परततो तेव्हां विमानतळावर रेटारेटी करायची आणि संघ विजय प्राप्त करुन येत असेल तर त्याचे स्वागत ‘बुकें’नी करायचे आणि पराभूत होऊन परतत असेल तर स्वागत बुक्क््यांनी करायचे ही महान परंपरा अजून सुरु व्हायचीच होती. शुकशुकाटलेल्या विमानतळावर आॅलिम्पिकचा संघ उतरला आणि कस्टमच्या अधिकाऱ्यासमोर ओळ करुन उभा राहिला. अग्रभागी संघाचा कप्तान होता. सवयीप्रमाणे अधिकाऱ्याने त्याला प्रश्न केला, ‘एनीथिंग टू डिक्लेअर’? म्हणजे येताना काही मौल्यवान वस्तू वगैरे आणलं असेल तर जाहीर करायचंय? बिचारा कप्तान ओशाळवाणे हसून उत्तरला, ‘नथींग सर, नॉट इव्हन अ ब्रॉन्झ’! (काहीही नाही, महोदय, अगदी कांस्य पदकदेखील नाही). याचा अर्थ भारतीय खेळाडू जसे जायचे तसेच हात हलवित परत यायचे. पण तेव्हांच्या आणि आताच्या कथेत नाही म्हणायला थोडा फरक नक्कीच पडला आहे. खाशाबा जाधव या कुस्तीगीरानं हेलसिंकी आॅलिम्पिकमध्ये मल्लविद्येत प्राप्त केलेल्या कांस्य पदकाच्या शिदोरीवर देशाने बरीच वर्षे काढली. त्यानंतर हळूहळू ही शिदोरी वाढत गेली आणि कोणत्या खेळात, कोणी, केव्हां आणि कोणते पदक प्राप्त केले हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये आवर्जून विचारला जाऊ लागला. पण तरीही देशाची लोकसंख्या आणि प्राप्त पदकांची संख्या यातील व्यस्त प्रमाणात गुणात्मक फरक पडला असे काही झालेले नाही. नजीकच्या भविष्यात तसे होण्याची चिन्हेही दिसत नाहीत. अशातच शोभा डे यांनी ‘रिओ जाव, सेल्फी लो, खाली हाथ वापस आओ, व्हॉट अ वेस्ट आॅफ मनी अ‍ॅन्ड आॅपॉर्च्युनिटी’ असे ट्विट केले आणि त्यांना अनेकांनी अक्षरश: बदडून काढले व या बदडण्याने शोभाताईंनी स्वत:ची पुरती शोभा करुन घेतली. राज्यघटनेने केवळ तात्त्विक अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले. पण अलीकडच्या काळात सुळसुळाटलेल्या समाज माध्यमांनी मात्र व्यावहारिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक विषयात मत आहे आणि आपण ते मांडलेच पाहिजे अशी सुरसुरीही आहे. तेव्हां शोभा डे यांनी त्यांच्या सुरसुरीला मोकळी वाट करुन दिल्यावर बाकीच्यांनी मागे हटायचे काही कारणच नव्हते. त्यातून एक पोक्त, समंजस आणि परिपक्व विचारसरणीची नागरिक अशी शोभा डे यांची ख्याती असल्याची साधी अफवादेखील आजवर कोणाच्या कानी पडलेली नाही. पण तरीही एकदा का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार अमर्याद आहे आणि तो सर्वांना सर्वकाळ उपलब्ध आहे असे सर्वमान्य झाल्यावर कुणी शोभा आपली शोभा करुन घेणार आणि बाकी सारे तिची शोभा करण्यात धन्यता मानणार हे ओघानेच येते. पण तरीही यावेळी या बाई ज्या टिवटिवल्या आहेत ते कदाचित नसेल पूर्ण सत्य पण ते पूर्ण असत्यदेखील नाही. बिरबल बादशहाच्या गोष्टीतील बादशहाचा पोपट ध्यानस्थ वगैरे काही बसलेला नाही तो चक्क मेला आहे हे कोणी तरी सांगावेच लागते. सव्वाशे कोटींहून अधिकची लोकसंख्या असलेल्या देशातील जेमतेम शे-सव्वाशेच खेळाडू जर आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी पाठविले जाऊ शकत असतील तर देशभक्तीच्या नावाने गळे काढणे याला अर्थ नाही. अश्व शर्यतींमध्ये ‘आॅल्सो रन’ म्हणजे शर्यतीत हेदेखील धावले असे जाहीर करण्याची परंपरा असते. त्या न्यायाने पदक किंवा पदके मिळणे तर दूर, पण या ‘आॅल्सो रन’मध्ये तरी अशी कितीशी नावे येतात? जेणेकरुन आपल्या खेळाडूंचा तेजोभंग होऊ नये, त्यांना सदैव प्रोत्साहित करावे, सतत त्यांचा हुरुप वाढवावा हे सारे ठीक. परंतु कुठपर्यंत? केवळ आॅलिम्पिकच नव्हे तर कोणत्याही आंतराराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू धाडायचे तर त्याआधी मोठे नाट्य घडून येत असते. वशिलेबाजीचे आरोप होत असतात. खिलाडू वृत्ती हा एक मोलाचा गुण म्हणून सांगितले जाते, त्याचा खुद्द खेळाडूंमध्येच किती अभाव असतो याचे दर्शन घडविले जाते. रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुशीलकुमार सोळंकी आणि नरसिंग यादव हे दोन मल्ल आणि त्यांचे जे कोणी असतील ते वस्ताद यांच्यात जे काही घडले आणि नरसिंग यादव अपात्र ठरावा म्हणून त्याच्या आहारात म्हणे कोणी अज्ञाताने अंमली पदार्थ मिसळल्यानंतर जे आरोप प्रत्यारोप सुरु झाले, त्यातून देशाची इभ्रत वाढली की देशभक्तीला खतपाणी मिळाले? त्याच्याही आधी देशाच्या क्रीडा विश्वाच्या इतिहासात प्रथमच हे दोन्ही मल्ल न्यायालयाच्या आखाड्यातही उतरुन आले होते. मुद्दा काय, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना शोभा डे जे टिवटिवल्या ते असेलही खरं पण बरं नव्हतं हे नक्की!