शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

वारणेतून विसर्ग सुरू, राधानगरीतून थांबवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:02 IST

आधीच धरणांत सरासरी ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे; त्यातच मान्सून वेळेत दाखल होत असल्याने आणि आता वादळी पावसाने थैमान घातल्याने पाटबंधारे विभाग अधिक सतर्क झाला आहे. ‘वारणे’तून विसर्ग कायम असून, ‘राधानगरी’तून मात्र विसर्ग थांबविण्यात आला आहे. अन्य धरणांतून नियमित आवर्तने सुरूच असल्याने सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत.

ठळक मुद्देवारणेतून विसर्ग सुरू, राधानगरीतून थांबवलाधरणात अजून सरासरी ३३ टक्के पाणीसाठा

कोल्हापूर : आधीच धरणांत सरासरी ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे; त्यातच मान्सून वेळेत दाखल होत असल्याने आणि आता वादळी पावसाने थैमान घातल्याने पाटबंधारे विभाग अधिक सतर्क झाला आहे. ‘वारणे’तून विसर्ग कायम असून, ‘राधानगरी’तून मात्र विसर्ग थांबविण्यात आला आहे. अन्य धरणांतून नियमित आवर्तने सुरूच असल्याने सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत.

गेल्या आठवड्यात कमालीचा उष्मा होता; त्यामुळे पिकांची होरपळ वाढली होती. पाण्याची मागणी वाढल्याने नद्या बऱ्यापैकी कोरड्या पडलेल्या दिसत होत्या; पण जिल्ह्यात जूनच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने वळवाच्या स्वरूपाने जोरदार एंट्री केली आहे. त्यामुळे शेतीसाठीच्या पाण्याची मागणी कमी झाली आहे. परिणामी, नद्याही काठोकाठ भरून वाहू लागल्या आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षीचा महापूर, अतिवृष्टी यांमुळे जानेवारीपर्यंत शेतीला पाण्याची मागणी राहिली नाही. त्यानंतर मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगांचीही पाण्याची मागणी घटली. या सर्वांचा परिणाम म्हणून धरणातील पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आजच्या घडीला सर्वच धरणांत सरासरी ३० टक्के पाणीसाठा आहे.

आजच्या घडीला ‘राधानगरी’तून ८०० क्युसेक विसर्ग सुरू होता; पण तो मंगळवारी सकाळी थांबवण्यात आला. ‘वारणे’तून नदीपात्रात १५३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अन्य धरणांतील नियमित आवर्तने सुरू असून, अतिरिक्त विसर्ग अजून सुरू केलेला नाही.

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईkolhapurकोल्हापूर