शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पोलंडच्या नागरिकांची भेट, ७२ वर्षाच्या आठवणी झाल्या ताज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 17:47 IST

दुस-या महायुध्दाला सुरूवात....१९४२ ची वेळ....काही परदेशी नागरिक भारतातील कोल्हापूर येथे आश्रयाला आले....आणि कोल्हापूरकर झाले....युध्द समाप्तीनंतर ते नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्या मनात कोल्हापूरकर कायम राहिले. ते नागरिक होते पोलंडवासी.....त्याच आठवणींना आज ७२ वर्षानंतर लुडमिला जॅक्टोव्हीझ या महिलेने उजाळा दिला.

ठळक मुद्देपोलंडच्या नागरिकांची भेट७२ वर्षाच्या आठवणी झाल्या ताज्या

कोल्हापूर :  दुस-या महायुध्दाला सुरूवात....१९४२ ची वेळ....काही परदेशी नागरिक भारतातील कोल्हापूर येथे आश्रयाला आले....आणि कोल्हापूरकर झाले....युध्द समाप्तीनंतर ते नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्या मनात कोल्हापूरकर कायम राहिले. ते नागरिक होते पोलंडवासी.....त्याच आठवणींना आज ७२ वर्षानंतर लुडमिला जॅक्टोव्हीझ या महिलेने उजाळा दिला.१९४२ ते १९४२८ या कालावधीत कोल्हापुरात निर्वासित म्हणून राहिलेल्या पाच हजार नागरिकांमधील २७ नागरिकांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. आज या नागरिकांनी पन्हाळा किल्यास भेट देऊन किल्याची माहिती जाणून घेतली. तसेच आपल्या लहानपणीच्या कोल्हापुरातील वास्तव्यात असलेल्या आठवणींनाही उजाळा दिला.सन  १९३६ ला जन्म झालेल्या लुडमिला या आज ८३ वर्षाच्या वृध्द महिला आहेत. मात्र भारत भेटीचा त्यांचा उत्साह त्यांना तारूण्यात नेणारा होता. त्यामुळे त्या जुन्या आठवणी सांगतांना फार उत्साहीत होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान निर्वासित झालेल्या पोलंड ५ हजार नागरीकांना भारतातील कोल्हापूर येथील वळीवडे या गावी आश्रय घेतला होता. त्यानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्व परदेशी नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्यात भारतातील आठवणी या कायम राहिल्या.पन्हाळा किल्यावरील धान्याचे कोठार (अंबरखाना) व तीन दरवाजा या ठिकाणी भेट देऊन या परिसराची पहाणी करुन किल्याची माहिती जाणून घेतली. रविराज निंबाळकर यांनी पथकातील नागरिकांना पन्हाळा किल्याची रचना, मराठा साम्राज्य याबाबत सविस्तर माहिती दिली. किल्ला पहाणीनंतर पन्हाळा नगरपरिषदेच्यावतीने या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

पन्हाळा किल्ला येथील बाजीप्रभू देशपांडे पुतळा चौकात पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष रुपाली धडेल, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या नगरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पन्हाळा किल्याबाबत यावेळी या नागरिकांना माहिती दिली. या वेळी पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसिलदार रमेश शेंडगे यांच्यासह पन्हाळा नगरपरिषदेचे नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.मरेपर्यंत माझ्या मनात भारत राहील - लुडमिला जॅक्टोव्हीझभारत ही पवित्र भूमी आहे. या भूमित वास्तव्यास असताना मी ११ वर्षाची होती. आईने माझ्या हातात घातलेल्या दोन बांगड्या आजही आहेत. कोल्हापूरची ही आवठवण मी आजही माझ्यासोबत ठेवली असल्याची भावना लुडमिला जॅक्टोव्हीझ यांनी यावेळी व्यक्त केली.वळविडे येथे १९४२ ते १९४८ या कालावधीत लुडमिला या आईसमवेत रहात असताना आईने वळीवडे येथे कॅम्प मध्ये हातात घातलेली बांगडी पोलंड च्या निर्वासित महिलेने आठवण म्हणून जपून ठेवली आहे. ७२ वर्षापासून हातात असलेली बांगडी असून भारतातील शाहू महाराजांच्या भूमीची आठवण जपून ठेवल्याचं त्यांनी यावेळी सांगितले . 

अन् सासुबाईची आठवण झाली-माझ्या सासुबाई मालती वसंत काशीकर (पोलंड येथील नाव वाँडरव्हिक्स) या १९४२ च्या काळात भारतात आल्या. सासरे वसंत काशीकर हे त्याकाळी ब्रिटीशांकडे नोकरीस होते. वाँडरव्हिक्स या माझ्या सासूबाई माझ्या सासऱ्यांना आवडल्या, दोघांनी विवाह केला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सर्व पोलंड येथील नागरिक आपल्या मायदेशी परतले. मात्र माझ्या सासुबाई येथे राहिल्या. त्यांची बहीण हाना ही सुद्धा आपल्या मायदेशी परतली. तेंव्हापासून पोलंड आणि काशीकर कुंटुबाचे ऋणानुबंध कायम आहेत. दोन-तीन वर्षापूर्वी सासुबाईंचे निधन झाले. आज त्यांच्याही आठवणींना उजाळा मिळाला.- शमा अशोक काशीकर

 

 

कोल्हापूरच्या मातीशी समरसमाझी बहीण क्रोस्टिना आणि मी त्यावेळी भारतात आलो आणि या मातीशी समरस झालो. ती आठवण आजही मनात कायम आहे. आज माझी बहीण क्रोस्टिना हयात नाही. मात्र तिची मुलगी ईजाबेला कोझीयाली आज माझ्यासोबत या भेटीला आली. आज माझी बहीण असती तर खूप बरे वाटले असते. त्यावेळेस आम्हाला इतके प्रेम मिळाले की, कोल्हापूरही आमची भूमीच झाली.- ओल्फ,केपटाऊन दक्षिण अफ्रिका

भारत व पोलंडचे ऋणानुबंध कायम रहावेतमी सध्या युनायटेड स्टेट येथील रहिवाशी आहे. माझे आईवडील हे 72 वर्षापुर्वी कोल्हापूर येथे वास्तव्यास होते. आज त्यांचे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी मी या भूमित आले. मला येथे येऊन खूप आंनद झाला. भारत आणि पोलंडचे ऋणानुबंध असेच कायम राहावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.- ईवा क्लार्क

टॅग्स :historyइतिहासkolhapurकोल्हापूर