शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

पोलंडच्या नागरिकांची भेट, ७२ वर्षाच्या आठवणी झाल्या ताज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 17:47 IST

दुस-या महायुध्दाला सुरूवात....१९४२ ची वेळ....काही परदेशी नागरिक भारतातील कोल्हापूर येथे आश्रयाला आले....आणि कोल्हापूरकर झाले....युध्द समाप्तीनंतर ते नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्या मनात कोल्हापूरकर कायम राहिले. ते नागरिक होते पोलंडवासी.....त्याच आठवणींना आज ७२ वर्षानंतर लुडमिला जॅक्टोव्हीझ या महिलेने उजाळा दिला.

ठळक मुद्देपोलंडच्या नागरिकांची भेट७२ वर्षाच्या आठवणी झाल्या ताज्या

कोल्हापूर :  दुस-या महायुध्दाला सुरूवात....१९४२ ची वेळ....काही परदेशी नागरिक भारतातील कोल्हापूर येथे आश्रयाला आले....आणि कोल्हापूरकर झाले....युध्द समाप्तीनंतर ते नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्या मनात कोल्हापूरकर कायम राहिले. ते नागरिक होते पोलंडवासी.....त्याच आठवणींना आज ७२ वर्षानंतर लुडमिला जॅक्टोव्हीझ या महिलेने उजाळा दिला.१९४२ ते १९४२८ या कालावधीत कोल्हापुरात निर्वासित म्हणून राहिलेल्या पाच हजार नागरिकांमधील २७ नागरिकांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. आज या नागरिकांनी पन्हाळा किल्यास भेट देऊन किल्याची माहिती जाणून घेतली. तसेच आपल्या लहानपणीच्या कोल्हापुरातील वास्तव्यात असलेल्या आठवणींनाही उजाळा दिला.सन  १९३६ ला जन्म झालेल्या लुडमिला या आज ८३ वर्षाच्या वृध्द महिला आहेत. मात्र भारत भेटीचा त्यांचा उत्साह त्यांना तारूण्यात नेणारा होता. त्यामुळे त्या जुन्या आठवणी सांगतांना फार उत्साहीत होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान निर्वासित झालेल्या पोलंड ५ हजार नागरीकांना भारतातील कोल्हापूर येथील वळीवडे या गावी आश्रय घेतला होता. त्यानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्व परदेशी नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्यात भारतातील आठवणी या कायम राहिल्या.पन्हाळा किल्यावरील धान्याचे कोठार (अंबरखाना) व तीन दरवाजा या ठिकाणी भेट देऊन या परिसराची पहाणी करुन किल्याची माहिती जाणून घेतली. रविराज निंबाळकर यांनी पथकातील नागरिकांना पन्हाळा किल्याची रचना, मराठा साम्राज्य याबाबत सविस्तर माहिती दिली. किल्ला पहाणीनंतर पन्हाळा नगरपरिषदेच्यावतीने या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

पन्हाळा किल्ला येथील बाजीप्रभू देशपांडे पुतळा चौकात पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष रुपाली धडेल, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या नगरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पन्हाळा किल्याबाबत यावेळी या नागरिकांना माहिती दिली. या वेळी पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसिलदार रमेश शेंडगे यांच्यासह पन्हाळा नगरपरिषदेचे नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.मरेपर्यंत माझ्या मनात भारत राहील - लुडमिला जॅक्टोव्हीझभारत ही पवित्र भूमी आहे. या भूमित वास्तव्यास असताना मी ११ वर्षाची होती. आईने माझ्या हातात घातलेल्या दोन बांगड्या आजही आहेत. कोल्हापूरची ही आवठवण मी आजही माझ्यासोबत ठेवली असल्याची भावना लुडमिला जॅक्टोव्हीझ यांनी यावेळी व्यक्त केली.वळविडे येथे १९४२ ते १९४८ या कालावधीत लुडमिला या आईसमवेत रहात असताना आईने वळीवडे येथे कॅम्प मध्ये हातात घातलेली बांगडी पोलंड च्या निर्वासित महिलेने आठवण म्हणून जपून ठेवली आहे. ७२ वर्षापासून हातात असलेली बांगडी असून भारतातील शाहू महाराजांच्या भूमीची आठवण जपून ठेवल्याचं त्यांनी यावेळी सांगितले . 

अन् सासुबाईची आठवण झाली-माझ्या सासुबाई मालती वसंत काशीकर (पोलंड येथील नाव वाँडरव्हिक्स) या १९४२ च्या काळात भारतात आल्या. सासरे वसंत काशीकर हे त्याकाळी ब्रिटीशांकडे नोकरीस होते. वाँडरव्हिक्स या माझ्या सासूबाई माझ्या सासऱ्यांना आवडल्या, दोघांनी विवाह केला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सर्व पोलंड येथील नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र माझ्या सासुबाई येथे राहिल्या. त्यांची बहीण हाना ही सुद्धा आपल्या मायदेशी परतली. तेंव्हापासून पोलंड आणि काशीकर कुंटुबाचे ऋणानुबंध कायम आहेत. दोन-तीन वर्षापूर्वी सासुबाईंचे निधन झाले. आज त्यांच्याही आठवणींना उजाळा मिळाला.- शमा अशोक काशीकर

 

 

कोल्हापूरच्या मातीशी समरसमाझी बहीण क्रोस्टिना आणि मी त्यावेळी भारतात आलो आणि या मातीशी समरस झालो. ती आठवण आजही मनात कायम आहे. आज माझी बहीण क्रोस्टिना हयात नाही. मात्र तिची मुलगी ईजाबेला कोझीयाली आज माझ्यासोबत या भेटीला आली. आज माझी बहीण असती तर खूप बरे वाटले असते. त्यावेळेस आम्हाला इतके प्रेम मिळाले की, कोल्हापूरही आमची भूमीच झाली.- ओल्फ,केपटाऊन दक्षिण अफ्रिका

भारत व पोलंडचे ऋणानुबंध कायम रहावेतमी सध्या युनायटेड स्टेट येथील रहिवाशी आहे. माझे आईवडील हे 72 वर्षापुर्वी कोल्हापूर येथे वास्तव्यास होते. आज त्यांचे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी मी या भूमित आले. मला येथे येऊन खूप आंनद झाला. भारत आणि पोलंडचे ऋणानुबंध असेच कायम राहावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.- ईवा क्लार्क

टॅग्स :historyइतिहासkolhapurकोल्हापूर